शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 16:38 IST

राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा (ता.नवापूर) येथील शिक्षक प्रमोद मधुकर चिंचोले हे द्वितीय आले. ‘स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी’ या कार्यक्रमांतर्गत ‘स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकतो?’ या विषयावरील ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये त्यांचा हा निबंध.

स्वच्छ भारत म्हणजे मी स्वच्छ, माझा परिसर स्वच्छ, माङया भारतातील प्रत्येक गाव व नदी स्वच्छ ! स्वच्छ भारतासाठी मला जे करता येणे शक्य आहे ते मी करेल. मी माङया घरातील भाज्यांची देठे, फळांच्या साली, शेंगांची टरफले यांसारखे पदार्थ इतरत्र न टाकता छिद्रे असलेल्या मडक्यात टाकेल. साधारणत: 50 ते 60 दिवसात हे पदार्थ कुजून त्याचे खत तयार होईल. या खताचा वापर शेतीसाठी अथवा कुंडय़ातील रोपांसाठी करता येईल. रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा करणार नाही. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत सूचना फलक लावले जावेत यासाठी प्रय}शील राहील. व्हॉट्सअप, फेसबुक, स्काईप, ट्विटर, ईमेल यांसारख्या माध्यमांद्वारे इतरांपयर्ंत स्वच्छता संदेश पोहचवेल. परिसरातील चहाची दुकाने व हॉटेल्समालकांना चहासाठी कागदी कपांऐवजी काच किंवा तत्सम पदार्थांपासून बनविलेले कप वापरण्याचा आग्रह धरेन. जेणेकरून कागदी कपांमुळे होणा:या कच:यावर आळा बसेल. हॉटेलमालकांना मिठाई व इतर खाद्यपदार्थ उघडय़ा भांडय़ात न ठेवता झाकण असलेल्या भांडय़ात ठेवण्याबाबत विनंती करेन. परिणामी खाद्यपदार्थांमुळे होणा:या रोगराईवर अंकुश राहील. घराच्या भिंतीवर व दर्शनी भागात स्वच्छतेबाबत संदेश व घोषवाक्य असलेले फलक लावेन. छतावर पडणारे पावसाचे पाणी आजूबाजूला डबक्यात साचून रोगराई पसरते. मी हे पाणी कूपनलिकेत सोडण्याची व्यवस्था केली आहे. इतरांनाही पाणी अडविण्याचा व जिरवण्याचा आग्रह धरेल. बाजारासाठी प्लॅस्टिकची पिशवी न वापरता कापडी पिशवीचाच वापर करेन. सण, उत्सव, लग्नसमारंभ, वाढदिवस, विवाहप्रसंगी दिल्या जाणा:या भेटवस्तू कापडी पिशवीत देण्याचा आग्रह धरेल. सांडपाण्याची विल्हेवाट व त्याचा पुनर्वापर करण्याबाबत योग्य पाऊल उचलण्यासाठी ग्रामसभेत विनंती करेल. जर गावाला, शहराला, नदीला व देशाला ‘आपले घर’ मानले तर माझा भारत स्वच्छ झालाच समजा ! मी करितो संकल्प असा, स्वच्छतेसाठी शोधेन पर्याय असा, घर, अंगण, गाव, नदी, स्वच्छ होईल असा, ‘स्वच्छ भारत’ स्वप्न साकारण्या घेतो वसा.