शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

सालार नगरला महामार्ग ओलांडण्यासाठी पर्याय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरणात अनेक समस्या उभ्या राहत आहे. चौपदरीकरणानंतर गाड्यांचा वेग वाढु शकतो. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरणात अनेक समस्या उभ्या राहत आहे. चौपदरीकरणानंतर गाड्यांचा वेग वाढु शकतो. त्यामुळे अपघात वाढण्याचीही शक्यता विचारात घेता सालार नगर वासियांनी भुयारी मार्गाची मागणी केली होती. मात्र ही मागणी लवकर पुर्ण होणे शक्य नसल्याने सालार नगरातून जाणाऱ्या जुन्या पुलाच्या खालूनच एक लेनचा रस्ता सुरू करून देणयाची मागणी करण्यात आली आहे. त्याबाबत नेमके काय होऊ शकते, याची पाहणी करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी सालार नगरात पर्याय काय मिळु शकतो, याची चाचपणी केली.

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रस्ताव बनल्यावर त्यात मिल्लतनगर, शिव कॉलनी आणि अग्रवाल चौक येथे भुयारी मार्ग करून देण्याची मागणी होत होती. त्यानुसार चेंज ऑफ स्कोपच्या दहा टक्के म्हणजे ६ कोटी रकमेतून शिव कॉलनी येथे भुयारी मार्ग करून देण्याचे निश्चीत करण्यात आले. तर अग्रवाल चौकात एक लहान बोगदा करून दिला जाणार आहे. मात्र सालार नगरच्या भुयारी मार्गासाठी जास्त निधीची गरज लागणार आहे. त्यामुळे सध्या हे शक्य नसल्याचे चित्र समोर येताच परिसरातील नागरिक फारुक शेख यांनी सध्याच्या पुलाखालून पाणी जाण्यासाठी तीन जागा आहेत. त्यातील एका लेनचा उपयोग हा रस्ता ओलांडता येऊ शकतो. त्यामुळे तेथे लहान एका लेनचा तरी रस्ता सुरू करून देण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, खासदार उन्मेश पाटील आणि इतरांना निवेदन देखील दिले होते. त्यानुसार आता महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी येथे नेमका कोणता पर्याय देता येऊ शकतो याची चाचपणी केली होती.