शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

‘कोरोना’नंतर काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 14:21 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘कोरोना’नंतर काय? याबाबत लिहिताहेत अभ्यासक तथा जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शाह...

जगभर अनेक पातळ्यांवर चाललेल्या चर्चेतून आणि बाहेर येणा-या माहितीतून आता हे स्पष्ट होत चालले आहे की, कोरोना हे नैसर्गिकरित्या आलेले संकट तर नाहीच नाही. पण मानवनिर्मित असले तरी एकमेकांवर कुरघोडी करायच्या राक्षसी महत्वाकांक्षेतून लादण्यात आले आहे. सगळ्या जगाची सर्वच स्तरावरची घडी विस्कटून टाकणा-या या संकटाने आपल्याला दु:खाच्या व आर्थिक नुकसानीच्या दरीत लोटून दिलेले आहे. ही लढाई शस्त्रे व सैन्य यातून लादलेली नसून रोगाचे विषाणू सोडून एकतर्फी सुरू झाली आहे. चीननेच हे संकट जगाच्या माथी लादले आहे. याला प्रत्यक्ष नव्हे पण घडलेल्या घटनांवरून बरेच अप्रत्यक्ष आधार मिळत आहेत. त्यावरून जागतिक रंगमंचावर अमेरिकेवर व एकूणच जगावर वर्चस्व गाजविण्याच्या अत्यंत महत्वाकांक्षी व कुटील कारस्थानांना रशिया व चीन यांनी मिळून १० वर्षाआधीच प्रारंभ केला आहे असे म्हणता येते.९ एप्रिल २०२० पर्यंत २१३ देशात १५ लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले असून, ८८ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सगळ्या विकसित देशांनी आज या संकटापुढे गुडघे टेकले आहेत. अविकसित देशांचीही तीच गत आहे.एकाचे संकट ही दुस-यासाठी संधी असतेच. हेच सूत्र वापरून दुस-यावर संकट आणण्यासाठी तंत्रज्ञान वापरून जागतिक मोठा आर्थिक घातपात घडवून आणायचा व त्यातून स्वत:चा प्रचंड फायदा करून घेत जगावर वर्चस्व गाजवायचे अशी ही रणनीती. सगळ्या जगात आर्थिक आघाडीवर प्रचंड मोठी पडझड होत असतांना चीनमध्ये मात्र वस्तूंचे उत्पादन व शेअर बाजार उसळी घेत आहेत. रशियामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नगण्य आहे. याचे कारण यामागे असलेले हे घातसूत्रच आहे.एक ना एक दिवस हे संकट जाईल यात कुणालाच संदेह नाही. पण प्रश्न आहे कधी आणि त्यानंतर काय? याचे काय काय परिणाम झाले आहेत व होणार आहेत?या संकटाने सा-या जगाला घरी बसून राहणे भाग पाडले. त्याच्या प्रादुभार्वातून कुणीच सुटले नाही. काही देशांचे प्रमुख, तर काही राजे, राजकन्या, राजघराणे इ. लोक बाधित झाले. त्यांनाही सामान्यांसारखेच आवश्यक औषधी व उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. हे काही सामान्य लोक नाहीत. म्हणजे या संकटाचा पहिला परिणाम म्हणून त्याने सगळ्यांना एका पातळीवर आणून ठेवले आहे. अगदी बलाढ्य अमेरिकेच्या अध्यक्षांपासून तर सामान्य भिक मागणारे सर्वच या संकटासमोर समान झाले आहेत.आता हयात ज्येष्ठ पिढीला विचारता इतके दिवस घरी बसून राहण्याबद्दल कुणालाही असा अनुभव कधीच आला नाही, हेच उत्तर मिळते आहे. हे सगळेच अनाकलनीय आहे. याआधी कधीही घडली नाही, अशी परिस्थिती जगासमोर समोर उभी ठाकली आहे. संकट काळी माणसे इतिहासाची मदत घेतात. पण इतिहासात अशी परिस्थिती कधीच न आल्यामुळे सगळ्यांना आता मागे बघण्याऐवजी पुढे पाहून आज काय करायचे ते आपापले डोके चालवून ठरवावे लागत आहे. उद्या काय होणार हे सांगताच येत नाही. हत्ती व सहा आंधळ्यांची गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. आजच्या संकटाचा हत्ती इतका मोठा व अवाढव्य आहे की जागतिक स्तरावरदेखील कुणालाच त्याच्या परिणामांबद्दल नक्की काहीच सांगता येत नाही. सगळेच आंधळे ठरले आहेत.आज ज्यांना ज्यांना घरी बसून संगणकाच्या मदतीने काम करणे शक्य आहे ते करीत आहेत. म्हणजे तंत्रज्ञान उपलब्ध आहे व ते काम करीत आहे. याचा अर्थ फक्त संगणक तंत्रज्ञान नव्हे; ते तर आता अगदी प्राथमिक गरज झाले आहे. संगणक व इंटरनेट या अगदी आवश्यक गरजा झाल्या आहेत. त्यापुढे जाऊन अनेक बाबींचे तंत्रज्ञान मदतीला येत आहे आणि त्याची व्याप्ती प्रचंड मोठी वाढणार आहे.घरी बसून काम करणे जमते आहे म्हणजे आॅफिसला जाण्याची गरज अत्यंत कमी होत जाणार. ज्या कंपन्यांना कर्मचा-यांसाठी प्रचंड मोठी जागा लागत होती तेथे आता अर्थातच जागा वापरण्याऐवजी घरून काम करण्याचीच प्रथा सुरू होईल. कार्यालयांची कामाची पद्धत बदलेल. म्हणजे कार्यालयीन जागांची गरज व मागणी प्रचंड प्रमाणात कमी होईल. निदान शहरी भागात तरी. शहरांच्या आसपासच्या भागात घरांची मागणी वाढेल. कारण शहरातल्या महागड्या जागा घेण्यापेक्षा थोडे लांब जाऊन स्वस्त घरे घेण्याकडे अर्थातच कल वाढेल.दुसरा परिणाम झाला आहे, तो म्हणजे आयुष्यात खरोखर काय गरजेचे आहे, त्याच्या प्राथमिकता या संकटाने बदलल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात फक्त दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठीच लोक घराबाहेर पडले. म्हणजे काय गरजेचे आहे याच्या भ्रामक संकल्पनामधून लोकांना बाहेर काढण्याचे मोठेच काम या संकटाने केले आहे. टीव्ही वरच्या किंवा छापील माध्यमातून येणा-या जाहिरातींवरही याचा मोठा परिणाम नक्कीच झाला आहे. पुढेही होईल.कुटुंबासोबत असणे किती महत्वाचे आहे, हे या संकटाने एकही शब्द न उच्चारता लहान थोरांना पक्के पटवून दिले आहे. काम मिळते म्हणून गाव वा शहराबाहेर, राज्याबाहेर, देशाबाहेर जाणा-यांना आता याचा नक्कीच विचार करावा लागेल. या संकटामुळे निर्माण झालेल्या भीतीचा पगडा लोकांच्या मनावर काही काळ तरी राहील.संकट काळात वापरायला पैसे हाताशी असायलाच हवेत. ही गरज कधी नव्हे इतकी लोकांच्या लक्षात आली आहे. म्हणजे ज्यातून लगेच पैसे हातात येतील अशा गोष्टीत गुंतवणुकीकडे कल वाढेल. आपटलेले शेअर बाजार हेच सांगत आहेत. भारतात लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सोन्याचे भाव उतरले. पण ते तसेच राहतील असे सांगणे धारिष्ट्याचे होईल. आता सोन्याचे भाव हा मोठ्ठाच अभ्यासाचा विषय झाला आहे. रोखीने व्यवहार ब-याच अडचणींमुळे अपरिहार्य होत आहेत. ते करू नका, असे सांगणे आता कठीण होईल. कारण ते टाळणेदेखील शक्य होणार नाही.काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध नाटककार कै.वसंत कानेटकर जळगावला आले होते. त्यांच्या जाहीर भाषणात ते म्हटले होते की, 'स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पिढीला कधीही युद्ध व त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले नाहीत म्हणून ही पिढी निर्धास्त, बेजबाबदार व बेगुमान झालेली आहे. त्यांनी एकदा तरी युद्धाच्या परिस्थितीचे चटके सोसल्याशिवाय त्यांना त्यांच्या सुखवस्तूपणाची जाणीव होणार नाही.' मला वाटते आताची परिस्थिती ही युद्धजन्यच आहे व युद्धाचेच अनुभव सगळ्यांना देणार आहे. (पूर्वार्ध)-सी.ए. अनिलकुमार शाह, जळगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव