शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

‘कोरोना’नंतर काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 14:21 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘कोरोना’नंतर काय? याबाबत लिहिताहेत अभ्यासक तथा जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शाह...

जगभर अनेक पातळ्यांवर चाललेल्या चर्चेतून आणि बाहेर येणा-या माहितीतून आता हे स्पष्ट होत चालले आहे की, कोरोना हे नैसर्गिकरित्या आलेले संकट तर नाहीच नाही. पण मानवनिर्मित असले तरी एकमेकांवर कुरघोडी करायच्या राक्षसी महत्वाकांक्षेतून लादण्यात आले आहे. सगळ्या जगाची सर्वच स्तरावरची घडी विस्कटून टाकणा-या या संकटाने आपल्याला दु:खाच्या व आर्थिक नुकसानीच्या दरीत लोटून दिलेले आहे. ही लढाई शस्त्रे व सैन्य यातून लादलेली नसून रोगाचे विषाणू सोडून एकतर्फी सुरू झाली आहे. चीननेच हे संकट जगाच्या माथी लादले आहे. याला प्रत्यक्ष नव्हे पण घडलेल्या घटनांवरून बरेच अप्रत्यक्ष आधार मिळत आहेत. त्यावरून जागतिक रंगमंचावर अमेरिकेवर व एकूणच जगावर वर्चस्व गाजविण्याच्या अत्यंत महत्वाकांक्षी व कुटील कारस्थानांना रशिया व चीन यांनी मिळून १० वर्षाआधीच प्रारंभ केला आहे असे म्हणता येते.९ एप्रिल २०२० पर्यंत २१३ देशात १५ लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले असून, ८८ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सगळ्या विकसित देशांनी आज या संकटापुढे गुडघे टेकले आहेत. अविकसित देशांचीही तीच गत आहे.एकाचे संकट ही दुस-यासाठी संधी असतेच. हेच सूत्र वापरून दुस-यावर संकट आणण्यासाठी तंत्रज्ञान वापरून जागतिक मोठा आर्थिक घातपात घडवून आणायचा व त्यातून स्वत:चा प्रचंड फायदा करून घेत जगावर वर्चस्व गाजवायचे अशी ही रणनीती. सगळ्या जगात आर्थिक आघाडीवर प्रचंड मोठी पडझड होत असतांना चीनमध्ये मात्र वस्तूंचे उत्पादन व शेअर बाजार उसळी घेत आहेत. रशियामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नगण्य आहे. याचे कारण यामागे असलेले हे घातसूत्रच आहे.एक ना एक दिवस हे संकट जाईल यात कुणालाच संदेह नाही. पण प्रश्न आहे कधी आणि त्यानंतर काय? याचे काय काय परिणाम झाले आहेत व होणार आहेत?या संकटाने सा-या जगाला घरी बसून राहणे भाग पाडले. त्याच्या प्रादुभार्वातून कुणीच सुटले नाही. काही देशांचे प्रमुख, तर काही राजे, राजकन्या, राजघराणे इ. लोक बाधित झाले. त्यांनाही सामान्यांसारखेच आवश्यक औषधी व उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. हे काही सामान्य लोक नाहीत. म्हणजे या संकटाचा पहिला परिणाम म्हणून त्याने सगळ्यांना एका पातळीवर आणून ठेवले आहे. अगदी बलाढ्य अमेरिकेच्या अध्यक्षांपासून तर सामान्य भिक मागणारे सर्वच या संकटासमोर समान झाले आहेत.आता हयात ज्येष्ठ पिढीला विचारता इतके दिवस घरी बसून राहण्याबद्दल कुणालाही असा अनुभव कधीच आला नाही, हेच उत्तर मिळते आहे. हे सगळेच अनाकलनीय आहे. याआधी कधीही घडली नाही, अशी परिस्थिती जगासमोर समोर उभी ठाकली आहे. संकट काळी माणसे इतिहासाची मदत घेतात. पण इतिहासात अशी परिस्थिती कधीच न आल्यामुळे सगळ्यांना आता मागे बघण्याऐवजी पुढे पाहून आज काय करायचे ते आपापले डोके चालवून ठरवावे लागत आहे. उद्या काय होणार हे सांगताच येत नाही. हत्ती व सहा आंधळ्यांची गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. आजच्या संकटाचा हत्ती इतका मोठा व अवाढव्य आहे की जागतिक स्तरावरदेखील कुणालाच त्याच्या परिणामांबद्दल नक्की काहीच सांगता येत नाही. सगळेच आंधळे ठरले आहेत.आज ज्यांना ज्यांना घरी बसून संगणकाच्या मदतीने काम करणे शक्य आहे ते करीत आहेत. म्हणजे तंत्रज्ञान उपलब्ध आहे व ते काम करीत आहे. याचा अर्थ फक्त संगणक तंत्रज्ञान नव्हे; ते तर आता अगदी प्राथमिक गरज झाले आहे. संगणक व इंटरनेट या अगदी आवश्यक गरजा झाल्या आहेत. त्यापुढे जाऊन अनेक बाबींचे तंत्रज्ञान मदतीला येत आहे आणि त्याची व्याप्ती प्रचंड मोठी वाढणार आहे.घरी बसून काम करणे जमते आहे म्हणजे आॅफिसला जाण्याची गरज अत्यंत कमी होत जाणार. ज्या कंपन्यांना कर्मचा-यांसाठी प्रचंड मोठी जागा लागत होती तेथे आता अर्थातच जागा वापरण्याऐवजी घरून काम करण्याचीच प्रथा सुरू होईल. कार्यालयांची कामाची पद्धत बदलेल. म्हणजे कार्यालयीन जागांची गरज व मागणी प्रचंड प्रमाणात कमी होईल. निदान शहरी भागात तरी. शहरांच्या आसपासच्या भागात घरांची मागणी वाढेल. कारण शहरातल्या महागड्या जागा घेण्यापेक्षा थोडे लांब जाऊन स्वस्त घरे घेण्याकडे अर्थातच कल वाढेल.दुसरा परिणाम झाला आहे, तो म्हणजे आयुष्यात खरोखर काय गरजेचे आहे, त्याच्या प्राथमिकता या संकटाने बदलल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात फक्त दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठीच लोक घराबाहेर पडले. म्हणजे काय गरजेचे आहे याच्या भ्रामक संकल्पनामधून लोकांना बाहेर काढण्याचे मोठेच काम या संकटाने केले आहे. टीव्ही वरच्या किंवा छापील माध्यमातून येणा-या जाहिरातींवरही याचा मोठा परिणाम नक्कीच झाला आहे. पुढेही होईल.कुटुंबासोबत असणे किती महत्वाचे आहे, हे या संकटाने एकही शब्द न उच्चारता लहान थोरांना पक्के पटवून दिले आहे. काम मिळते म्हणून गाव वा शहराबाहेर, राज्याबाहेर, देशाबाहेर जाणा-यांना आता याचा नक्कीच विचार करावा लागेल. या संकटामुळे निर्माण झालेल्या भीतीचा पगडा लोकांच्या मनावर काही काळ तरी राहील.संकट काळात वापरायला पैसे हाताशी असायलाच हवेत. ही गरज कधी नव्हे इतकी लोकांच्या लक्षात आली आहे. म्हणजे ज्यातून लगेच पैसे हातात येतील अशा गोष्टीत गुंतवणुकीकडे कल वाढेल. आपटलेले शेअर बाजार हेच सांगत आहेत. भारतात लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सोन्याचे भाव उतरले. पण ते तसेच राहतील असे सांगणे धारिष्ट्याचे होईल. आता सोन्याचे भाव हा मोठ्ठाच अभ्यासाचा विषय झाला आहे. रोखीने व्यवहार ब-याच अडचणींमुळे अपरिहार्य होत आहेत. ते करू नका, असे सांगणे आता कठीण होईल. कारण ते टाळणेदेखील शक्य होणार नाही.काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध नाटककार कै.वसंत कानेटकर जळगावला आले होते. त्यांच्या जाहीर भाषणात ते म्हटले होते की, 'स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पिढीला कधीही युद्ध व त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले नाहीत म्हणून ही पिढी निर्धास्त, बेजबाबदार व बेगुमान झालेली आहे. त्यांनी एकदा तरी युद्धाच्या परिस्थितीचे चटके सोसल्याशिवाय त्यांना त्यांच्या सुखवस्तूपणाची जाणीव होणार नाही.' मला वाटते आताची परिस्थिती ही युद्धजन्यच आहे व युद्धाचेच अनुभव सगळ्यांना देणार आहे. (पूर्वार्ध)-सी.ए. अनिलकुमार शाह, जळगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव