शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बहुप्रतीक्षित विमानसेवेची स्वप्नपूर्ती, जळगाव-मुंबई विमानसेवेचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:42 IST

पहिल्याच दिवशी अडीच तास विलंब

ठळक मुद्दे दुस-या टप्प्यात राज्यातील आणखी 5 शहरांमध्ये विमानसेवास्वप्न झाल्याचा आनंद

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23- बहुप्रतीक्षित अशा विमानसेवेची शनिवारी स्वप्नपूर्ती झाली. जळगाव ते मुंबई हे प्रवासी विमान जळगाव विमानतळावर दुपारी 3.48 वाजता पोहचताच जळगावकरांनी जल्लोषात स्वागत केले. पहिल्याच दिवशी विमानाला अडीच तास विलंब झाला. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिक ताटकळले होते.  कंटाळलेले काही लोकप्रतिनिधी शुभारंभापूर्वीच विमानतळावरुन रवाना झाले.गेल्या अनेक वर्षापासून जळगावकरांचे विमानसेवेचे स्वप्न होते. अखेर शनिवार, 23 रोजी जळगावकरांची स्वप्नपूर्ती झाली. मुंबई ते जळगाव हे एअर डेक्कनच्या विमानाचे शनिवारी दुपारी 1.15 वाजता आगमन होणार होते, ते तब्बल अडीच तास म्हणजेच 3.48 वाजता जळगाव विमानतळावर पोहचले. मुंबई विमानतळावर स्लॉट न मिळाल्याने विमानास विलंब झाला.  या विमानातूनच आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते हिरवी ङोंडी दाखवून विमानसेवेचा शुभारंभ झाला. यावेळी एअर डेक्कनचे संचालक कॅप्टन जी.आर. गोपीनाथ, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए.टी. पाटील, महापौर ललित कोल्हे, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्‍जवला पाटील, जैन उद्योग समुहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, विमानतळ विकास प्राधिकरणचे महाव्यवस्थापक विकास चंद्रा यांच्यासह एअर डेक्कनचे अधिकारी व शहरातील उद्योजक, व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.राज्यातील 15 लहान शहरांमध्ये विमानसेवासर्वसामान्यांना विमानाद्वारे प्रवास करता यावा, यासाठी केंद्र शासनाच्या उडान या योजनेद्वारे महाराष्ट्रातील जळगावसह 10 शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात विमानसेवा सुरु होत आहे. शनिवार, 23 रोजी जळगावातून विमानसेवेचा प्रारंभ झाला. दुस-या टप्प्यात राज्यातील आणखी 5 शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

भवरलाल जैन व माङो विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाले..जळगावात आज विमानसेवेचा शुभारंभ झाला. मुंबई येथे जाण्यासाठी जळगावातून दररोज एक विमान असेल. वर्षभरानंतर दोन विमाने सोडण्यात येतील. सर्वसामान्यांना विमानसेवा मिळावी ही जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन व माङो स्वप्न होते. ते आज पूर्ण झाल्याचा आनंद यावेळी एअर डेक्कनचे संचालक कॅ.गोपीनाथ यांनी व्यक्त केला. जळगाव सारख्या लहान शहरांमध्ये विमानसेवा सुरु होण्यासाठी मुंबई विमानतळावर 25 टक्के रिजनल कनेक्टीव्हीटी मिळणे आवश्यक आहे. ती मिळाल्यास राज्यभरातील अनेक शहरांमध्ये विमानसेवा सुरु करता येईल, असेही कॅ.गोपीनाथ यावेळी म्हणाले.