शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

बहुप्रतीक्षित विमानसेवेची स्वप्नपूर्ती, जळगाव-मुंबई विमानसेवेचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:42 IST

पहिल्याच दिवशी अडीच तास विलंब

ठळक मुद्दे दुस-या टप्प्यात राज्यातील आणखी 5 शहरांमध्ये विमानसेवास्वप्न झाल्याचा आनंद

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23- बहुप्रतीक्षित अशा विमानसेवेची शनिवारी स्वप्नपूर्ती झाली. जळगाव ते मुंबई हे प्रवासी विमान जळगाव विमानतळावर दुपारी 3.48 वाजता पोहचताच जळगावकरांनी जल्लोषात स्वागत केले. पहिल्याच दिवशी विमानाला अडीच तास विलंब झाला. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिक ताटकळले होते.  कंटाळलेले काही लोकप्रतिनिधी शुभारंभापूर्वीच विमानतळावरुन रवाना झाले.गेल्या अनेक वर्षापासून जळगावकरांचे विमानसेवेचे स्वप्न होते. अखेर शनिवार, 23 रोजी जळगावकरांची स्वप्नपूर्ती झाली. मुंबई ते जळगाव हे एअर डेक्कनच्या विमानाचे शनिवारी दुपारी 1.15 वाजता आगमन होणार होते, ते तब्बल अडीच तास म्हणजेच 3.48 वाजता जळगाव विमानतळावर पोहचले. मुंबई विमानतळावर स्लॉट न मिळाल्याने विमानास विलंब झाला.  या विमानातूनच आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते हिरवी ङोंडी दाखवून विमानसेवेचा शुभारंभ झाला. यावेळी एअर डेक्कनचे संचालक कॅप्टन जी.आर. गोपीनाथ, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए.टी. पाटील, महापौर ललित कोल्हे, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्‍जवला पाटील, जैन उद्योग समुहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, विमानतळ विकास प्राधिकरणचे महाव्यवस्थापक विकास चंद्रा यांच्यासह एअर डेक्कनचे अधिकारी व शहरातील उद्योजक, व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.राज्यातील 15 लहान शहरांमध्ये विमानसेवासर्वसामान्यांना विमानाद्वारे प्रवास करता यावा, यासाठी केंद्र शासनाच्या उडान या योजनेद्वारे महाराष्ट्रातील जळगावसह 10 शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात विमानसेवा सुरु होत आहे. शनिवार, 23 रोजी जळगावातून विमानसेवेचा प्रारंभ झाला. दुस-या टप्प्यात राज्यातील आणखी 5 शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

भवरलाल जैन व माङो विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाले..जळगावात आज विमानसेवेचा शुभारंभ झाला. मुंबई येथे जाण्यासाठी जळगावातून दररोज एक विमान असेल. वर्षभरानंतर दोन विमाने सोडण्यात येतील. सर्वसामान्यांना विमानसेवा मिळावी ही जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन व माङो स्वप्न होते. ते आज पूर्ण झाल्याचा आनंद यावेळी एअर डेक्कनचे संचालक कॅ.गोपीनाथ यांनी व्यक्त केला. जळगाव सारख्या लहान शहरांमध्ये विमानसेवा सुरु होण्यासाठी मुंबई विमानतळावर 25 टक्के रिजनल कनेक्टीव्हीटी मिळणे आवश्यक आहे. ती मिळाल्यास राज्यभरातील अनेक शहरांमध्ये विमानसेवा सुरु करता येईल, असेही कॅ.गोपीनाथ यावेळी म्हणाले.