शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

वेबसाईट हँग झाल्याने भावी सदस्य बसले ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - ग्राम पंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची बुधवारी शेवटची मुदत आहे. मात्र, ऑनलाईन अर्ज दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - ग्राम पंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची बुधवारी शेवटची मुदत आहे. मात्र, ऑनलाईन अर्ज दाखल करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. मंगळवारी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची वेबसाईट दुपारी २ वाजेनंतर बंद पडल्यामुळे उमेदवारांना रात्री उशीरापर्यंत सायबर कॅफेवर ताटकळत बसावे लागले. विशेष म्हणजे बुधवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा शेवटचा दिवस असून, वेबसाईटला पुन्हा अडचणी निर्माण झाल्यास अनेकांचे अर्ज दाखल होवू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने ३१ पर्यंत मुदतवाढ करावी अशी मागणी आता इच्छुक उमेदवारांकडून केली जात आहे.

ग्राम पंचायत निवडणुकांची धामधुम सुरु झाली आहे. २३ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मात्र, कागदपत्रांची जुळवा-जुळवमध्येच उमेदवारांचे सुरुवातीचे दिवस वाया गेले. त्यातच नाताळसह आलेल्या तीन दिवसाच्या शासकीय सुट्ट्यांमुळे अर्ज दाखल करता आले नाहीत. शेवटचे तीन दिवस शिल्लक असतानाच उमेदवारांची लगीनघाई सुरु झाली आहे. एकत्र लोड येत असल्याने वेबसाईट बंद पडत असल्याचे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, या अडचणी कायम राहिल्यास शेवटच्या दिवशी देखील इच्छुकांना आपले अर्ज दाखल करणे कठीण होणार आहे.

समाजकल्याणची वेबसाईटही बंद

ग्राम पंचायत निवडणुकीसाठी जातवैधता पडताळणी दाखला देखील आवश्यक आहे. यासाठी कागदपत्रे टाकल्याची पावती तरी उमेदवारांना द्यावी लागते. मात्र, अनेक उमेदवारांकडे हे प्रमाणपत्र नाही. त्यातच समाजकल्याण विभागाची वेबसाईट देखील बंद पडल्याने हे प्रमाणपत्र देखील इच्छुकांना काढता आलेले नाही. यामुळे इच्छुकांकडून चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

तहान-भूक विसरून उमेदवार कागदपत्रांच्या जुळवा-जुळवमध्ये व्यस्त

तहसील कार्यालय परिसराला मंगळवारी यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना ऑनलाईन प्रक्रियेला अडचणी येत असल्याने इच्छुकांची कागदपत्रांसाठी चांगलीच पळापळ सुरु होती. सायबर कॅफेवर तहान-भुक विसरुन इच्छुक दिवसभर ताटकळत बसले होते. त्यातच रात्री वेबसाईट वेगाने चालत असल्याने रात्री उशीरापर्यंतही थांबण्याची तयारी उमेदवारांची होती. मात्र, संचारबंदीच्या नियमांमुळे सायबर कॅफे चालकांनी कॅफे रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवण्यास नकार दिल्याने अडचणी निर्माण झाल्या.