शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

'परिसंस्थेच्या पुनर्स्थापने' साठी वर्षभर काम करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पंचतत्त्वाचाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा अभियाना’त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पंचतत्त्वाचाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा अभियाना’त जिल्ह्याने मिळविलेल्या यशात सर्वांचा सहभाग आहे. हे अभियान संपले असले तरी वर्षभर अभियान पातळीवरच काम केले जाणार असून याद्वारे ‘परिसंस्थेची पुनर्स्थापना’ या पर्यावरण दिनाच्या ब्रीद वाक्यानुसारच वर्षभर काम केले जाईल, असा मनोदय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला आहे.

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले. यामध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचातत्त्वावर आधारित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची पाच गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी पर्यावरणदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने झाला. यामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजित राऊत व सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांचा गौरव करण्यात आला.

या यशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हावासीयांचे अभिनंदन करीत सांगितले की, या स्पर्धेसाठी अधिकारी, कर्मचारी, सामान्य नागरिक या सर्वांचे सहकार्य लाभले, त्यामुळेच जिल्हा या अभियानात आपली छाप पाडू शकला. हे अभियान थांबले असले तरी यात सातत्य राखून अभियान म्हणूनच यापुढेही पर्यावरण संवर्धनाचे काम सुरू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

‘वन आणि वन्य’साठी काम

यंदाच्या पर्यावरण दिनाचे ब्रीद वाक्य परिसंस्थेची पुनर्स्थापना असे आहे. या ब्रीद वाक्यानुसारच काम केले जाणार असून वन तसेच वन्यजीव अशा दोन्ही पातळीवर भर देऊन पर्यावरण व वातावरणीय बदल यादृष्टीने वर्षभर कामे करण्यात येतील. यासाठी सर्वांचा सहभागदेखील महत्त्वाचा राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.