शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

'परिसंस्थेच्या पुनर्स्थापने' साठी वर्षभर काम करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पंचतत्त्वाचाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा अभियाना’त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पंचतत्त्वाचाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा अभियाना’त जिल्ह्याने मिळविलेल्या यशात सर्वांचा सहभाग आहे. हे अभियान संपले असले तरी वर्षभर अभियान पातळीवरच काम केले जाणार असून याद्वारे ‘परिसंस्थेची पुनर्स्थापना’ या पर्यावरण दिनाच्या ब्रीद वाक्यानुसारच वर्षभर काम केले जाईल, असा मनोदय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला आहे.

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले. यामध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचातत्त्वावर आधारित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची पाच गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी पर्यावरणदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने झाला. यामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजित राऊत व सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांचा गौरव करण्यात आला.

या यशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हावासीयांचे अभिनंदन करीत सांगितले की, या स्पर्धेसाठी अधिकारी, कर्मचारी, सामान्य नागरिक या सर्वांचे सहकार्य लाभले, त्यामुळेच जिल्हा या अभियानात आपली छाप पाडू शकला. हे अभियान थांबले असले तरी यात सातत्य राखून अभियान म्हणूनच यापुढेही पर्यावरण संवर्धनाचे काम सुरू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

‘वन आणि वन्य’साठी काम

यंदाच्या पर्यावरण दिनाचे ब्रीद वाक्य परिसंस्थेची पुनर्स्थापना असे आहे. या ब्रीद वाक्यानुसारच काम केले जाणार असून वन तसेच वन्यजीव अशा दोन्ही पातळीवर भर देऊन पर्यावरण व वातावरणीय बदल यादृष्टीने वर्षभर कामे करण्यात येतील. यासाठी सर्वांचा सहभागदेखील महत्त्वाचा राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.