शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

'परिसंस्थेच्या पुनर्स्थापने' साठी वर्षभर काम करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पंचतत्त्वाचाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा अभियाना’त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पंचतत्त्वाचाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा अभियाना’त जिल्ह्याने मिळविलेल्या यशात सर्वांचा सहभाग आहे. हे अभियान संपले असले तरी वर्षभर अभियान पातळीवरच काम केले जाणार असून याद्वारे ‘परिसंस्थेची पुनर्स्थापना’ या पर्यावरण दिनाच्या ब्रीद वाक्यानुसारच वर्षभर काम केले जाईल, असा मनोदय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला आहे.

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले. यामध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचातत्त्वावर आधारित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची पाच गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी पर्यावरणदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने झाला. यामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजित राऊत व सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांचा गौरव करण्यात आला.

या यशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हावासीयांचे अभिनंदन करीत सांगितले की, या स्पर्धेसाठी अधिकारी, कर्मचारी, सामान्य नागरिक या सर्वांचे सहकार्य लाभले, त्यामुळेच जिल्हा या अभियानात आपली छाप पाडू शकला. हे अभियान थांबले असले तरी यात सातत्य राखून अभियान म्हणूनच यापुढेही पर्यावरण संवर्धनाचे काम सुरू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

‘वन आणि वन्य’साठी काम

यंदाच्या पर्यावरण दिनाचे ब्रीद वाक्य परिसंस्थेची पुनर्स्थापना असे आहे. या ब्रीद वाक्यानुसारच काम केले जाणार असून वन तसेच वन्यजीव अशा दोन्ही पातळीवर भर देऊन पर्यावरण व वातावरणीय बदल यादृष्टीने वर्षभर कामे करण्यात येतील. यासाठी सर्वांचा सहभागदेखील महत्त्वाचा राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.