शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

आम्ही आमच्या गावाचा विकास करण्यास सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका हद्दीत जावून पिंप्राळा परिसर असो वा मेहरूण भाग त्या भागात देखील अजूनही विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिका हद्दीत जावून पिंप्राळा परिसर असो वा मेहरूण भाग त्या भागात देखील अजूनही विकास झालेला नाही. तसेच जळगाव शहरातील रस्त्यांची स्थिती पाहिली तर एखाद्या खेडेगावापेक्षाही खराब स्थिती जळगाव शहराची झाली आहे. त्यामुळे जळगाव शहराची स्थिती सत्ताधाऱ्यांनी सुधारण्याकडे लक्ष द्यायला हवे, हद्दवाढीसारखे ठराव सत्ताधाऱ्यांनी करू नयेत, महानगरपालिका जर पिंपरी-चिंचवड सारखी राहिली तर हद्दवाढीचा विचार होवू शकतो. मात्र, जी महापालिका हद्दीत असलेल्या कॉलन्यांचा विकास करू शकत नाही. ती महापालिका आमच्या गावांचा काय विकास करेल अशा संतप्त प्रतिक्रिया देत सावखेडा ग्रामस्थांनी देखील मनपा हद्दवाढीचा प्रस्तावाला विरोध केला आहे.

सावखेडा हे गाव जळगाव शहरापासून ६ किमीच्या अंतरावर आहे. तसेच लहानशे खेडे असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास बऱ्यापैकी होत असून, त्यात महापालिकेच्या हद्दीत गावाचा समावेश झाला तर नागरिकांना लहानलहान अडचणी सोडविण्यासाठी इतर महापालिकेत जावे लागेल. तसेच जळगाव शहरातील नागरिकच आता महापालिकेला कंटाळले असून, महापालिकेपेक्षा एखाद्या गावाची ग्रामपंचायतच चांगली असते असे जळगावकर म्हणत आहेत. अशा परिस्थितीत आमच्या गावाचा समावेश महापालिका हद्दीत होवू देणार नाही अशी भूमिका सावखेडा ग्रामस्थांनी घेतली आहे.

ठराव रद्द केलाच पाहिजे, आमचा विरोध राहणारच

कोणत्याही परिस्थितीत सावखेडा गावाचा समावेश जळगाव महापालिकेच्या हद्दीत होवू देणार नाही अशी भूमिका सावखेडा ग्रामस्थांनी घेतली असून, मनपातील सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव रद्द करावा. तसेच हा ठराव रद्द न केल्यास महापालिकेच्या इमारतीवर मोर्चा आणला जाईल असा इशारा सावखेडा गामस्थांनी दिला आहे.

कोट..

सावखेडा गावाचा सर्वांगिन विकास करायला आमची ग्रामपंचायत पुर्णपणे सक्षम आहे. महापालिकेच्या हद्दीत जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. महापालिका ठराव करू शकते, तर आमची ग्रामपंचायत देखील महापालिकेत न जाण्याचा ठराव करू शकते. त्यामुळे आमच्या गावातील नागरिकांचा मनपा हद्दीत जाण्यास विरोध आहे.

-भगवान पाटील, सरपंच

बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, शेतकऱ्यांची जमिनी हडपण्याचा हा डाव आहे. मात्र, आम्ही ग्रामस्थ या ठरावाला कडाडून विरोध करू. पालकमंत्र्यांकडे याबाबतचे निवेदन देवून हा ठराव रद्द करण्यासाठी प्रयत्न करु.

-मंगेश पानपाटील, सदस्य, ग्रामपंचायत

सावखेडा गावाचा विकास हा जळगाव शहरापेक्षा बराच चांगला आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत आहेत. अशा परिस्थितीत जळगाव शहराचा हद्दीत गावाचा समावेश झाला तर आमच्या गावाचे गावपण कायमचे हरवून जाईल. त्यामुळे मनपाच्या ठरावाला आमचा विरोध आहे.

- रिता पवार, सदस्या, ग्रामपंचायत

जळगाव शहराचा नागरिकांना सुविधा मिळत नाही, आणि महापालिका हद्दीत इतर गावांचा समावेश करण्याचा ठराव करणे म्हणजे, स्वत:चे मुलं सांभाळता येत नाही आणी दुसऱ्यांचे मुलं दत्तक घेण्यासारखेच आहे. आधी जळगाव शहराचा विकास सत्ताधाऱ्यांनी करावा त्यानंतरच हद्दवाढीचा विचार केला पाहिजे.

-उत्तम चौधरी, ग्रामस्थ, सावखेडा