शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

आम्ही आमच्या गावाचा विकास करण्यास सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका हद्दीत जावून पिंप्राळा परिसर असो वा मेहरूण भाग त्या भागात देखील अजूनही विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिका हद्दीत जावून पिंप्राळा परिसर असो वा मेहरूण भाग त्या भागात देखील अजूनही विकास झालेला नाही. तसेच जळगाव शहरातील रस्त्यांची स्थिती पाहिली तर एखाद्या खेडेगावापेक्षाही खराब स्थिती जळगाव शहराची झाली आहे. त्यामुळे जळगाव शहराची स्थिती सत्ताधाऱ्यांनी सुधारण्याकडे लक्ष द्यायला हवे, हद्दवाढीसारखे ठराव सत्ताधाऱ्यांनी करू नयेत, महानगरपालिका जर पिंपरी-चिंचवड सारखी राहिली तर हद्दवाढीचा विचार होवू शकतो. मात्र, जी महापालिका हद्दीत असलेल्या कॉलन्यांचा विकास करू शकत नाही. ती महापालिका आमच्या गावांचा काय विकास करेल अशा संतप्त प्रतिक्रिया देत सावखेडा ग्रामस्थांनी देखील मनपा हद्दवाढीचा प्रस्तावाला विरोध केला आहे.

सावखेडा हे गाव जळगाव शहरापासून ६ किमीच्या अंतरावर आहे. तसेच लहानशे खेडे असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास बऱ्यापैकी होत असून, त्यात महापालिकेच्या हद्दीत गावाचा समावेश झाला तर नागरिकांना लहानलहान अडचणी सोडविण्यासाठी इतर महापालिकेत जावे लागेल. तसेच जळगाव शहरातील नागरिकच आता महापालिकेला कंटाळले असून, महापालिकेपेक्षा एखाद्या गावाची ग्रामपंचायतच चांगली असते असे जळगावकर म्हणत आहेत. अशा परिस्थितीत आमच्या गावाचा समावेश महापालिका हद्दीत होवू देणार नाही अशी भूमिका सावखेडा ग्रामस्थांनी घेतली आहे.

ठराव रद्द केलाच पाहिजे, आमचा विरोध राहणारच

कोणत्याही परिस्थितीत सावखेडा गावाचा समावेश जळगाव महापालिकेच्या हद्दीत होवू देणार नाही अशी भूमिका सावखेडा ग्रामस्थांनी घेतली असून, मनपातील सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव रद्द करावा. तसेच हा ठराव रद्द न केल्यास महापालिकेच्या इमारतीवर मोर्चा आणला जाईल असा इशारा सावखेडा गामस्थांनी दिला आहे.

कोट..

सावखेडा गावाचा सर्वांगिन विकास करायला आमची ग्रामपंचायत पुर्णपणे सक्षम आहे. महापालिकेच्या हद्दीत जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. महापालिका ठराव करू शकते, तर आमची ग्रामपंचायत देखील महापालिकेत न जाण्याचा ठराव करू शकते. त्यामुळे आमच्या गावातील नागरिकांचा मनपा हद्दीत जाण्यास विरोध आहे.

-भगवान पाटील, सरपंच

बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, शेतकऱ्यांची जमिनी हडपण्याचा हा डाव आहे. मात्र, आम्ही ग्रामस्थ या ठरावाला कडाडून विरोध करू. पालकमंत्र्यांकडे याबाबतचे निवेदन देवून हा ठराव रद्द करण्यासाठी प्रयत्न करु.

-मंगेश पानपाटील, सदस्य, ग्रामपंचायत

सावखेडा गावाचा विकास हा जळगाव शहरापेक्षा बराच चांगला आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत आहेत. अशा परिस्थितीत जळगाव शहराचा हद्दीत गावाचा समावेश झाला तर आमच्या गावाचे गावपण कायमचे हरवून जाईल. त्यामुळे मनपाच्या ठरावाला आमचा विरोध आहे.

- रिता पवार, सदस्या, ग्रामपंचायत

जळगाव शहराचा नागरिकांना सुविधा मिळत नाही, आणि महापालिका हद्दीत इतर गावांचा समावेश करण्याचा ठराव करणे म्हणजे, स्वत:चे मुलं सांभाळता येत नाही आणी दुसऱ्यांचे मुलं दत्तक घेण्यासारखेच आहे. आधी जळगाव शहराचा विकास सत्ताधाऱ्यांनी करावा त्यानंतरच हद्दवाढीचा विचार केला पाहिजे.

-उत्तम चौधरी, ग्रामस्थ, सावखेडा