शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

आम्ही रक्तदान करतोच.. तुम्हीही करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST

चाळीसगाव : आपल्याकडील काहीतरी देण्याने कुणाचे तरी प्राण वाचत असतील तर ते दान सर्वोच्च ठरते. म्हणूनच रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान ...

चाळीसगाव : आपल्याकडील काहीतरी देण्याने कुणाचे तरी प्राण वाचत असतील तर ते दान सर्वोच्च ठरते. म्हणूनच रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटले आहे. आम्ही रक्तदान करतोच.. तुम्हीदेखील करा, असा संदेश नियमितपणे रक्तदान करणाऱ्या तरुण मित्रांनी सोमवारी रक्तदातादिनी रक्तदान करून दिलाय. चाळीसगाव परिसरात ‘ब्लडमॅन’ अशी ओळख अधोरेखित झालेले पंकज देसले हे येथील तरुणाईत रक्तदानाचे महत्त्व मोठ्या तळमळीने रुजवत आहेत. त्यांनी ‘लाइफ सेव्हर्स’ ग्रुपच्या माध्यमातून दोन हजारांहून अधिक रक्तदात्यांची साखळी जोडली आहे. कोरोनाकाळातही अनेक गरजू रुग्णांसाठी या रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

कोरोनाकाळात १५० रुग्णांना जीवनदान

सोशल माध्यमाव्दारे पंकज पाटील यांनी रक्तदात्यांची मोठी साखळी जोडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कुठेही प्रसिद्धीसाठी चढाओढ न करता त्यांनी हे काम सुरू ठेवले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या खडतर काळात त्यांनी १५० रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिले. त्यांचे प्राण वाचविले आहे.

दीपक पाटील

हे कोदगाव येथील रहिवासी आहेत. आजवर त्यांनी २२ वेळा रक्तदान केले आहे. सोमवारीही त्यांनी रक्तदान करून रक्तदातादिन साजरा केला. ते सांगतात, ग्रामीण भागात रक्तदानाविषयी वेगवेगळे गैरसमज आहे. ज्याची प्रकृती चांगली आहे, असा कुणीही रक्तदान करू शकतो. रक्तदानाने माणुसकी धर्म जपला जातो. रुग्णांचे प्राण रक्तदानाने परत येतात. हे मोठे सामाजिक कामच आहे. सेवादेखील आहे.

......

राहुल वाकलकर

यांचा रक्तगट ‘ओ’ निगेटिव्ह आहे. हा रक्तगट दुर्मीळ असल्याने रात्री-अपरात्री राहुल वाकलकर अटीतटीच्या प्रसंगी रक्तदानास तयार असतात. दुर्मीळ रक्तगट असल्याने ते नियमितपणे रक्तदान करीत नाही. मात्र त्यांच्या रक्तगटाची आवश्यकता असल्यास ते तात्काळ रक्तदानासाठी स्वेच्छेने येतात. वाकलकर सांगतात, रक्तदानाने शरीर सुदृढ होते. तरुणांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे.

.........

राकेश बोरसे

हे आश्रमशाळेत शिक्षक असून, सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी सहभागी होतात. दर तीन महिन्यांनी ते आवर्जून रक्तदान करतात. आतापर्यंत ३० ते ३५ वेळा रक्तदान केले आहे. रक्तदान शिबिरेही त्यांनी भरवली आहेत. ‘रक्तदान करताना आणि केल्यानंतरदेखील कोणताही त्रास होत नाही. न घाबरता प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. नियमितपणे रक्तदान केल्यास शरीर सुदृढ बनते’, असे बोरसे सर्वांना सांगतात.

.....

उदय सोनार

यांचा रक्तगटही दुर्मीळ आहे. त्यामुळे अटीतटीच्या प्रसंगी ते सहज रक्तदानासाठी तयार असतात. त्यांचा रक्तगट ‘ए’ निगेटिव्ह आहे. ३०हून अधिकवेळा त्यांनी रक्तदान केले आहे. सोनार सांगतात, माझा रक्तगट दुर्मीळ आहे. त्यामुळे कठीणप्रसंगी कुणाचेही प्राण वाचवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे प्रत्येकाने दिलखुलासपणे रक्तदान करावे. यात घाबरण्यासारखे काहीही नाही.

.......

शांताराम पाटील

यांनी आजपर्यंत ४० वेळा रक्तदान केले आहे. तीन महिन्यांनी न चुकता रक्तदान करण्याचा संकल्पच त्यांनी केला आहे. रक्तदान शिबिरांमध्ये तरुणांना रक्तदानासाठी ते प्रोत्साहनही देतात. पाटील सांगतात, वृक्षांमुळे प्राणवायू मिळतो, तर रक्तदानाने कुणाचे तरी प्राण वाचतात. म्हणूनच वृक्ष लागवड व रक्तदान चळवळ आजच्या काळात गरजेच्या झाल्या आहेत. सोमवारी रक्तदातादिनी त्यांनी रक्तदान केले.