शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

मन्याड धरण भरण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 23:27 IST

२२ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला : मन्याड आणि गिरणाला पूर येण्याच्या भीतीने सतर्कतेचा इशारा

चाळीसगाव / आडगाव : मन्याड धरणाच्या वरील क्षेत्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने हे धरण ९० टक्के भरले आहे. लवकरच हे धरण पूर्ण भरुन धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्याने मन्याड तसेच गिरणा नदी काढावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मन्याड नदी ही सायगाव येथून जात असल्याने गिरणा नदीसही केव्हाही पूर येऊ शकतो. यामुळे नांन्द्रे, अलवाडी, सायगाव, पिलखोड, प्रिंपी, टाकळी प्र. दे, उंबरखेड, डोण, ब्राम्हणशेवगे आदी गावे या नदीच्या काठावर असल्याने या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान धरण भरल्याने परिसरातील २२ गावांना शेती व पिण्याच्या प्रश्न अवलंबून आहे. हा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.पाटबंधारे विभागाने आत्तापासूनच नियोजन करावेगेल्या वर्षी परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झाले व धरणही भरले डिसेंबर/जानेवारी पर्यंत विहिरींचे पाणी पुरेल म्हणून शेतकºयांनी पाटबंधारे विभागाला संक्रात नंतर पहिले आवर्तन सोडण्याचे सुचवले होते. परंतु गेल्या दोन/तीन वषार्पासून रिकामा असलेला पाट व त्यात वाढलेले गवत आणि काटेरी झुडूपे वेळेवर मजूर मिळत नसल्याने घाईगर्दीत झालेली पाटाची साफसफाई आदीमुळे २१ ते २२ जानेवारीला पहिले आवर्तन सोडले असता मध्येच वांद्रे गावाजवळ पाटफुटला. त्यामुळे दुरूस्ती साठी पुन्हा पाट ९ते १० दिवसासाठी बंद करावा लागला त्यामुळे १५ जानेवारीला सुटणारे आवर्तन फेब्रुवारीच्या पहिल्या आठड्यात सोडण्यात आले. यामध्ये विहिरीं एकदम आटल्या. सर्व शेतकरी पाणी पाणी करू लागले. शेतकºयांना दुसरे आवर्तन देतांना खुप उशीर झाला त्यामुळे पाणी असूनही निव्वळ नियोजनाअभावी हातचा हंगाम वाया गेला. ही चुक पूंन्हा होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने आत्तापासूनच पाटाची साफसफाई करून हंगामी कर्मचारी वाढवून घ्यावे व धरणांतील सांडव्याद्वारे वाया जाणारे पाणी पाटचारींना सोडावे अशी मागणी होऊ लागली आहे.