शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

कुसुंब्यात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:17 IST

गावकऱ्यांचे हाल : नियोजना अभावी १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराला लागून ...

गावकऱ्यांचे हाल : नियोजना अभावी १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराला लागून असलेल्या कुसुंब्यात गेल्या अनेक वर्षांपासून असलेली पाण्याची समस्या आजही जैसे थे आहे. गावाच्या वाढत्या लोकसंख्येनुसार विहिरींचे पाणी अपूर्ण पडत असल्यामुळे आणि त्यात वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे गावात १० ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.

कुसुंबा गावासाठी दोन विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या विहिरींमधून सुरुवातीला गावात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी भरले जाते. त्यानंतर एकूण ४५ ‘व्हॉल’द्वारे प्रत्येक परिसरात एक तास या प्रमाणे दिवसभरात तीन ‘व्हॉल’ सोडले जात आहेत. दिवसभरात तीन या प्रमाणे पंधरा दिवसात संपूर्ण ४५ ‘व्हॉल’द्वारे गावात पाणीपुरवठा केला जात आहे.

इन्फो :

गावाच्या लोकसंख्येनुसार विहिरींचे पाणी पुरेना

गेल्या काही वर्षांत कुसुंबा गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सद्य:स्थितीला गावाची लोकसंख्या दहा ते बारा हजारांच्या घरात पोहचली आहे. मात्र, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही विहिरींचे स्त्रोत अपूर्ण पडत आहे. एक टाकी भरण्यासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागतो. टाकीची साठवण क्षमताही कमी असल्यामुळे टाकी भरल्यानंतर दोन्ही टाकी मिळून फक्त तीनच ‘व्हॉल’चा पाणीपुरवठा होत आहे.

विजेच्या समस्यांमुळे टाकी भरेना

एक टाकी भरण्यासाठी ६ ते ७ तासांचा कालावधी लागत असून, त्यातही दररोज अधून-मधून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे टाकी भरण्याला अधिकच विलंब होत आहे. त्यामुळे गावातील पाण्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. तसेच विहिरींवरील मोटारींमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे.

दुष्काळाची आम्हाला सवयच झाली

सध्या गावात १० ते १५ दिवसांआड होत असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत 'लोकमत प्रतिनिधी'ने गावातील काही नागरिकांशी चर्चा केली असता, त्यांनी कुसुंबा गावात दुष्काळाची समस्या नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून गावात पाण्याची समस्या आहे. उन्हाळ्यात तर विहिरींची पाणी पातळी कमी झाल्याने पाण्याची समस्या अधिकच बिकट होते. नागरिकांना टँकरने तर कधी ‘जार’ मागवून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. वर्षांनुवर्ष हीच परिस्थिती आहे. गावातील लोकप्रतिनिधी फक्त आश्वासने देऊन निवडून येतात, पाण्याची समस्या मात्र अद्याप सोडलेली नाही. त्यामुळे आम्हाला दुष्काळाची सवयच झाली असल्याची भावना या गावातील नागरिकांनी व्यक्त केली.

गावाची लोकसंख्या वाढल्यामुळे विहिरींचे पाणी अपूर्ण पडत आहे. टाक्यांची साठवण क्षमताही कमी आहे. यावर उपाय म्हणून नवीन विहीर व टाकी बांधण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. तसेच सध्या वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन, नागरिकांना नाइलाजाने १० ते १५ दिवसांआड आम्हाला पाणीपुरवठा करावा लागत आहे.

विलास कोळी, उपसरपंच, कुसुंबा

दरवर्षी गावात उन्हाळ्यात पाण्याची समस्या असते. नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत.

संजय पाटील, रहिवासी

गावात वेळेवर पाणी येत नसल्यामुळे वापरायचे पाणी कुठूनही आणता येते. मात्र, पिण्याच्या पाण्याचे खूप हाल होत आहेत. गावातून कुठून तरी शोधून पिण्याचे पाणी आणावे लागते किंवा विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.

सुवर्णा पाटील, रहिवासी

गावाबाहेरील वामन नगरात अजूनही पिण्याच्या पाण्याची पाईप लाइनही ग्रामपंचायतीने टाकलेली नाही. त्यामुळे आम्हाला बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे. तसेच या भागात चांगले रस्तेही तयार झालेले नाहीत. महामार्गावर गाव असतांनाही गावाचा विकास शून्य आहे.

संगीता पवार, रहिवासी