शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

कुसुंब्यात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:17 IST

गावकऱ्यांचे हाल : नियोजना अभावी १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराला लागून ...

गावकऱ्यांचे हाल : नियोजना अभावी १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराला लागून असलेल्या कुसुंब्यात गेल्या अनेक वर्षांपासून असलेली पाण्याची समस्या आजही जैसे थे आहे. गावाच्या वाढत्या लोकसंख्येनुसार विहिरींचे पाणी अपूर्ण पडत असल्यामुळे आणि त्यात वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे गावात १० ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.

कुसुंबा गावासाठी दोन विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या विहिरींमधून सुरुवातीला गावात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी भरले जाते. त्यानंतर एकूण ४५ ‘व्हॉल’द्वारे प्रत्येक परिसरात एक तास या प्रमाणे दिवसभरात तीन ‘व्हॉल’ सोडले जात आहेत. दिवसभरात तीन या प्रमाणे पंधरा दिवसात संपूर्ण ४५ ‘व्हॉल’द्वारे गावात पाणीपुरवठा केला जात आहे.

इन्फो :

गावाच्या लोकसंख्येनुसार विहिरींचे पाणी पुरेना

गेल्या काही वर्षांत कुसुंबा गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सद्य:स्थितीला गावाची लोकसंख्या दहा ते बारा हजारांच्या घरात पोहचली आहे. मात्र, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही विहिरींचे स्त्रोत अपूर्ण पडत आहे. एक टाकी भरण्यासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागतो. टाकीची साठवण क्षमताही कमी असल्यामुळे टाकी भरल्यानंतर दोन्ही टाकी मिळून फक्त तीनच ‘व्हॉल’चा पाणीपुरवठा होत आहे.

विजेच्या समस्यांमुळे टाकी भरेना

एक टाकी भरण्यासाठी ६ ते ७ तासांचा कालावधी लागत असून, त्यातही दररोज अधून-मधून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे टाकी भरण्याला अधिकच विलंब होत आहे. त्यामुळे गावातील पाण्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. तसेच विहिरींवरील मोटारींमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे.

दुष्काळाची आम्हाला सवयच झाली

सध्या गावात १० ते १५ दिवसांआड होत असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत 'लोकमत प्रतिनिधी'ने गावातील काही नागरिकांशी चर्चा केली असता, त्यांनी कुसुंबा गावात दुष्काळाची समस्या नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून गावात पाण्याची समस्या आहे. उन्हाळ्यात तर विहिरींची पाणी पातळी कमी झाल्याने पाण्याची समस्या अधिकच बिकट होते. नागरिकांना टँकरने तर कधी ‘जार’ मागवून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. वर्षांनुवर्ष हीच परिस्थिती आहे. गावातील लोकप्रतिनिधी फक्त आश्वासने देऊन निवडून येतात, पाण्याची समस्या मात्र अद्याप सोडलेली नाही. त्यामुळे आम्हाला दुष्काळाची सवयच झाली असल्याची भावना या गावातील नागरिकांनी व्यक्त केली.

गावाची लोकसंख्या वाढल्यामुळे विहिरींचे पाणी अपूर्ण पडत आहे. टाक्यांची साठवण क्षमताही कमी आहे. यावर उपाय म्हणून नवीन विहीर व टाकी बांधण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. तसेच सध्या वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन, नागरिकांना नाइलाजाने १० ते १५ दिवसांआड आम्हाला पाणीपुरवठा करावा लागत आहे.

विलास कोळी, उपसरपंच, कुसुंबा

दरवर्षी गावात उन्हाळ्यात पाण्याची समस्या असते. नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत.

संजय पाटील, रहिवासी

गावात वेळेवर पाणी येत नसल्यामुळे वापरायचे पाणी कुठूनही आणता येते. मात्र, पिण्याच्या पाण्याचे खूप हाल होत आहेत. गावातून कुठून तरी शोधून पिण्याचे पाणी आणावे लागते किंवा विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.

सुवर्णा पाटील, रहिवासी

गावाबाहेरील वामन नगरात अजूनही पिण्याच्या पाण्याची पाईप लाइनही ग्रामपंचायतीने टाकलेली नाही. त्यामुळे आम्हाला बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे. तसेच या भागात चांगले रस्तेही तयार झालेले नाहीत. महामार्गावर गाव असतांनाही गावाचा विकास शून्य आहे.

संगीता पवार, रहिवासी