शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

धरणांमधून सोडले तापी, बोरी व पांझरा नदीत पाणी, नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:09 IST

पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यांना लाभ

ठळक मुद्देधरणास गळती असल्याने ते थांबत नसल्यामुळे  पाणी पूर्ण वाहून जातेलहान बंधायार्ची दुरुस्ती करण्याची मागणी बोरी नदी, तापी नदी, पांझरा नदी वाहू लागल्याने बहुतेक गावांचा  प्रश्न सुटणार आहे

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 14 - हतनूर धरणातून तापी नदीत, अक्कलपाडा  धरणातून  पांझरा नदी आणि तामसवाडी धरणातून बोरी नदीत पाणी सोडण्यात आल्याने टंचाईग्रस्त अमळनेर तालुक्याला खूप मोठा दिलासा मिळून नदीकाठावरील गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी मार्गी लागणार आहे .धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पिण्यासाठी नुकतेच पाणी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसात धरण क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्यमुले धरनात यावर्षी साधारण 60टक्क्यांवर पाणी साठा आहे .धरणाच्या डाव्या कालव्यातुण पाणी सोडण्यात आले आह त्यामुळे .पांझरा काठावरील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सुटन्यास मदत होणार आहे .पांझरा नदी धुळे तसेच जळगाव जिल्ह्यातून वाहत असल्याने धुळे अंमळनेर सिंधखेडा या तीन तालुक्यातील गावाना पिण्यासाठी तसेच शेती साठी फायद होणार आहे .यामुळे  पाणी पातळी वाढण्यात मदत होणार आहे .      न्याहळोद , कवठळ, वालखेडा, जापी शिरडाने, कंचनपूर, मांडळ, वावडे, मुडी, बोदर्डे, लोण बु., लोण खु., लोण चारम, भरवस, बेटावद, भिलाली, शाहापूर, तांदळी इत्यादी गावांना फायदा होणार आहे .त्याचप्रमाणे तामसवाडी धरणातून बोरी नदीत पाणी सोडण्यात आल्याने बहादरपूर, कोळपिंप्री, फापोरे, कन्हेरे, शिरुड, मंगरूळ, तासखेडा, अमोडे, नंदगाव, अंतुर्ली रंजाने, मुडी दरेंगाव, करणखेडे, अंबारे , खापरखेडा आदी गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे.  तापीलाही पाणी सुटल्याने पाडळसरे धरणात पाणी साठा, तसेच कलाली डोह व जळोद  गंगापुरीडोह भरल्याने शहरासह तापी काठावरील गावच्या विहिरींची पाणी पातळी वाढून पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहेअमळनेर तालुक्यात 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याने 23 गावांना पाणी टंचाई असून टँकर सुरू आहेत टँकर कोठून भरावेत असा  प्रश्न प्रशासनाला पडला होता परंतु तालुक्याच्या तिन्ही दिशांना असलेल्या बोरी नदी, तापी नदी, पांझरा नदी वाहू लागल्याने बहुतेक गावांचा  प्रश्न सुटणार आहे   परंतू पांझरा नदीवर असलेले वालखेडा कळबू बाम्हने हे लहान बंधायार्ची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कारण सुटलेले पाणी हे धरणास गळती असल्याने ते थांबत नसल्यामुळे  पाणी पूर्ण वाहून जाते त्यामुळे लोकप्रतिनिधीनी  लक्ष देण्याची मागणी होत आहे ज्यामुळे या पाण्याचा अधिक काळ फायदा होईल .