शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धरणांमधून सोडले तापी, बोरी व पांझरा नदीत पाणी, नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:09 IST

पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यांना लाभ

ठळक मुद्देधरणास गळती असल्याने ते थांबत नसल्यामुळे  पाणी पूर्ण वाहून जातेलहान बंधायार्ची दुरुस्ती करण्याची मागणी बोरी नदी, तापी नदी, पांझरा नदी वाहू लागल्याने बहुतेक गावांचा  प्रश्न सुटणार आहे

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 14 - हतनूर धरणातून तापी नदीत, अक्कलपाडा  धरणातून  पांझरा नदी आणि तामसवाडी धरणातून बोरी नदीत पाणी सोडण्यात आल्याने टंचाईग्रस्त अमळनेर तालुक्याला खूप मोठा दिलासा मिळून नदीकाठावरील गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी मार्गी लागणार आहे .धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पिण्यासाठी नुकतेच पाणी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसात धरण क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्यमुले धरनात यावर्षी साधारण 60टक्क्यांवर पाणी साठा आहे .धरणाच्या डाव्या कालव्यातुण पाणी सोडण्यात आले आह त्यामुळे .पांझरा काठावरील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सुटन्यास मदत होणार आहे .पांझरा नदी धुळे तसेच जळगाव जिल्ह्यातून वाहत असल्याने धुळे अंमळनेर सिंधखेडा या तीन तालुक्यातील गावाना पिण्यासाठी तसेच शेती साठी फायद होणार आहे .यामुळे  पाणी पातळी वाढण्यात मदत होणार आहे .      न्याहळोद , कवठळ, वालखेडा, जापी शिरडाने, कंचनपूर, मांडळ, वावडे, मुडी, बोदर्डे, लोण बु., लोण खु., लोण चारम, भरवस, बेटावद, भिलाली, शाहापूर, तांदळी इत्यादी गावांना फायदा होणार आहे .त्याचप्रमाणे तामसवाडी धरणातून बोरी नदीत पाणी सोडण्यात आल्याने बहादरपूर, कोळपिंप्री, फापोरे, कन्हेरे, शिरुड, मंगरूळ, तासखेडा, अमोडे, नंदगाव, अंतुर्ली रंजाने, मुडी दरेंगाव, करणखेडे, अंबारे , खापरखेडा आदी गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे.  तापीलाही पाणी सुटल्याने पाडळसरे धरणात पाणी साठा, तसेच कलाली डोह व जळोद  गंगापुरीडोह भरल्याने शहरासह तापी काठावरील गावच्या विहिरींची पाणी पातळी वाढून पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहेअमळनेर तालुक्यात 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याने 23 गावांना पाणी टंचाई असून टँकर सुरू आहेत टँकर कोठून भरावेत असा  प्रश्न प्रशासनाला पडला होता परंतु तालुक्याच्या तिन्ही दिशांना असलेल्या बोरी नदी, तापी नदी, पांझरा नदी वाहू लागल्याने बहुतेक गावांचा  प्रश्न सुटणार आहे   परंतू पांझरा नदीवर असलेले वालखेडा कळबू बाम्हने हे लहान बंधायार्ची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कारण सुटलेले पाणी हे धरणास गळती असल्याने ते थांबत नसल्यामुळे  पाणी पूर्ण वाहून जाते त्यामुळे लोकप्रतिनिधीनी  लक्ष देण्याची मागणी होत आहे ज्यामुळे या पाण्याचा अधिक काळ फायदा होईल .