शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पारोळा शहराला सहा दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:12 IST

उन्हाळा असल्याकारणाने तीन दिवसाआड पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे. पारोळा शहराला तामसवाडी येथील बोरी धरणातून पाणीपुरवठा होत ...

उन्हाळा असल्याकारणाने तीन दिवसाआड पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

पारोळा शहराला तामसवाडी येथील बोरी धरणातून पाणीपुरवठा होत आहे. यावर्षी बोरी धरण १०० टक्के भरले आहे. म्हणून, पाणीटंचाईचा प्रश्न भासला नाही. जुनी मशिनरी असल्याने तांत्रिक अडचणीमुळे बोरी धरणात पाणी असून नागरिकांना मात्र ६ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना पाणी मुबलक मिळत असल्याने पाणीटंचाई मात्र नाही. विशेष म्हणजे पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन होण्याआधी बोरी नदीच्या पात्रात पाणी आवर्तन सोडले जात होते. त्यामुळे खूप पाणी वाया जात होते. परंतु, बोरी धरण ते विचखेडे साठवण बंधाऱ्यापर्यंत पाणीपुरवठा पाइपलाइन झाल्याने पाण्याचा होणार अपव्यय टळला. लाखो लीटर पाणी वाया जात असे व नदीपात्रातून पाण्याची चोरीही होत होती. या सर्व गोष्टींना आता आळा बसला.

शहराला सहा दिवसांआड पाणीपुरवठा होताे. त्याची सवय नागरिकांना झाली आहे. जर शहराला नियमित दोन, तीन दिवसांआड पाणीपुरवठा व्हावा, असे वाटत असेल तर नवीन वसाहतीसाठी नव्याने एक जलकुंभ उभारणे गरजेचे आहे. पूर्वीपासून एकच जलकुंभाद्वारे संपूर्ण गावाला पाणी सोडले जाते. सतत जलशुद्धीकरण केंद्रातून २४ तास पाणी शुद्धीकरण करून एका पाइपलाइनने जलकुंभ भरले जाते, तर दुसऱ्या पाइपलाइनने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे संपूर्ण गावाला सहा दिवसांत ९ झोनमध्ये पाणीपुरवठा केला जातो.

गावात पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जीर्ण झाली आहे, तर काही ठिकाणी कमीजास्त आकाराच्या पाइपलाइन आहे. जर एकाचवेळी सर्व झोनमध्ये पाणीपुरवठा करण्याचे ठरविले, तर या पाइपलाइन फुटू शकतात. म्हणून गावात ९ झोनमध्ये पाणीपुरवठा करावा लागतो व सर्व झोन पूर्ण होण्यासाठी ६ दिवस पूर्ण लागतात. म्हणून शहराला सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असते.

बोरी धरण जरी १०० टक्के भरले आहे, तरीसुद्धा तांत्रिक अडचणींमुळे शहराला एकाच दिवशी संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणे शक्य नाही. म्हणून शहराला झोनमध्ये पाणीपुरवठा करणे हा एकच उपाय पालिकेसमोर आहे.

वितरण क्षमतेप्रमाणे पाणीपुरवठा...

जलशुद्धीकरण केंद्राची पाणी शुद्ध करण्याची क्षमता, तेथून जलकुंभापर्यंत पाणी वाहून नेण्याची पाइपलाइनची क्षमता ओळखून हा पाणीपुरवठा केला जातो. सध्या २४ तास जलकुंभ भरणे सुरू असते. तेच पाणी गावात झोनप्रमाणे सोडले जाते. पाणीवितरण क्षमतेनुसार संपूर्ण गावाला पाणीपुरवठा हा केला जात आहे. संपूर्ण गावात ठरलेल्या झोनप्रमाणे मुबलक पाणी शहरवासीयांना दिले जाते.

-करण बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष, नगर परिषद, पारोळा

सद्य:स्थितीत पम्पिंग क्षमता, वितरण व्यवस्था यांची अडचण आहे. या सर्व मशिनरी जुन्या आहेत. पाणीसाठवण क्षमता कमी आहे. शहर वाढले आहे. कनेक्शन वाढले, पाण्याची मागणी वाढली आहे. यामुळे शहराला ६ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. यावर उपाययोजना म्हणून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. त्यात नव्याने जलशुद्धीकरण केंद्र, पम्पिंग हाउस, दोन जलकुंभ व शहरातील अनेक वर्षांपासून असलेली जीर्ण पाइपलाइन बदलविण्यात येणार आहे. मग, शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होईल.

-ज्योती भगत पाटील, मुख्याधिकारी, पारोळा