शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

ओझर गावात १५ दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: February 9, 2017 00:21 IST

दीड कोटी पाण्यात : निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी

चाळीसगाव : तालुक्यातील  ओझर  येथे पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ६४ लाख रुपये खर्च करण्यात आले. एवढी मोठी रक्कम खर्चूनही अनेक दिवसांपासून १५-२० दिवसाआड गावाला पाणीपुरवठा केला जात आहे.  या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची फेब्रुवारी महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.  पाणीपुरवठा योजनेची चौकशी करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. यापूर्वी गावात जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत २ ते ३ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. स्वत:ची पेयजल योजना कार्यान्वित झाल्यामुळे मुबलक पाणी मिळेल अशी नागरिकांना आशा होती. परंतु ही योजना पूर्णपणे कुचकामी ठरली आहे.  दर्जानुसार काम न होता ठिकठिकाणी पाईप लाईन लिकेज होणे, दूषित पाणी मिळणे या सर्व कारणांमुळे ही योजना ठप्प झाली. कोट्यवधी रुपये खर्चूनही हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्यातही पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.सध्या नदीपात्रात शेवड्या खोदून पाणीपुरवठा करवा लागत आहे.  उन्हाळ्यात ही परिस्थिती अधिक तीव्र होणार आहे. याबाबत पाणीपुरवठा योजना अध्यक्ष व सचिव यांच्या कामकाजाची चौकशी करावी व नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे. संबंधित ठेकेदाराने केलेल्या चुकीच्या कामाची ग्रामपंचायतीलादेखील पुरेपूर जाण आहे. परंतु ग्रामपंचायतीने अद्यापही ही पेयजल योजना ताब्यात घेतली नाही. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणी मनोज धावजी जाधव, सुदाम सुका खैरे, शांताराम दौलत पगारे यांच्यासह अनेक नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबवावी व संबंधित कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अन्यथा तीव्र  आंदोलन छेडले जाईल, असा  इशाराही ओझर ग्रामस्थांकडून निवेदनात देण्यात आला आहे. (वार्ताहर)पाणीपुरवठा योजनेचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पाइपाचा दर्जा अतिशय हलका असल्याने सातत्याने ठिकठिकाणी पाणी गळती होते. याचा परिणाम गावाला दूषित पाणीपुरवठा होत आहे. पुन्हा पुन्हा दुरुस्ती करावी लागते. २ कोटी रुपयांची योजना कार्यान्वित असताना नगरपालिकेच्या विहिरीवरून मोठ्या प्रमाणावर रक्कम खर्चून पुन्हा पाईप लाईन टाकण्यात आली. पेयजल योजनेच्या विहिरीवर आडवी बोअर करणे, तसेच गिरणा नदीवर शेवडी खोदकाम करणे असा अनाठायी खर्च ओझर ग्रामपंचायतीतर्फे केला जात आहे. या सर्व खर्चाची चौकशी करावी, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.