शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पहूर येथील संतोषीमातानगरात भर पावसाळ्यात पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:16 IST

नागरिक संतप्त : पंधरा दिवसाआड मिळते पाणी

पहूर ता जामनेर:- पेठ ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या संतोषीमातानगराला तब्बल पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार या भागातील रहिवाशांचा आहे. याबाबत संताप व्यक्त होतअसून पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास हंडामोर्चा काढला जाईल असा ईशारा दिला आहे.येथील पाणीपुरवठा ज्या धरणांवर अवलंबून आहे, ते मोतीआई व गोगडी धरण शंभर टक्के भरले असूनही संतोषीमातानगराला पुरेसा पाणीपुरवठा पेठ ग्रामपंचायत कडून होत नसल्याच्या संतप्त भावना रहिवासी प्रविण विठ्ठल कुमावत यांनी सोशल माध्यमावर व्यक्त केल्या आहेत.शासन घरी राहा सुरक्षित राहा असे सांगत असताना आमच्याकडे भरपावसाळ्यात पिण्यासाठी व वापराला पाणी मिळत नाही. घरात कसे राहणार असा प्रश्न उपस्थित करून पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास हंडामोर्चा काढण्याचा ईशारा कुमावत व काही नागरिकांनी दिला. सोशल माध्यमावर संतोषीमातानगर असा ग्रुप असून यावर हा संदेश सोमवारी झळकत होता.दरम्यान सकाळी संतोषीमातानगरात पाणी पुरवठा झाल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे.प्रतिक्रिया.......गावाला नियमितपणे पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मात्र गोगडी धरणातून पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जोडणी साठी कर्मचाऱ्यांना पाणी जास्त असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे थोडासा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून आज रोजी सुरळीत आहे.कामे करतांना निधीची आवश्यकता भासत असल्याने नागरिकांना थकीत कर भरावे व सहकार्य करावे.- निता रामेश्वर पाटील, सरपंच, पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत