शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोलकरांवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:19 IST

महिनाभर पुरेल एवढाच साठा : पर्यायी व्यवस्था करण्याचे पाटबंधारे विभागाचे पालिकेला निर्देश

ठळक मुद्देपावसाळ्याच्या दिवसांमध्ये एरंडोल पालिकेतर्फे शहराला दर पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.अंजनी धरणातील संपुष्टात येणाºया मार्गावरील जलसाठा लक्षात घेऊन एरंडोल पालिकेने पाणीकपात केली आहे. अन्यथा पूर्वी तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत होता.‘अंजनी’ धरण हे एरंडोल तालुक्यासाठी वरदान ठरले आहे. २००८ पासून धरणात पाणीसाठा निर्मिती झाली. गेल्या १० वर्षात फक्त चार वेळा धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला.

एरंडोल, जि.जळगाव : एरंडोल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंजनी धरणात एक महिना पुरेल एवढाच मृत पाणीसाठा शिल्लक आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने एरंडोलकरांवर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश गिरणा पाटबंधारे विभागाने पालिकेला दिले आहेत.अंजनी धरणातील जलाशयात ०.५९२ द.ल.घ.मी. एवढाच पाणीसाठा सद्य:स्थितीत उपलब्ध आहे. एरंडोल शहराला रोज होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता एखाद्या महिनयापर्यंत पाणीपुरवठा होणे शक्य आहे. भविष्यात पाऊस न पडल्यास धरणातील पाणीसाठा संपुष्ठात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.‘अंजनी’च्या जलसाठ्यातून एरंडोलसाठी ६० द.ल.घ.फू. व कासोद्यासाठी १५ द.ल.घ.फू. एवढे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. परंतु धरणात पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्यामुळे यावर्षी पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून २० द.ल.घ.फू. पाण्याचा साठा जामदा डाव्या कालव्यामार्फत पुनर्भरण करून साठा करण्यात आला. त्यामुळे एरंडोल व कासोदा या मोठ्या गावांना पाणीटंचाई मुक्त करण्यात आले.विशेष हे की, जवळपास गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून ‘अंजनी’च्या मृत साठ्यातून एरंडोलला पाणीपुरवठा होत आहे.या धरणाचे पाणलोट क्षेत्र २३४.३४ चौ.कि.मी. आहे. अंजनी नदीचा उगम पारोळा तालुक्यातील चोरवड, शिरसमणी परिसरातून होतो. १५ ते २० छोटे-मोठे नाले या नदीला मिळतात.सर्वांत मोठा नाला लोणी बुद्रूक व लोणी खुर्द गावांमधला आहे. अंजनी धरणाचे ६० टक्के पाणलोट क्षेत्र पारोळा तालुक्यात व ४० टक्के एरंडोल तालुक्यात आहे. जवळपास १६० कोटी रूपये खर्च पाण्यासारखा या प्रकल्पावर झाला. पण तरीसुद्धा या धरणाला ड्रिंकींग वॉटर टँकचे स्वरूप प्राप्त झाले आहे.२०१३ मध्ये अंजनी धरणाच्या जलाशयाचे पाणी नदी पात्रात सोडण्याच्या प्रयत्नाला सर्वपक्षीय नेत्यांनी प्रखर विरोध केला होता. पाणी सोडले असते तर एरंडोल शहराला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले असते.तर भयावह स्थितीदरम्यान, दरवर्षी पावसाची कमतरता, अपुरा पाऊस या कारणामुळे धरणात पूर्ण क्षमतेने जलसाठा होत नाही म्हणून पाणीटंचाई निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण होते.‘लोकमत’ वृत्ताची दखल१२ जुलैच्या ‘लोकमत’मध्ये एरंडोल शहराच्या संभाव्य पाणीटंचाईबाबत वृत्त प्रसिद्ध झाले. त्या वृत्ताची दखल घेऊन गिरणा पाटबंधारे उपविभागाने पालिकेला तत्काळ पत्र पाठवून पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईErandolएरंडोल