शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

एरंडोलकरांवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:19 IST

महिनाभर पुरेल एवढाच साठा : पर्यायी व्यवस्था करण्याचे पाटबंधारे विभागाचे पालिकेला निर्देश

ठळक मुद्देपावसाळ्याच्या दिवसांमध्ये एरंडोल पालिकेतर्फे शहराला दर पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.अंजनी धरणातील संपुष्टात येणाºया मार्गावरील जलसाठा लक्षात घेऊन एरंडोल पालिकेने पाणीकपात केली आहे. अन्यथा पूर्वी तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत होता.‘अंजनी’ धरण हे एरंडोल तालुक्यासाठी वरदान ठरले आहे. २००८ पासून धरणात पाणीसाठा निर्मिती झाली. गेल्या १० वर्षात फक्त चार वेळा धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला.

एरंडोल, जि.जळगाव : एरंडोल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंजनी धरणात एक महिना पुरेल एवढाच मृत पाणीसाठा शिल्लक आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने एरंडोलकरांवर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश गिरणा पाटबंधारे विभागाने पालिकेला दिले आहेत.अंजनी धरणातील जलाशयात ०.५९२ द.ल.घ.मी. एवढाच पाणीसाठा सद्य:स्थितीत उपलब्ध आहे. एरंडोल शहराला रोज होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता एखाद्या महिनयापर्यंत पाणीपुरवठा होणे शक्य आहे. भविष्यात पाऊस न पडल्यास धरणातील पाणीसाठा संपुष्ठात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.‘अंजनी’च्या जलसाठ्यातून एरंडोलसाठी ६० द.ल.घ.फू. व कासोद्यासाठी १५ द.ल.घ.फू. एवढे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. परंतु धरणात पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्यामुळे यावर्षी पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून २० द.ल.घ.फू. पाण्याचा साठा जामदा डाव्या कालव्यामार्फत पुनर्भरण करून साठा करण्यात आला. त्यामुळे एरंडोल व कासोदा या मोठ्या गावांना पाणीटंचाई मुक्त करण्यात आले.विशेष हे की, जवळपास गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून ‘अंजनी’च्या मृत साठ्यातून एरंडोलला पाणीपुरवठा होत आहे.या धरणाचे पाणलोट क्षेत्र २३४.३४ चौ.कि.मी. आहे. अंजनी नदीचा उगम पारोळा तालुक्यातील चोरवड, शिरसमणी परिसरातून होतो. १५ ते २० छोटे-मोठे नाले या नदीला मिळतात.सर्वांत मोठा नाला लोणी बुद्रूक व लोणी खुर्द गावांमधला आहे. अंजनी धरणाचे ६० टक्के पाणलोट क्षेत्र पारोळा तालुक्यात व ४० टक्के एरंडोल तालुक्यात आहे. जवळपास १६० कोटी रूपये खर्च पाण्यासारखा या प्रकल्पावर झाला. पण तरीसुद्धा या धरणाला ड्रिंकींग वॉटर टँकचे स्वरूप प्राप्त झाले आहे.२०१३ मध्ये अंजनी धरणाच्या जलाशयाचे पाणी नदी पात्रात सोडण्याच्या प्रयत्नाला सर्वपक्षीय नेत्यांनी प्रखर विरोध केला होता. पाणी सोडले असते तर एरंडोल शहराला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले असते.तर भयावह स्थितीदरम्यान, दरवर्षी पावसाची कमतरता, अपुरा पाऊस या कारणामुळे धरणात पूर्ण क्षमतेने जलसाठा होत नाही म्हणून पाणीटंचाई निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण होते.‘लोकमत’ वृत्ताची दखल१२ जुलैच्या ‘लोकमत’मध्ये एरंडोल शहराच्या संभाव्य पाणीटंचाईबाबत वृत्त प्रसिद्ध झाले. त्या वृत्ताची दखल घेऊन गिरणा पाटबंधारे उपविभागाने पालिकेला तत्काळ पत्र पाठवून पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईErandolएरंडोल