शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

एरंडोलकरांवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:19 IST

महिनाभर पुरेल एवढाच साठा : पर्यायी व्यवस्था करण्याचे पाटबंधारे विभागाचे पालिकेला निर्देश

ठळक मुद्देपावसाळ्याच्या दिवसांमध्ये एरंडोल पालिकेतर्फे शहराला दर पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.अंजनी धरणातील संपुष्टात येणाºया मार्गावरील जलसाठा लक्षात घेऊन एरंडोल पालिकेने पाणीकपात केली आहे. अन्यथा पूर्वी तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत होता.‘अंजनी’ धरण हे एरंडोल तालुक्यासाठी वरदान ठरले आहे. २००८ पासून धरणात पाणीसाठा निर्मिती झाली. गेल्या १० वर्षात फक्त चार वेळा धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला.

एरंडोल, जि.जळगाव : एरंडोल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंजनी धरणात एक महिना पुरेल एवढाच मृत पाणीसाठा शिल्लक आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने एरंडोलकरांवर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश गिरणा पाटबंधारे विभागाने पालिकेला दिले आहेत.अंजनी धरणातील जलाशयात ०.५९२ द.ल.घ.मी. एवढाच पाणीसाठा सद्य:स्थितीत उपलब्ध आहे. एरंडोल शहराला रोज होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता एखाद्या महिनयापर्यंत पाणीपुरवठा होणे शक्य आहे. भविष्यात पाऊस न पडल्यास धरणातील पाणीसाठा संपुष्ठात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.‘अंजनी’च्या जलसाठ्यातून एरंडोलसाठी ६० द.ल.घ.फू. व कासोद्यासाठी १५ द.ल.घ.फू. एवढे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. परंतु धरणात पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्यामुळे यावर्षी पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून २० द.ल.घ.फू. पाण्याचा साठा जामदा डाव्या कालव्यामार्फत पुनर्भरण करून साठा करण्यात आला. त्यामुळे एरंडोल व कासोदा या मोठ्या गावांना पाणीटंचाई मुक्त करण्यात आले.विशेष हे की, जवळपास गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून ‘अंजनी’च्या मृत साठ्यातून एरंडोलला पाणीपुरवठा होत आहे.या धरणाचे पाणलोट क्षेत्र २३४.३४ चौ.कि.मी. आहे. अंजनी नदीचा उगम पारोळा तालुक्यातील चोरवड, शिरसमणी परिसरातून होतो. १५ ते २० छोटे-मोठे नाले या नदीला मिळतात.सर्वांत मोठा नाला लोणी बुद्रूक व लोणी खुर्द गावांमधला आहे. अंजनी धरणाचे ६० टक्के पाणलोट क्षेत्र पारोळा तालुक्यात व ४० टक्के एरंडोल तालुक्यात आहे. जवळपास १६० कोटी रूपये खर्च पाण्यासारखा या प्रकल्पावर झाला. पण तरीसुद्धा या धरणाला ड्रिंकींग वॉटर टँकचे स्वरूप प्राप्त झाले आहे.२०१३ मध्ये अंजनी धरणाच्या जलाशयाचे पाणी नदी पात्रात सोडण्याच्या प्रयत्नाला सर्वपक्षीय नेत्यांनी प्रखर विरोध केला होता. पाणी सोडले असते तर एरंडोल शहराला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले असते.तर भयावह स्थितीदरम्यान, दरवर्षी पावसाची कमतरता, अपुरा पाऊस या कारणामुळे धरणात पूर्ण क्षमतेने जलसाठा होत नाही म्हणून पाणीटंचाई निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण होते.‘लोकमत’ वृत्ताची दखल१२ जुलैच्या ‘लोकमत’मध्ये एरंडोल शहराच्या संभाव्य पाणीटंचाईबाबत वृत्त प्रसिद्ध झाले. त्या वृत्ताची दखल घेऊन गिरणा पाटबंधारे उपविभागाने पालिकेला तत्काळ पत्र पाठवून पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईErandolएरंडोल