शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

जळगाव जिल्ह्यात दोन गावांमध्ये शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST

जळगाव /धुळे/ नंदुरबार : आठवड्यानंतर पुन्हा आलेल्या पावसाने चाळीसगाव व भडगाव परिसरातील दोन गावांमध्ये पाणी ...

जळगाव /धुळे/ नंदुरबार : आठवड्यानंतर पुन्हा आलेल्या पावसाने चाळीसगाव व भडगाव

परिसरातील दोन गावांमध्ये पाणी शिरले होते, तर धुळे व नेर येथे अतिवृष्टी झाली तर नंदुरबार जिल्ह्यात एक तरुण वाहून गेला आहे. चांदसैली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

जळगाव

मन्याड धरण परिसरात ७ रोजीच्या मध्यरात्री आणि ८ रोजीच्या पहिल्या प्रहरी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यातच अतिवृष्टीने नांद्रे, ता. चाळीसगाव तसेच कजगाव, ता. भडगाव या दोन गावांना पाण्याचा वेढा पडला होता. तसेच या पावसामुळे अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे.

कजगाव-नागद रस्त्यावरील पुलाचा भराव पुन्हा वाहून गेला. यामुळे नागद मार्गावरील अनेक गावांचा कजगावशी संपर्क तुटला आहे. अमळनेर येथील काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतांमध्ये पाणी साचले आहे. तर चाळीसगाव येथे तितूर नदीला आठवड्यात दुसऱ्यांदा पाऊस झाला आहे. पाचोरा तालुक्यातील अम्मावती, गडद आणि तितूर नदीला पुन्हा पूर आला आहे.

धुळे

धुळे तालुक्यातील धुळे शहर, नेर, सोनगीर व खेडे येथे अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात एका दिवसात सरासरी ३९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी धुळे शहरात अतिवृष्टी झाली. एका दिवसात ८८ मि. मी. पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल धुळे तालुक्यातील नेर ८५ मि.मी., खेडे ८४ आणि सोनगीरला ८४ मि.मी. पाऊस झाला.

धुळे तालुक्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले.

नंदुरबारला तरुण वाहून गेला

जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहादा शहरातील अनेक वसाहती जलमय झाल्या आहेत, तर तळोदा-धडगाव रस्त्यावरील चांदसैली घाटात १०० मीटरपर्यंत रस्त्यावर दरड कोसळल्याने बुधवारी दिवसभर या मार्गावरील वाहतूक बंद होती. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान, धडगाव तालुक्यात पुराच्या पाण्यात बुडाल्याने युवकाचा मृत्यू झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मंगळवारी रात्री शहादा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १४६ मी.मी. पाऊस झाला. चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यात रुग्णवाहिकाही अडकल्याने रुग्ण महिलेला तिच्या पतीला खांद्यावर उपचारासाठी घेऊन जावे लागले. दरम्यान महिलेचा मृत्यू झाला, तर मनवाणी, ता. धडगाव येथील युवक मांडवी येथे आला असता त्याचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. शहादा शहरातील अनेक वस्ती व व्यापारी संकुल पाण्याखाली गेले होते. वादळी पावसामुळे शहादा तालुक्यातील ऊस, केळी व पपई या पिकांचे नुकसान झाले.