शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 15:50 IST

चाळीसगाव तालुक्यातील 136 गावांचा संभाव्य कृती आराखडा तयार

ठळक मुद्देसरपंच, ग्रामसेवकांनी मांडली पाणीटंचाई समस्या सद्य:स्थितीत पाच गावांचा पाणीटंचाईशी सामना 14 पाझर तलाव, आठ लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये ठणठणाट

ऑनलाईन लोकमत चाळीसगाव, जि.जळगाव, दि. 19 : तालुक्यात अपूर्ण पर्जन्यमान झाल्याने पाणीटंचाईची समस्या येत्या काळात तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत शनिवारी प्रशासनाने 136 गावातील सरपंच, ग्रमसेवकांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत उमटले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने तालुक्यातील नदी-नाले, पाझर तलाव, लघु पाटबंधारे तलावांमध्ये पूर्णपणे ठणठणाट आहे. डिसेंबरनंतर पाणीबाणी उद्भवणार असली तरी सद्य:स्थितीत पाच गावे टंचाईग्रस्त आहेत. संभाव्य पाणीटंचाईचा कृती आराखडा लवकरच जिल्हाधिका:यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास देवरे यांनी दिली. आढावा बैठकीला आमदार उन्मेष पाटील यांच्यासह पंचायत समितीचे सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, जि.प. सदस्य, सर्व 14 पं.स. सदस्य, 136 गावचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. बैठकीत गावनिहाय पाणीपुरवठय़ाची स्थिती जाणून घेण्यात आली. सद्य:स्थितीसह फेब्रुवारी अखेर पाणीटंचाई निर्माण होणा:या गावांचा आराखडय़ात समावेश करण्यात आला असून, कोणत्याही गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासनातर्फे हातपंप, विहिरी अधिग्रहण, विहिरी खोलीकरण अशी उपाययोजना करण्यात येणार आहे. तालुक्यातील 27 गावांच्या पाणीपुरवठा योजना गिरणा धरणावर अवलंबून आहे. यंदा धरणात समाधानकारक जलसाठा असल्याने या गावांची पाणीटंचाईच्या संकटातून सुटका झाली आहे. गिरणामधून आवर्तन सुटल्यानंतर या 27 गावांची तहान भागते. पावसाळ्याच्या तीन महिन्यात दमदार पावसाची हजेरी तुरळक असल्याने विहिरींची पातळी खालावली असून, नदी-नाल्यांचाही घसा कोराडाच आहे. सप्टेंबरअखेर नंतरच पाणीटंचाईच्या प्रश्नाने डोके वर काढले आहे. यात चिंचगव्हाण, तमगव्हाण, सुंदरनगर, नाईकनगर, कळमडू आदी गावांना सद्य:स्थितीत तीव्र पाणी टंचाईशी दोन हात करावे लागत आहे. बेलदारवाडी, बोढरे, चितेगाव, देशमुखवाडी, दरेगाव, डामरुण, डोण दिगर, कुंझर, पिप्री बु.प्र.चा., सायगाव, तांबोळे बुद्रूक ,खडकी या 12 गावांमध्ये उपाययोजना म्हणून विहीर अधिग्रहण केले जाणार आहे. लघुपाटबंधारे प्रकल्पही कोरडे : चाळीसगाव तालुक्यात 14 पाझर तलाव तर आठ लघु पाटबंधारे जलप्रकल्पदेखील कोरडे आहेत. मुंदखेडे, चितेगाव, कोदगाव, वलठाण, जामडी, बाणगाव, वलठाण, हातगाव यांचा समावेश यात समावेश आहे. 109 गावांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडय़ात समावेश