शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

ममुराबाद परिसरावर पाणी टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

ममुुराबाद : उन्हाळा तीव्र झाल्याच्या स्थितीत तापी नदीचे पात्र कोरडेठाक पडल्यामुळे ममुराबाद परिसरातील गावांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. ...

ममुुराबाद : उन्हाळा तीव्र झाल्याच्या स्थितीत तापी नदीचे पात्र कोरडेठाक पडल्यामुळे ममुराबाद परिसरातील गावांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. पंपिंग सेंटरवरील पंप टप्पा घेऊ लागल्याने योजनेवर अवलंबून असणाऱ्या या गावांमध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे दिसून आली आहेत. त्यामुळे तापी नदीत हतनूरचे एक आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी होऊ लागली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून तापी नदीच्या काठावर नांद्रा खुर्द गावालगत ममुराबादसह परिसरातील सहा ते सात गावांसाठी ३० वर्षांपूर्वी सामूहिक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी उन्हाळ्याची सुरुवात होत नाही तेवढ्यात नदीपात्रातील विहीर तळ गाठते. त्या ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी ४१ अश्वशक्तीचे दोन आणि ३१ अश्वशक्तीचा एक, असे तीन पंप तेथे उपलब्ध असले, तरी एका वेळी एकच पंप सुरू असतो. त्यातही पाणी पातळी कमी झाल्यावर पंप दिवसातून काही तास बंद ठेवावा लागतो. परिणामी, ममुराबाद गावापर्यंत तापीचे पाणी पोहोचणे मुश्कील होऊन बसले आहे. नळांना पाणी आले तरी केवळ चार- पाच बादल्या भरतील एवढेच पाणी गावात गेल्या आठवडाभरापासून सोडले जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना त्यामुळे वणवण भटकावे लागत आहे. अनेकांवर विकतच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे.

-----------------

नदीत वाळूचा बंधारा घालण्याची गरज

तापीत हतनूर धरणाचे आवर्तन सोडले तरी नदीच्या पात्रात अडविण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने बहुतांश सर्व पाणी खाली वाहून जाते. त्यामुळे धरणातून आवर्तन सोडण्यापूर्वी नांद्रा खुर्द गावाजवळ नदीत वाळूचा बंधारा घालणे तितकेच गरजेचे आहे. तरच खाली वाहून जाणाऱ्या पाण्याला अटकाव होऊ शकेल व किमान महिनाभर तरी ममुराबाद परिसरात टंचाई भासणार नाही.

-------------------

(कोट)

तापीवरील पंपिंग दिवसभर चालली तरच संपूर्ण ममुराबाद गावाला पाणीपुरवठा करणे शक्य होते. मात्र, नदीचे पात्र आटल्यावर विहिरीतील पंप टप्पा घेऊ लागल्यानंतर गावातील लहान व मोठे जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरणे आता जिकिरीचे ठरत आहे.

- हेमंत चौधरी, सरपंच, ममुराबाद

--------------------

फोटो-

नांद्रा खुर्द येथे तापी नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे ममुराबाद सामूहिक पाणीपुरवठा योजनेवर टंचाईचे संकट ओढवले आहे.