शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

ममुराबाद परिसरावर पाणी टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

ममुुराबाद : उन्हाळा तीव्र झाल्याच्या स्थितीत तापी नदीचे पात्र कोरडेठाक पडल्यामुळे ममुराबाद परिसरातील गावांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. ...

ममुुराबाद : उन्हाळा तीव्र झाल्याच्या स्थितीत तापी नदीचे पात्र कोरडेठाक पडल्यामुळे ममुराबाद परिसरातील गावांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. पंपिंग सेंटरवरील पंप टप्पा घेऊ लागल्याने योजनेवर अवलंबून असणाऱ्या या गावांमध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे दिसून आली आहेत. त्यामुळे तापी नदीत हतनूरचे एक आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी होऊ लागली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून तापी नदीच्या काठावर नांद्रा खुर्द गावालगत ममुराबादसह परिसरातील सहा ते सात गावांसाठी ३० वर्षांपूर्वी सामूहिक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी उन्हाळ्याची सुरुवात होत नाही तेवढ्यात नदीपात्रातील विहीर तळ गाठते. त्या ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी ४१ अश्वशक्तीचे दोन आणि ३१ अश्वशक्तीचा एक, असे तीन पंप तेथे उपलब्ध असले, तरी एका वेळी एकच पंप सुरू असतो. त्यातही पाणी पातळी कमी झाल्यावर पंप दिवसातून काही तास बंद ठेवावा लागतो. परिणामी, ममुराबाद गावापर्यंत तापीचे पाणी पोहोचणे मुश्कील होऊन बसले आहे. नळांना पाणी आले तरी केवळ चार- पाच बादल्या भरतील एवढेच पाणी गावात गेल्या आठवडाभरापासून सोडले जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना त्यामुळे वणवण भटकावे लागत आहे. अनेकांवर विकतच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे.

-----------------

नदीत वाळूचा बंधारा घालण्याची गरज

तापीत हतनूर धरणाचे आवर्तन सोडले तरी नदीच्या पात्रात अडविण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने बहुतांश सर्व पाणी खाली वाहून जाते. त्यामुळे धरणातून आवर्तन सोडण्यापूर्वी नांद्रा खुर्द गावाजवळ नदीत वाळूचा बंधारा घालणे तितकेच गरजेचे आहे. तरच खाली वाहून जाणाऱ्या पाण्याला अटकाव होऊ शकेल व किमान महिनाभर तरी ममुराबाद परिसरात टंचाई भासणार नाही.

-------------------

(कोट)

तापीवरील पंपिंग दिवसभर चालली तरच संपूर्ण ममुराबाद गावाला पाणीपुरवठा करणे शक्य होते. मात्र, नदीचे पात्र आटल्यावर विहिरीतील पंप टप्पा घेऊ लागल्यानंतर गावातील लहान व मोठे जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरणे आता जिकिरीचे ठरत आहे.

- हेमंत चौधरी, सरपंच, ममुराबाद

--------------------

फोटो-

नांद्रा खुर्द येथे तापी नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे ममुराबाद सामूहिक पाणीपुरवठा योजनेवर टंचाईचे संकट ओढवले आहे.