शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

साडेतीन हजार नागरिकांमध्ये जलसाक्षरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील भूजल पातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत वाढलेली असली तरी यामध्ये आणखी भर पडावी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील भूजल पातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत वाढलेली असली तरी यामध्ये आणखी भर पडावी, यासाठी जिल्ह्यात भूजल साक्षरता अभियान राबविण्यात येत असून त्या माध्यमातून जल पुनर्भरणाविषयी शास्त्रोक्त पद्धतीने माहिती दिली जात आहे. यामध्ये साडेतीन हजार नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून वर्षातून चारवेळा जिल्ह्यातील भूजल पातळीची मोजणी केली जाते. यामध्ये पाच वर्षांच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांपासून वाढ झाल्याचे आढळून आले. यात आणखी वाढ होण्यासाठी ३० जूनपासून भूजल साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.

विंधन विहिरी भरणावर भर

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्यावतीने सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त जलजागृती करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत २८ वेबिनार होऊन त्यातून साडेतीन हजार नागरिकांना माहिती देण्यात आली. पावसाळ्यात छतावरील पाणी वाहून न जाता ते जमिनीत कसे जिरवावे, या विषयी माहिती देत छतावरील हे पाणी शास्त्रोक्त पद्धतीने विंधन विहिरीत कसे उतरवावे, पाणी कशा पद्धतीने अडवावे, या विषयी मार्गदर्शन केले जात आहे. तालुकापातळीवर कार्यशाळा घेण्यासह विविध विभाग, संस्थांच्या सहकार्याने जनजागृती केली जात आहे.

घडीपत्रिकेचे प्रकाशन

जिल्ह्यात जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेमध्ये भूजल साक्षरता अभियानाबाबत सविस्तर माहिती देऊन जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याहस्ते पोस्टर व घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.आर. लोखंडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत वाढ आहे. मात्र ही वाढ आणखी व्हावी, यासाठी भूजल साक्षरता अभियानांतर्गत जनजागृती केली जात आहे. आता पर्यंत २८ वेबिनार झाले असून त्यातून साडेतीन हजार नागरिकांना माहिती देण्यात आली.

- अनुपमा पाटील, वरिष्ठ भू वैज्ञानिक