शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाणी असून सिंचनाची समस्या : बंधारे ठरताहेत निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 21:17 IST

  अमळनेर : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होत नसून फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी ...

 

अमळनेर : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होत नसून फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी होत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.दरवर्षी अत्यल्प होणाºया पावसामुळे पावसाच्या पाण्याचे सिंचन व्हावे यासाठी ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’सारख्या मोहिमांमध्ये शासन दरवर्षी निधीची तरतूद करते. पण अनेक ठिकाणी झालेल्या निकृष्ट कामांमुळे जलसिंचन होत नसल्याचे वास्तव विविध घटनांतून समोर येत आहे.बंधारा पाट्यांविनामारवड शिवारात धानोरा गावाजवळ माळण नदीवर लघुसिंचन विभागातर्फे बंधारा बांधून दोन ते तीन वर्षे झाली. मात्र अद्याप त्या ठिकाणी पाट्या टाकण्यात आलेल्या नाहीत. नाल्यातून पाणी वाहून जात असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. ज्या उद्देशाने बंधारे बांधण्यात आले आहेत तो साध्य होताना दिसत नाही, असा सूर शेतकरीवर्गातून ऐकायला मिळत आहे.पहिल्याच पावसात गळतीकळमसरे परिसरात यावर्षी भूजल सर्वेक्षण अंतर्गत लघुसिंचन विभागामार्फत सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसाचे पाणी अडविले गेले नाही. त्यामुळे येथील शेतकºयांनी संताप व्यक्त केला असून, तत्काळ दुरुस्तीसह दोषींवर कारवाईची मागणीही केली आहे. शासनाने मंजूर केलेल्या सिमेंट बंधाºयाचे निकृष्ट बांधकाम करण्यात आल्याने पाणी अडविले गेलेच नाही, उलट त्यास गळती लागली आहे. बारदान व मातीचा लेपपावसाळा सुरू होताच पडलेले पाणी बंधाºयाखालून वाहून गेल्याने शेतकºयांनी संबंधित ठेकेदाराविरुद्ध तक्रार केली. तेव्हा ठेकेदाराकडून गळती होत असलेल्या बंधाºयाला माती टाकून व बारदान लावून दगडांचा भराव टाकला. पण त्याचा काहीच उपयोग होणार नसल्याचे आळखून शेतकºयांनी त्यास विरोध केला. तसेच गळती होत असलेल्या भागाजवळ सिमेंटमिश्रित खडी, रेती टाकण्याची मागणी केली होती. परंतु संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी डोळेझाक केली. त्यामुळे निकृष्ट काम होऊन पाणीच अडविले गेले नाही. सरकारी निधीचा अपव्यय केला म्हणून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी कळमसरे येथील शेतकºयांनी केली आहे.