शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

बोदवडला भर पावसाळ्यातही पाण्याचा ठणठणाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:16 IST

बोदवड : शहराला पाणीटंचाई जणू पाचवीलाच पुजलेली आहे की काय, अशी स्थिती असून, आज रोजी शहरात पाणीपुरवठा होऊन काही ...

बोदवड : शहराला पाणीटंचाई जणू पाचवीलाच पुजलेली आहे की काय, अशी स्थिती असून, आज रोजी शहरात पाणीपुरवठा होऊन काही प्रभागांत १७ ते २० दिवस उलटले आहेत, परंतु पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे भाजपने नगर पंचायतीवर मोर्चा नेत पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले.

बोदवड शहरासह तालुक्यातील २६ गावांसाठी जीवनदायी असलेली ओडिएच्या पाणीपुरवठा योजनेचा पूर्णा नदीला पूर आल्याने तसेच हतनूर धरणाचे पाणी सोडल्याने नदीत गाळ आहे. त्यामुळे ओडिएच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंगवरून पाणी उचल करणे १२ जुलैपासून बंद आहे.

सध्या विहिरीवरून होतो पाणीपुरवठा

बोदवड शहरातील नगरपंचायतच्या मालकीच्या असलेल्या विहिरीत पावसाचे पाणी आल्याने पाणी गोळा करून त्याची उचल करून शहराची तहान थेंबे थेंबे मिटवली जात आहे. शहरातील विहिरीत फक्त दोन दिवसांत दोन व्हॉल्व सुटतील इतके पाणी गोळा होते, असे एकूण पूर्ण शहरात नव्वद व्हॉल्व आहेत. त्यामुळे जर शहरातील विहिरीच्या भरवशावर पाणीपुरवठा केल्यास एका व्हॉल्वला पुन्हा पाणी येण्यास किमान दीड ते दोन महिने लागतील अशी स्थिती आहे.

अनेक वर्षांपासून प्रश्न कायम

गेल्या पाच वर्षांत शहरात सर्वात महत्त्वाच्या असलेला पाणी मुद्द्यावर नगर पंचायतने ठोस काहीच योजना मार्गी लावली नसल्याने ही पाणी टंचाई सोसावी लागत आहे, त्यात दोन दिवसांपूर्वी शहरात पाणीपुरवठा मंत्री यांनीसुद्धा आढावा बैठक घेतली, पण शहरातील एकानेही पाणी टंचाईवर काहीच मागणी केली नाही, नेहमी हीच स्थिती असल्याने शहरातील महिला व पुरुषवर्गाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

याबाबत शहरातील भारतीय जनता पार्टीने पाणी टंचाईवर तहसील कार्यलयावर मोर्चा काढत नायब तहसीलदार यांना निवेदन देत पाणी टंचाईची कैफियत मांडली असून निवेदनावर भाजपचे तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, नरेश आहुजा, अमोल देशमुख, धनराज सुतार, रोहित अग्रवाल, दिलीप घुले, राजेंद्र डापसे, डॉ. ब्रिजलाल जैन, संतोष बारी, कृष्णा जाधव, सचिन जैस्वाल, मयूर शर्मा आदींनी निवेदन दिले.