शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

बोदवडला भर पावसाळ्यातही पाण्याचा ठणठणाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:16 IST

बोदवड : शहराला पाणीटंचाई जणू पाचवीलाच पुजलेली आहे की काय, अशी स्थिती असून, आज रोजी शहरात पाणीपुरवठा होऊन काही ...

बोदवड : शहराला पाणीटंचाई जणू पाचवीलाच पुजलेली आहे की काय, अशी स्थिती असून, आज रोजी शहरात पाणीपुरवठा होऊन काही प्रभागांत १७ ते २० दिवस उलटले आहेत, परंतु पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे भाजपने नगर पंचायतीवर मोर्चा नेत पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले.

बोदवड शहरासह तालुक्यातील २६ गावांसाठी जीवनदायी असलेली ओडिएच्या पाणीपुरवठा योजनेचा पूर्णा नदीला पूर आल्याने तसेच हतनूर धरणाचे पाणी सोडल्याने नदीत गाळ आहे. त्यामुळे ओडिएच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंगवरून पाणी उचल करणे १२ जुलैपासून बंद आहे.

सध्या विहिरीवरून होतो पाणीपुरवठा

बोदवड शहरातील नगरपंचायतच्या मालकीच्या असलेल्या विहिरीत पावसाचे पाणी आल्याने पाणी गोळा करून त्याची उचल करून शहराची तहान थेंबे थेंबे मिटवली जात आहे. शहरातील विहिरीत फक्त दोन दिवसांत दोन व्हॉल्व सुटतील इतके पाणी गोळा होते, असे एकूण पूर्ण शहरात नव्वद व्हॉल्व आहेत. त्यामुळे जर शहरातील विहिरीच्या भरवशावर पाणीपुरवठा केल्यास एका व्हॉल्वला पुन्हा पाणी येण्यास किमान दीड ते दोन महिने लागतील अशी स्थिती आहे.

अनेक वर्षांपासून प्रश्न कायम

गेल्या पाच वर्षांत शहरात सर्वात महत्त्वाच्या असलेला पाणी मुद्द्यावर नगर पंचायतने ठोस काहीच योजना मार्गी लावली नसल्याने ही पाणी टंचाई सोसावी लागत आहे, त्यात दोन दिवसांपूर्वी शहरात पाणीपुरवठा मंत्री यांनीसुद्धा आढावा बैठक घेतली, पण शहरातील एकानेही पाणी टंचाईवर काहीच मागणी केली नाही, नेहमी हीच स्थिती असल्याने शहरातील महिला व पुरुषवर्गाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

याबाबत शहरातील भारतीय जनता पार्टीने पाणी टंचाईवर तहसील कार्यलयावर मोर्चा काढत नायब तहसीलदार यांना निवेदन देत पाणी टंचाईची कैफियत मांडली असून निवेदनावर भाजपचे तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, नरेश आहुजा, अमोल देशमुख, धनराज सुतार, रोहित अग्रवाल, दिलीप घुले, राजेंद्र डापसे, डॉ. ब्रिजलाल जैन, संतोष बारी, कृष्णा जाधव, सचिन जैस्वाल, मयूर शर्मा आदींनी निवेदन दिले.