शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

दारुच्या पेगसोबतच पाणी, सोडय़ाचे दरही वधारले

By admin | Updated: April 4, 2017 17:35 IST

बियरबारमध्ये होत असलेली ग्राहकांची गर्दी लक्षात घेता 60 मि.ली., 90 मि.ली.च्या पेगचे दरही 10 ते 15 रुपयांनी वधारले असून, यासोबत सोडा, पाणी याच्या बाटल्यांमागेही दोन ते तीन रुपये अधिक आकारले जात आहेत.

 जळगाव, दि.4- राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गानजीक 500 मीटर अंतरातील बियर बार बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने शहरात जवळपास 100 बियरबार बंद झाले आहेत. न्यायालयाच्या आदेशांपासून बचावलेले फक्त सहा बियर बार सुरू असून, बंद बिरयबारमधील कारागीर, कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. तर बियरबारमध्ये होत असलेली ग्राहकांची गर्दी लक्षात घेता 60 मि.ली., 90 मि.ली.च्या पेगचे दरही 10 ते 15 रुपयांनी वधारले असून, यासोबत सोडा, पाणी याच्या बाटल्यांमागेही दोन ते तीन रुपये अधिक आकारले जात आहेत. 

1 एप्रिलपासून शहरातील 100 पेक्षा अधिक बियरबार बंद झाले आहेत. राज्यमार्ग, महामार्ग यापासून 500 मीटरपेक्षा अधिक अंतरावर असलेले फक्त सहा बियरबार शहरात सुरू आहेत. या बियरबारमध्ये दारू व जेवणासाठी येणा:या ग्राहकांची संख्या पाच पटीने वाढली आहे. 
रामनवमीनिमित्त शहरातील सर्वच बियरबार बंद होते, फक्त देशी दारूची काही दुकाने सुरू होती. या दुकानांवर मोठी गर्दी होती. भजेगल्ली परिसरातील एका दुकानात तर बाहेर्पयत रांग होती. यामुळे इतर वाहनधारकांना अडथळा होत होता. 
कारागिरांची संख्या वाढविली
ग्राहकांची गर्दी एकाच वेळी होत असल्याने संबंधित बियरबार मालकांना कारागीर, कर्मचारी यांची संख्या वाढवावी लागली आहे. सकाळपासून सायंकाळर्पयत बियरबारमध्ये मोठी गर्दी राहते. 
ढाब्यांवर अवैध विक्री
महामार्गालगत व इतर मार्गावरील ढाब्यांवर जेवणासाठी ग्राहक जातात, पण बियरबार बंद असल्याने संबंधित ढाब्यांवरही अवैध दारू विक्री वाढली आहे. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी उत्पादन शुल्क व इतर यंत्रणा अपु:या पडत असल्याचेही चित्र आहे. 
पान, शेंगदाणा, चिवडा पॅकेट्सला मागणी कमी
पान, शेंदगाणा, चिवडा आदी विक्रेते बियरबारनजीक मोठय़ा संख्येने आहेत. पण सध्या बियरबार बंद असल्याने पान, चिवडा व शेंगदाणा विक्रेत्यांनाही फटका बसत आहे. तळीरामांकडून चिवडा, शेंगदाणा पॅकेट्ना अधिक मागणी असते, अशी माहिती मिळाली. 
मांसाहारही घटला
बियरबारमध्ये मांसाहारी जेवणाचीही व्यवस्था असायची, पण आता बियरबारमध्ये दारू नसल्याने फक्त जेवणासाठी येणा:या ग्राहकांची संख्या फारशी नाही. ही संख्या रोडावल्याने मांसाहाराचे प्रमाणही घटले आहे. अगदी ग्रामीण भागातही मांसाहाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटल्याची माहिती आहे.