शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

दारुच्या पेगसोबतच पाणी, सोडय़ाचे दरही वधारले

By admin | Updated: April 4, 2017 17:35 IST

बियरबारमध्ये होत असलेली ग्राहकांची गर्दी लक्षात घेता 60 मि.ली., 90 मि.ली.च्या पेगचे दरही 10 ते 15 रुपयांनी वधारले असून, यासोबत सोडा, पाणी याच्या बाटल्यांमागेही दोन ते तीन रुपये अधिक आकारले जात आहेत.

 जळगाव, दि.4- राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गानजीक 500 मीटर अंतरातील बियर बार बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने शहरात जवळपास 100 बियरबार बंद झाले आहेत. न्यायालयाच्या आदेशांपासून बचावलेले फक्त सहा बियर बार सुरू असून, बंद बिरयबारमधील कारागीर, कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. तर बियरबारमध्ये होत असलेली ग्राहकांची गर्दी लक्षात घेता 60 मि.ली., 90 मि.ली.च्या पेगचे दरही 10 ते 15 रुपयांनी वधारले असून, यासोबत सोडा, पाणी याच्या बाटल्यांमागेही दोन ते तीन रुपये अधिक आकारले जात आहेत. 

1 एप्रिलपासून शहरातील 100 पेक्षा अधिक बियरबार बंद झाले आहेत. राज्यमार्ग, महामार्ग यापासून 500 मीटरपेक्षा अधिक अंतरावर असलेले फक्त सहा बियरबार शहरात सुरू आहेत. या बियरबारमध्ये दारू व जेवणासाठी येणा:या ग्राहकांची संख्या पाच पटीने वाढली आहे. 
रामनवमीनिमित्त शहरातील सर्वच बियरबार बंद होते, फक्त देशी दारूची काही दुकाने सुरू होती. या दुकानांवर मोठी गर्दी होती. भजेगल्ली परिसरातील एका दुकानात तर बाहेर्पयत रांग होती. यामुळे इतर वाहनधारकांना अडथळा होत होता. 
कारागिरांची संख्या वाढविली
ग्राहकांची गर्दी एकाच वेळी होत असल्याने संबंधित बियरबार मालकांना कारागीर, कर्मचारी यांची संख्या वाढवावी लागली आहे. सकाळपासून सायंकाळर्पयत बियरबारमध्ये मोठी गर्दी राहते. 
ढाब्यांवर अवैध विक्री
महामार्गालगत व इतर मार्गावरील ढाब्यांवर जेवणासाठी ग्राहक जातात, पण बियरबार बंद असल्याने संबंधित ढाब्यांवरही अवैध दारू विक्री वाढली आहे. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी उत्पादन शुल्क व इतर यंत्रणा अपु:या पडत असल्याचेही चित्र आहे. 
पान, शेंगदाणा, चिवडा पॅकेट्सला मागणी कमी
पान, शेंदगाणा, चिवडा आदी विक्रेते बियरबारनजीक मोठय़ा संख्येने आहेत. पण सध्या बियरबार बंद असल्याने पान, चिवडा व शेंगदाणा विक्रेत्यांनाही फटका बसत आहे. तळीरामांकडून चिवडा, शेंगदाणा पॅकेट्ना अधिक मागणी असते, अशी माहिती मिळाली. 
मांसाहारही घटला
बियरबारमध्ये मांसाहारी जेवणाचीही व्यवस्था असायची, पण आता बियरबारमध्ये दारू नसल्याने फक्त जेवणासाठी येणा:या ग्राहकांची संख्या फारशी नाही. ही संख्या रोडावल्याने मांसाहाराचे प्रमाणही घटले आहे. अगदी ग्रामीण भागातही मांसाहाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटल्याची माहिती आहे.