शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या पेगसोबतच पाणी, सोडय़ाचे दरही वधारले

By admin | Updated: April 4, 2017 17:35 IST

बियरबारमध्ये होत असलेली ग्राहकांची गर्दी लक्षात घेता 60 मि.ली., 90 मि.ली.च्या पेगचे दरही 10 ते 15 रुपयांनी वधारले असून, यासोबत सोडा, पाणी याच्या बाटल्यांमागेही दोन ते तीन रुपये अधिक आकारले जात आहेत.

 जळगाव, दि.4- राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गानजीक 500 मीटर अंतरातील बियर बार बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने शहरात जवळपास 100 बियरबार बंद झाले आहेत. न्यायालयाच्या आदेशांपासून बचावलेले फक्त सहा बियर बार सुरू असून, बंद बिरयबारमधील कारागीर, कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. तर बियरबारमध्ये होत असलेली ग्राहकांची गर्दी लक्षात घेता 60 मि.ली., 90 मि.ली.च्या पेगचे दरही 10 ते 15 रुपयांनी वधारले असून, यासोबत सोडा, पाणी याच्या बाटल्यांमागेही दोन ते तीन रुपये अधिक आकारले जात आहेत. 

1 एप्रिलपासून शहरातील 100 पेक्षा अधिक बियरबार बंद झाले आहेत. राज्यमार्ग, महामार्ग यापासून 500 मीटरपेक्षा अधिक अंतरावर असलेले फक्त सहा बियरबार शहरात सुरू आहेत. या बियरबारमध्ये दारू व जेवणासाठी येणा:या ग्राहकांची संख्या पाच पटीने वाढली आहे. 
रामनवमीनिमित्त शहरातील सर्वच बियरबार बंद होते, फक्त देशी दारूची काही दुकाने सुरू होती. या दुकानांवर मोठी गर्दी होती. भजेगल्ली परिसरातील एका दुकानात तर बाहेर्पयत रांग होती. यामुळे इतर वाहनधारकांना अडथळा होत होता. 
कारागिरांची संख्या वाढविली
ग्राहकांची गर्दी एकाच वेळी होत असल्याने संबंधित बियरबार मालकांना कारागीर, कर्मचारी यांची संख्या वाढवावी लागली आहे. सकाळपासून सायंकाळर्पयत बियरबारमध्ये मोठी गर्दी राहते. 
ढाब्यांवर अवैध विक्री
महामार्गालगत व इतर मार्गावरील ढाब्यांवर जेवणासाठी ग्राहक जातात, पण बियरबार बंद असल्याने संबंधित ढाब्यांवरही अवैध दारू विक्री वाढली आहे. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी उत्पादन शुल्क व इतर यंत्रणा अपु:या पडत असल्याचेही चित्र आहे. 
पान, शेंगदाणा, चिवडा पॅकेट्सला मागणी कमी
पान, शेंदगाणा, चिवडा आदी विक्रेते बियरबारनजीक मोठय़ा संख्येने आहेत. पण सध्या बियरबार बंद असल्याने पान, चिवडा व शेंगदाणा विक्रेत्यांनाही फटका बसत आहे. तळीरामांकडून चिवडा, शेंगदाणा पॅकेट्ना अधिक मागणी असते, अशी माहिती मिळाली. 
मांसाहारही घटला
बियरबारमध्ये मांसाहारी जेवणाचीही व्यवस्था असायची, पण आता बियरबारमध्ये दारू नसल्याने फक्त जेवणासाठी येणा:या ग्राहकांची संख्या फारशी नाही. ही संख्या रोडावल्याने मांसाहाराचे प्रमाणही घटले आहे. अगदी ग्रामीण भागातही मांसाहाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटल्याची माहिती आहे.