शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादकरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:17 IST

नशिराबाद : सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या नशिराबाद गावात मिळणारे आरओप्रणालीचे पाणीही थकीत वीज बिलामुळे मिळत नसल्याने ग्रामस्थांवर ...

नशिराबाद : सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या नशिराबाद गावात मिळणारे आरओप्रणालीचे पाणीही थकीत वीज बिलामुळे मिळत नसल्याने ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतने वीज बिल न भरल्याने त्याचा फटका ग्रामस्थांना बसत असून, सुस्त कारभारामुळे ग्रामस्थांच्या तोंडचे शुद्ध पाणी ग्रामपंचायतीनेच पळविल्याचा आरोप होत आहे.

नशिराबाद येथे सध्या सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात ग्रामस्थांना शुद्ध व थंड पाणी मिळणारे आरओप्रणाली केंद्र थकीत वीज बिलामुळे बंद आहे. गावातील पाणीपुरवठ्याची स्थिती पाहता गावात पाच रुपयांत वीस लिटर व एक रुपयात एक लिटर पाणी देण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्चून तीन ठिकाणी आरओप्रणाली केंद्र कार्यान्वित केले. आता तर या केंद्राचे वीज बिलच थकल्याने वीज कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आता हे पाणी मिळत नसल्यामुळे अनेकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. आरओप्रणाली केंद्र तात्काळ कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.