शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील साडेसहा लाख ठेवीदार ठेवींच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST

जळगाव : बीएचआर संस्थेसोबतच जिल्ह्यातील इतरही सहकारी पतसंस्थांनीमध्येदेखील बेसुमार कर्ज वाटप व वसुलीचा अभाव असल्याने पतसंस्थांची आर्थिक स्थिती खालावली ...

जळगाव : बीएचआर संस्थेसोबतच जिल्ह्यातील इतरही सहकारी पतसंस्थांनीमध्येदेखील बेसुमार कर्ज वाटप व वसुलीचा अभाव असल्याने पतसंस्थांची आर्थिक स्थिती खालावली व जिल्ह्यातील तब्बल साडे सहा लाख ठेवीदारांच्या दोन हजार कोटींच्या ठेवी अजूनही मिळालेल्या नाही. त्यामुळे सहकारातून उद्धार न होता केवळ स्वाहाकार झाल्याचे या वरून स्पष्ट होते.

बीएचआर संस्थेतील अपहार व इतर कारणांमुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून जळगावात चौकशी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील इतरही सहकारी संस्थेतील कारभार चर्चेत येत आहे.

सहकार विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण ६१२ पतसंस्था आहेत. यात ११० संस्था अडचणीत असल्याचे सांगितले जात असून ५४ संस्था अवसायनात आहे. तर ३७ संस्थांवर प्रशासक आहेत. या संस्था अडचणीत येण्यास अथवा त्यावर अवसायक येण्यासाठी संस्थांचा कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.

जिल्ह्यात पतसंस्था भरभराटीचा जो काळ होता, त्या वेळी संचालक मंडळाने स्वत:चे नातेवाईक अथवा जवळच्या मंडळींना बेसुमार कर्ज वाटप केले. यामुळे पतसंस्था डबघाईस आल्या व ठेवीदार हवालदिल झाले. तब्बल १० ते ११ वर्षांपासून या ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदार संस्था तसेच शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. मात्र काहीही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

अवसायक येऊनही ठेवीदार वाऱ्यावरच

बीएचआर संस्थेत अवसायक आल्यानंतरही ज्या प्रमाणे ठेवीदारांना त्यांची पूर्ण रक्कम मिळू शकली नाही, तिच स्थिती इतरही पतसंस्थांची आहे. या संस्थांवर प्रशासक आल्याने ठेवी मिळतील, यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र प्रत्यक्षात संस्थांच्या वसुलीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आजही जिल्ह्यातील साडेसहा लाख ठेवीदारांना ठेवी मिळालेल्या नाही. ठेवींचा हा आकडा जवळपास दोन हजार कोटींवर असून एवढी वसुली कधी होईल व ती ठेवीदारांना कशी मिळेल, याचे उत्तर आज तरी पतसंस्थांकडे नाही.

ठेवीदार समिती नेमणुकीविषयी केवळ चालढकल

कोणतीही संस्था अडचणीत आल्यानंतर त्यावर प्रशासक नेमला जातो. या सोबतच तेथे ठेवीदारांची समिती नेमावी, असा सहकार कायदा आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत गेले व संस्थांवर केवळ प्रशासकच आहे. ठेवीदार समिती नेमणुकीविषयी वारंवार मागणी होऊनही त्या विषयी हालचाली झाल्या नाही व एवढ्या वर्षांपासून केवळ चालढकलच सुरू असल्याचे चित्र सहकारी संस्थांमध्ये आहे. त्यामुळे सहकारातून उद्धार होताना केवळ संचालकांनी स्वत:चा व नातेवाईकांचाच उद्धार करून घेतल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.