शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

जिल्ह्यातील साडेसहा लाख ठेवीदार ठेवींच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST

जळगाव : बीएचआर संस्थेसोबतच जिल्ह्यातील इतरही सहकारी पतसंस्थांनीमध्येदेखील बेसुमार कर्ज वाटप व वसुलीचा अभाव असल्याने पतसंस्थांची आर्थिक स्थिती खालावली ...

जळगाव : बीएचआर संस्थेसोबतच जिल्ह्यातील इतरही सहकारी पतसंस्थांनीमध्येदेखील बेसुमार कर्ज वाटप व वसुलीचा अभाव असल्याने पतसंस्थांची आर्थिक स्थिती खालावली व जिल्ह्यातील तब्बल साडे सहा लाख ठेवीदारांच्या दोन हजार कोटींच्या ठेवी अजूनही मिळालेल्या नाही. त्यामुळे सहकारातून उद्धार न होता केवळ स्वाहाकार झाल्याचे या वरून स्पष्ट होते.

बीएचआर संस्थेतील अपहार व इतर कारणांमुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून जळगावात चौकशी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील इतरही सहकारी संस्थेतील कारभार चर्चेत येत आहे.

सहकार विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण ६१२ पतसंस्था आहेत. यात ११० संस्था अडचणीत असल्याचे सांगितले जात असून ५४ संस्था अवसायनात आहे. तर ३७ संस्थांवर प्रशासक आहेत. या संस्था अडचणीत येण्यास अथवा त्यावर अवसायक येण्यासाठी संस्थांचा कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.

जिल्ह्यात पतसंस्था भरभराटीचा जो काळ होता, त्या वेळी संचालक मंडळाने स्वत:चे नातेवाईक अथवा जवळच्या मंडळींना बेसुमार कर्ज वाटप केले. यामुळे पतसंस्था डबघाईस आल्या व ठेवीदार हवालदिल झाले. तब्बल १० ते ११ वर्षांपासून या ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदार संस्था तसेच शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. मात्र काहीही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

अवसायक येऊनही ठेवीदार वाऱ्यावरच

बीएचआर संस्थेत अवसायक आल्यानंतरही ज्या प्रमाणे ठेवीदारांना त्यांची पूर्ण रक्कम मिळू शकली नाही, तिच स्थिती इतरही पतसंस्थांची आहे. या संस्थांवर प्रशासक आल्याने ठेवी मिळतील, यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र प्रत्यक्षात संस्थांच्या वसुलीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आजही जिल्ह्यातील साडेसहा लाख ठेवीदारांना ठेवी मिळालेल्या नाही. ठेवींचा हा आकडा जवळपास दोन हजार कोटींवर असून एवढी वसुली कधी होईल व ती ठेवीदारांना कशी मिळेल, याचे उत्तर आज तरी पतसंस्थांकडे नाही.

ठेवीदार समिती नेमणुकीविषयी केवळ चालढकल

कोणतीही संस्था अडचणीत आल्यानंतर त्यावर प्रशासक नेमला जातो. या सोबतच तेथे ठेवीदारांची समिती नेमावी, असा सहकार कायदा आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत गेले व संस्थांवर केवळ प्रशासकच आहे. ठेवीदार समिती नेमणुकीविषयी वारंवार मागणी होऊनही त्या विषयी हालचाली झाल्या नाही व एवढ्या वर्षांपासून केवळ चालढकलच सुरू असल्याचे चित्र सहकारी संस्थांमध्ये आहे. त्यामुळे सहकारातून उद्धार होताना केवळ संचालकांनी स्वत:चा व नातेवाईकांचाच उद्धार करून घेतल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.