शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

जळगाव तालुक्यात खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST

नोंदणी करूनही माल विक्रीसाठी करावा लागतोय खटाटोप : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात रब्बी पिकांच्या शासकीय खरेदीला तब्बल ...

नोंदणी करूनही माल विक्रीसाठी करावा लागतोय खटाटोप :

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात रब्बी पिकांच्या शासकीय खरेदीला तब्बल दीड महिने उशिराने सुरुवात झाली असली तरी खरेदी केंद्र सुरू होऊनदेखील अजूनही शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नसल्याची स्थिती जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पीक विक्रीसाठी नोंदणी करूनदेखील बऱ्याच केंद्रावर अजूनही नोंदणी धारक शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात आलेला नाही, तर जळगाव तालुक्यातील केंद्रावर तर अजूनही खरेदीला मुहूर्तच मिळालेला नाही.

दरवर्षी जिल्ह्यात रब्बी हंगाम काढल्यानंतर एप्रिल महिन्याचा अखेरपर्यंत रब्बीच्या शासकीय खरेदीला सुरुवात होत होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून रब्बी हंगाम काढल्यानंतर तब्बल महिनाभराच्या उशिराने केंद्र सुरू होत आहे. तसेच याठिकाणी नोंदणी करूनदेखील बऱ्याच शेतकऱ्यांचा माल खरेदी न करता, खरेदी केंद्र बंद केले जात आहे. यावर्षीदेखील मक्याचे उद्दिष्ट कमी असून, जवळपास आठ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत ३० हजार क्विंटलपर्यंत मक्याची खरेदी झाली आहे. तर हरभऱ्याची खरेदी एप्रिल महिन्यातच सुरू झाली होती. त्यानुसार जिल्ह्यात ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक हरभऱ्याची खरेदी झाली आहे. गहू व ज्वारीच्या खरेदीलादेखील बराच उशीर झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न पाहता व्यापाऱ्यांकडे मिळेल त्या भावात मालाची विक्री केली आहे.