शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

४२ कोटींबाबत बैठकीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:14 IST

जळगाव : शासनाकडून विविध विकासकामांसाठी प्राप्त ४२ कोटींच्या निधीवर शासनाने पुन्हा स्थगिती दिली आहे. या निधीबाबत नगरविकास मंत्रालयात बैठक ...

जळगाव : शासनाकडून विविध विकासकामांसाठी प्राप्त ४२ कोटींच्या निधीवर शासनाने पुन्हा स्थगिती दिली आहे. या निधीबाबत नगरविकास मंत्रालयात बैठक घेण्यात येणार होती. मात्र, अजूनही ही बैठक झाली नसल्याने, निधीतून होणारी कामेही लांबत आहेत. विशेष म्हणजे, या निधीतून होणाऱ्या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेशही देण्यात आले आहेत. मात्र, नगरविकास खात्याने या निधीला पुन्हा स्थगिती दिल्यामुळे कामांना ब्रेक लागला आहे.

मनपाचे अंदाजपत्रक १८ रोजी होणार सादर?

जळगाव महापालिकेच्या २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक १८ फेब्रुवारी रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. मनपा प्रशासनाकडून अंदाजपत्रक सादर केल्यानंतर, स्थायी समिती त्यावर अभ्यास करून, स्थायी समिती सभापती काही दिवसांनंतर अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर, महासभेकडून मंजुरी दिली जाणार आहे. या वर्षी मनपाकडून रस्त्यांसाठी भरीव निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे.

आजपासून अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र होणार

जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांलगत वाढत जाणाऱ्या अतिक्रमणांमुळे शहरात वाहतूककोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून काही दिवसांपासून कारवाईची मोहीम अधिकच तीव्र केली आहे. आता शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी मनपाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, सोमवारपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. मुख्य रस्त्यालगतच्या अनधिकृत हॉकर्ससह, अनधिकृत धार्मिक स्थळे व काही पक्के बांधकाम मनपाच्या रडारवर राहणार आहेत.

पारा १० अंशावर

जळगाव : गेल्या आठवडाभरापसून तापमानात मोठी घट होत असून, रविवारी शहराचा पारा पुन्हा १० अंशांपर्यंत खाली आला आहे. यामुळे गारठा पुन्हा वाढू लागला आहे. विशेष म्हणजे, रविवारी कमाल तापमानात २ अंशाची घट होऊन पारा ३० अंशांवर आला होता. यामुळे भरदुपारीही काही प्रमाणात गारवा जाणवत होता, तसेच आगामी आठवडाभर तापमानात घट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

घनकचऱ्याच्या प्रश्नावर नागरिक घेणार आयुक्तांची भेट

जळगाव : आव्हाणे शिवारातील मनपाच्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणाहून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून, पवार पार्क, प्रा.चंदू अण्णा नगर भागातील नागरिक या धुराच्या समस्येबाबत मनपा आयुक्तांची भेट घेणार आहेत. कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे निघणाऱ्या धुरामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही मनपा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने, आता नागरिक संतप्त झाले आहेत.