शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

४२ कोटींबाबत बैठकीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:14 IST

जळगाव : शासनाकडून विविध विकासकामांसाठी प्राप्त ४२ कोटींच्या निधीवर शासनाने पुन्हा स्थगिती दिली आहे. या निधीबाबत नगरविकास मंत्रालयात बैठक ...

जळगाव : शासनाकडून विविध विकासकामांसाठी प्राप्त ४२ कोटींच्या निधीवर शासनाने पुन्हा स्थगिती दिली आहे. या निधीबाबत नगरविकास मंत्रालयात बैठक घेण्यात येणार होती. मात्र, अजूनही ही बैठक झाली नसल्याने, निधीतून होणारी कामेही लांबत आहेत. विशेष म्हणजे, या निधीतून होणाऱ्या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेशही देण्यात आले आहेत. मात्र, नगरविकास खात्याने या निधीला पुन्हा स्थगिती दिल्यामुळे कामांना ब्रेक लागला आहे.

मनपाचे अंदाजपत्रक १८ रोजी होणार सादर?

जळगाव महापालिकेच्या २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक १८ फेब्रुवारी रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. मनपा प्रशासनाकडून अंदाजपत्रक सादर केल्यानंतर, स्थायी समिती त्यावर अभ्यास करून, स्थायी समिती सभापती काही दिवसांनंतर अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर, महासभेकडून मंजुरी दिली जाणार आहे. या वर्षी मनपाकडून रस्त्यांसाठी भरीव निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे.

आजपासून अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र होणार

जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांलगत वाढत जाणाऱ्या अतिक्रमणांमुळे शहरात वाहतूककोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून काही दिवसांपासून कारवाईची मोहीम अधिकच तीव्र केली आहे. आता शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी मनपाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, सोमवारपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. मुख्य रस्त्यालगतच्या अनधिकृत हॉकर्ससह, अनधिकृत धार्मिक स्थळे व काही पक्के बांधकाम मनपाच्या रडारवर राहणार आहेत.

पारा १० अंशावर

जळगाव : गेल्या आठवडाभरापसून तापमानात मोठी घट होत असून, रविवारी शहराचा पारा पुन्हा १० अंशांपर्यंत खाली आला आहे. यामुळे गारठा पुन्हा वाढू लागला आहे. विशेष म्हणजे, रविवारी कमाल तापमानात २ अंशाची घट होऊन पारा ३० अंशांवर आला होता. यामुळे भरदुपारीही काही प्रमाणात गारवा जाणवत होता, तसेच आगामी आठवडाभर तापमानात घट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

घनकचऱ्याच्या प्रश्नावर नागरिक घेणार आयुक्तांची भेट

जळगाव : आव्हाणे शिवारातील मनपाच्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणाहून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून, पवार पार्क, प्रा.चंदू अण्णा नगर भागातील नागरिक या धुराच्या समस्येबाबत मनपा आयुक्तांची भेट घेणार आहेत. कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे निघणाऱ्या धुरामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही मनपा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने, आता नागरिक संतप्त झाले आहेत.