शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार शेतकर्‍यांना विजेची प्रतीक्षा

By admin | Updated: May 21, 2014 01:12 IST

नंदुरबार जिल्हा : पाणी असूनही बागायती शेतीसाठी अडसर

नंदुरबार : शेतकर्‍यांना कृषिपंपांसाठी वीज जोडणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे पैसे भरूनही तब्बल तीन हजार शेतकरी विजेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतात पाण्याची सुविधा असूनही बागायती शेती होऊ शकत नसल्याने शेतकर्‍यांची प्रगती खुंटली आहे. शासनातर्फे शेती आणि शेतकर्‍यांच्या विकासाच्या गप्पा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे शेतकर्‍यांपर्यंत योजना पोहोचत नसल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जिल्ह्यातील तब्बल दोन हजार ९४८ शेतकरी अजूनही कृषिपंपासाठी लागणार्‍या विजेच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे या शेतकर्‍यांनी डिमांडसाठी तब्बल तीन वर्षांपासून रक्कम भरूनही त्यांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात फेर्‍या माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील चित्र पाहिल्यास यावर्षी चार हजार ५२६ कृषिपंपांना वीज देण्याचे लक्ष्य ठरविले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ एक हजार ५७८ शेतकर्‍यांना वीज जोडणी मिळाली आहे. तालुकानिहाय चित्र पाहिल्यास नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील वीज जोडणी न मिळालेल्या शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. नंदुरबार तालुक्यातील एक हजार ३६७ शेतकर्‍यांना वीज जोडणी मिळालेली नाही. तर नवापूर तालुक्यातील ९३५ शेतकर्‍यांना, शहादा तालुक्यातील २८४, अक्कलकुवा तालुक्यातील २१६, धडगाव तालुक्यात ४८ आणि तळोदा तालुक्यातील ३८ शेतकर्‍यांना पैसे भरूनही वीज जोडणी मिळालेली नाही. वीज नसल्याने शेतात पाण्याची सुविधा असतानाही बागायती पिकांची लागवड शेतकरी करू शकत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रगतीत प्रशासनाचे आडमुठे धोरण अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे.