शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तीन हजार शेतकर्‍यांना विजेची प्रतीक्षा

By admin | Updated: May 21, 2014 01:12 IST

नंदुरबार जिल्हा : पाणी असूनही बागायती शेतीसाठी अडसर

नंदुरबार : शेतकर्‍यांना कृषिपंपांसाठी वीज जोडणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे पैसे भरूनही तब्बल तीन हजार शेतकरी विजेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतात पाण्याची सुविधा असूनही बागायती शेती होऊ शकत नसल्याने शेतकर्‍यांची प्रगती खुंटली आहे. शासनातर्फे शेती आणि शेतकर्‍यांच्या विकासाच्या गप्पा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे शेतकर्‍यांपर्यंत योजना पोहोचत नसल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जिल्ह्यातील तब्बल दोन हजार ९४८ शेतकरी अजूनही कृषिपंपासाठी लागणार्‍या विजेच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे या शेतकर्‍यांनी डिमांडसाठी तब्बल तीन वर्षांपासून रक्कम भरूनही त्यांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात फेर्‍या माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील चित्र पाहिल्यास यावर्षी चार हजार ५२६ कृषिपंपांना वीज देण्याचे लक्ष्य ठरविले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ एक हजार ५७८ शेतकर्‍यांना वीज जोडणी मिळाली आहे. तालुकानिहाय चित्र पाहिल्यास नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील वीज जोडणी न मिळालेल्या शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. नंदुरबार तालुक्यातील एक हजार ३६७ शेतकर्‍यांना वीज जोडणी मिळालेली नाही. तर नवापूर तालुक्यातील ९३५ शेतकर्‍यांना, शहादा तालुक्यातील २८४, अक्कलकुवा तालुक्यातील २१६, धडगाव तालुक्यात ४८ आणि तळोदा तालुक्यातील ३८ शेतकर्‍यांना पैसे भरूनही वीज जोडणी मिळालेली नाही. वीज नसल्याने शेतात पाण्याची सुविधा असतानाही बागायती पिकांची लागवड शेतकरी करू शकत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रगतीत प्रशासनाचे आडमुठे धोरण अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे.