शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

तीन हजार शेतकर्‍यांना विजेची प्रतीक्षा

By admin | Updated: May 21, 2014 01:12 IST

नंदुरबार जिल्हा : पाणी असूनही बागायती शेतीसाठी अडसर

नंदुरबार : शेतकर्‍यांना कृषिपंपांसाठी वीज जोडणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे पैसे भरूनही तब्बल तीन हजार शेतकरी विजेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतात पाण्याची सुविधा असूनही बागायती शेती होऊ शकत नसल्याने शेतकर्‍यांची प्रगती खुंटली आहे. शासनातर्फे शेती आणि शेतकर्‍यांच्या विकासाच्या गप्पा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे शेतकर्‍यांपर्यंत योजना पोहोचत नसल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जिल्ह्यातील तब्बल दोन हजार ९४८ शेतकरी अजूनही कृषिपंपासाठी लागणार्‍या विजेच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे या शेतकर्‍यांनी डिमांडसाठी तब्बल तीन वर्षांपासून रक्कम भरूनही त्यांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात फेर्‍या माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील चित्र पाहिल्यास यावर्षी चार हजार ५२६ कृषिपंपांना वीज देण्याचे लक्ष्य ठरविले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ एक हजार ५७८ शेतकर्‍यांना वीज जोडणी मिळाली आहे. तालुकानिहाय चित्र पाहिल्यास नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील वीज जोडणी न मिळालेल्या शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. नंदुरबार तालुक्यातील एक हजार ३६७ शेतकर्‍यांना वीज जोडणी मिळालेली नाही. तर नवापूर तालुक्यातील ९३५ शेतकर्‍यांना, शहादा तालुक्यातील २८४, अक्कलकुवा तालुक्यातील २१६, धडगाव तालुक्यात ४८ आणि तळोदा तालुक्यातील ३८ शेतकर्‍यांना पैसे भरूनही वीज जोडणी मिळालेली नाही. वीज नसल्याने शेतात पाण्याची सुविधा असतानाही बागायती पिकांची लागवड शेतकरी करू शकत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रगतीत प्रशासनाचे आडमुठे धोरण अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे.