शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वाघुर जलवाहिनीची वर्षभरात 40 वेळा गळती दुरुस्ती

By admin | Updated: September 30, 2015 00:15 IST

जळगाव : मनपाने वाघूर जलवाहिनी दुरुस्तीसाठी मक्त्यासाठी 35 लाख रुपये खर्च झाला असून 40 गळत्यांची दुरुस्ती केल्याचा दावा केला आहे. मात्र जलवाहिनीवर 8 ठिकाणी तर उपवाहिन्यांवर 2 गळत्या आहेत.

जळगाव : मनपा पाणीपुरवठा विभागाने वाघूर जलवाहिनी दुरुस्तीसाठी मागील वर्षभरासाठी दिलेल्या मक्त्यासाठी 35 लाख रुपये खर्च झाला असून 40 गळत्यांची दुरुस्ती करण्यात आली असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागातर्फे केला जात आहे. मात्र असे असतानाही अद्यापही वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवर तब्बल 8 ठिकाणी तर उपवाहिन्यांवर दोन ठिकाणी गळत्या कायम आहेत.

विशेष म्हणजे सध्या वाघूर जलवाहिनीवर असलेल्या गळत्या गेल्या तीन-चार महिने आधीच्या आहेत.

याबाबत भाजपाचे नगरसेवक अनिल देशमुख यांनी लेखी तक्रारदेखील पाणीपुरवठा विभागाकडे केलेली आहे. तरीदेखील त्याची दुरुस्ती मक्तेदाराने तातडीने का केली नाही? असाही सवाल त्यामुळे उपस्थित होत आहे.

मनपा पाणीपुरवठा विभागातर्फे वाघूर जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीसाठी मक्ता देऊनही सध्या मुख्य जलवाहिनीवर 8 ठिकाणी गळती असून अन्य 2 ठिकाणीही गळती आहे. या गळत्या मागील वर्षीच्या मक्तेदाराच्या काळातील असतानाही त्याच्याकडून या गळत्यांची दुरुस्ती झालेली नाही.

आता त्याच गळत्या दुरुस्तीसाठी नव्याने मक्ता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मग मक्ता देण्याचा फायदा काय? असा सवाल उपस्थित होत आहे. जर आधीच्या काळातील गळत्या असतील तर करारातील अटीशर्ती काय होत्या.

साहित्य भले मनपाने खरेदी करून दिले असते तरीही दुरुस्ती संबंधित मक्तेदारानेच करणे अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी याची दखल घ्यावी व जुन्या मक्तेदाराकडूनच ही दुरुस्ती करून घेण्याची मागणी होत आहे.

अशी केली दुरुस्ती

मक्तेदाराने 26 ऑगस्ट 2014 ते 31 जुलै 2015 या कालावधित एकूण 19 ठिकाणी जलवाहिनी गळती दुरुस्तीचे काम केले असून त्यात गिरणा टाकीमागील कॉर्नरवर, भुसावळ हायवेवरील श्री प्लाझा अपार्टमेंटसमोर, के.के. कॅन रस्त्यावर गृहकूल सोसायटीसमोर, मेहरूण जयदुर्गा वेल्डिंग वर्क्‍ससमोर, अजिंठा रोड आर.एल. कंपनीसमोर, शिवाजीउद्यान स्मशानभूमी रस्त्यावर व्हॉल्व चेंबरजवळ या सहा ठिकाणी पाईप टाकण्यात आले. तर 19 गळती दुरुस्तीच्या कामात 24 जॉईंट टाकण्यात आले. त्यात डीएसपी बंगल्याशेजारील रस्त्यावर 1200 मिमीचे 7 जॉईंट 17 जून 2015रोजी टाकण्यात आले आहेत. याखेरीज तब्बल 21 ठिकाणी एअरव्हॉल्व बसविण्यात आले. या सर्व कामांसाठी वर्षभरात 35 लाख 83 हजार 596 रुपये इतका खर्च झाला असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडील नोंदीमध्ये नमूद करण्यात आले आहे.