शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाघुर जलवाहिनीची वर्षभरात 40 वेळा गळती दुरुस्ती

By admin | Updated: September 30, 2015 00:15 IST

जळगाव : मनपाने वाघूर जलवाहिनी दुरुस्तीसाठी मक्त्यासाठी 35 लाख रुपये खर्च झाला असून 40 गळत्यांची दुरुस्ती केल्याचा दावा केला आहे. मात्र जलवाहिनीवर 8 ठिकाणी तर उपवाहिन्यांवर 2 गळत्या आहेत.

जळगाव : मनपा पाणीपुरवठा विभागाने वाघूर जलवाहिनी दुरुस्तीसाठी मागील वर्षभरासाठी दिलेल्या मक्त्यासाठी 35 लाख रुपये खर्च झाला असून 40 गळत्यांची दुरुस्ती करण्यात आली असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागातर्फे केला जात आहे. मात्र असे असतानाही अद्यापही वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवर तब्बल 8 ठिकाणी तर उपवाहिन्यांवर दोन ठिकाणी गळत्या कायम आहेत.

विशेष म्हणजे सध्या वाघूर जलवाहिनीवर असलेल्या गळत्या गेल्या तीन-चार महिने आधीच्या आहेत.

याबाबत भाजपाचे नगरसेवक अनिल देशमुख यांनी लेखी तक्रारदेखील पाणीपुरवठा विभागाकडे केलेली आहे. तरीदेखील त्याची दुरुस्ती मक्तेदाराने तातडीने का केली नाही? असाही सवाल त्यामुळे उपस्थित होत आहे.

मनपा पाणीपुरवठा विभागातर्फे वाघूर जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीसाठी मक्ता देऊनही सध्या मुख्य जलवाहिनीवर 8 ठिकाणी गळती असून अन्य 2 ठिकाणीही गळती आहे. या गळत्या मागील वर्षीच्या मक्तेदाराच्या काळातील असतानाही त्याच्याकडून या गळत्यांची दुरुस्ती झालेली नाही.

आता त्याच गळत्या दुरुस्तीसाठी नव्याने मक्ता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मग मक्ता देण्याचा फायदा काय? असा सवाल उपस्थित होत आहे. जर आधीच्या काळातील गळत्या असतील तर करारातील अटीशर्ती काय होत्या.

साहित्य भले मनपाने खरेदी करून दिले असते तरीही दुरुस्ती संबंधित मक्तेदारानेच करणे अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी याची दखल घ्यावी व जुन्या मक्तेदाराकडूनच ही दुरुस्ती करून घेण्याची मागणी होत आहे.

अशी केली दुरुस्ती

मक्तेदाराने 26 ऑगस्ट 2014 ते 31 जुलै 2015 या कालावधित एकूण 19 ठिकाणी जलवाहिनी गळती दुरुस्तीचे काम केले असून त्यात गिरणा टाकीमागील कॉर्नरवर, भुसावळ हायवेवरील श्री प्लाझा अपार्टमेंटसमोर, के.के. कॅन रस्त्यावर गृहकूल सोसायटीसमोर, मेहरूण जयदुर्गा वेल्डिंग वर्क्‍ससमोर, अजिंठा रोड आर.एल. कंपनीसमोर, शिवाजीउद्यान स्मशानभूमी रस्त्यावर व्हॉल्व चेंबरजवळ या सहा ठिकाणी पाईप टाकण्यात आले. तर 19 गळती दुरुस्तीच्या कामात 24 जॉईंट टाकण्यात आले. त्यात डीएसपी बंगल्याशेजारील रस्त्यावर 1200 मिमीचे 7 जॉईंट 17 जून 2015रोजी टाकण्यात आले आहेत. याखेरीज तब्बल 21 ठिकाणी एअरव्हॉल्व बसविण्यात आले. या सर्व कामांसाठी वर्षभरात 35 लाख 83 हजार 596 रुपये इतका खर्च झाला असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडील नोंदीमध्ये नमूद करण्यात आले आहे.