शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘वाघूर’चे पाणी मिळणार पाईप लाईनद्वारे

By admin | Updated: July 5, 2016 18:39 IST

वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यावरून बंदीस्त पाईप लाईनने सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्राच्या कृषि सिंचन योजनेतून निधी प्राप्त झाला असून मार्च २०१७ पर्यंत हे काम पूर्ण करणे

निधी प्राप्त : मार्च २०१७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे बंधनजळगाव : वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यावरून बंदीस्त पाईप लाईनने सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्राच्या कृषि सिंचन योजनेतून निधी प्राप्त झाला असून मार्च २०१७ पर्यंत हे काम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या माध्यमातून जळगाव तालुक्यातील ६ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. भादली शाखा कालवा व वितरिकेव्दारे ८११५ हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित आहे. मात्र या क्षेत्रात भूसंपादन प्रक्रियेस झालेल्या विरोधामुळे वितरण प्रणालीचे काम २०१० पासून अपूर्णावस्थेत आहे. परिणामी जवळपास ६६३२ हेक्टर सिंचन क्षमतेपासून जळगाव तालुक्यातील डाव्या कालव्यावरील परिसर वंचित आहे. वाघूर प्रकल्प हा केंद्र शासनाच्या वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आला आहे. त्यामुळे कालमर्यादा निश्चित करून प्रकल्पाच्या कालव्यांचे काम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार मार्च २०१७ पर्यंतची डेड लाईन ठरवून देण्यात आली आहे. ३५ ते ४० किलो मीटर पाईपलाईनया क्षेत्रासाठी ३५ ते ४० किलो मीटर लहान व मोठी पाईप लाईन टाकली जाणार आहे. कामाच्या नियोजनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात असून नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे प्रस्तावित आहे.