शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

वडगाव कॅनॉलला पाण्याची आस

By admin | Updated: January 17, 2017 23:39 IST

बाळद ता.पाचोरा : वडगाव कॅनॉलमध्ये गिरणा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली

बाळद ता.पाचोरा : वडगाव  कॅनॉलमध्ये  गिरणा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली असून लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लवकर पुरेसे पाणी न मिळाल्यास केळीच्या पिकास काही प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.हा परिसर बागायती म्हणून ओळखला जातो. परिसरातील मुख्य पीक म्हणजे केळी हे आहे. इतर पिकांपेक्षा या पिकाला जादा पाणी लागते. बाळद शिवारात  मोठे धरण व पाट नाही. यामुळे भविष्यात शेतीसाठीचे पाणी तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात उद्भवू शकतो. यंदा वरुणराजा चांगला बरसला. परंतु पावसाचे पाणी वाहून गेले. पाण्याअभावी अनेक शेतकºयांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. माजी आमदार आर.ओ.पाटील व जि.प. माजी उपाध्यक्ष प्रकाश सोमवंशी यांनी े वडगाव कॅनॉलची दुरुस्ती करुन दोन-तीन वर्षे गिरणा धरणाचे पाणी या कॅनॉलला सोडून  १५ गावांना या पाण्याचा पाटचाºयांद्वारे लाभ झाला होता. गिरणा धरणातील पाणी साठ्यापैकी ८ टक्के पाणी हे वडगाव कॅनॉलसाठी राखीव असल्याने हे पाणी या कॅनॉलमध्ये सोडल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल आणि परिसरातील विहिरींच्या जलपातळीतही वाढ होईल. परिसरात केळी, मका, ज्वारी, बाजरी या रब्बी पिकाचा पेरा सर्वाधिक आहे. हे पीक पाण्याशिवाय हिरावले जावू नये यासाठी गिरणा धरणाचे पाणी वडगाव कॅनॉलमध्ये सोडावे अशी मागणी  शेतकºयांनी केली आहे. (वार्ताहर)वडगाव कॅनॉल हा ब्रिटीशकालीन  आहे.  या कॅनॉसाठी गिरणा धरणातील साठ्यापैकी ८ टक्के जलसाठा राखीव आहे. हे पाणी या कॅनालमध्ये सोडल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटू शकतो पण यासाठी गरज आहे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची.