शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
2
भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
3
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
6
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
7
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
8
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
9
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
10
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
11
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
12
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
13
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
14
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
15
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
16
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
17
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
18
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
19
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
20
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

वल्गना मोठ्या; खान्देश उपाशीच राहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:49 IST

राज्यकर्त्यांच्या दौऱ्याचा गडगडाट फार; प्रत्यक्षात हाती भोपळा, शेतकरी, आदिवासी यांच्यासाठी राज्य चालविताना त्यांना काय दिले?, रखडलेल्या प्रकल्पांविषयी बोलणार कधी आणि कृती होणार कधी?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आठवडाभरात खान्देशचा दौरा केला. दौºयाची चर्चा खूप झाली; पण खान्देश उपाशीच राहिला.मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांचा हा पहिला जळगाव जिल्ह्याचा दौरा होता. मुळात सरकार स्थापन होऊन कमी कालावधी झाला असल्याने फार काही अपेक्षा त्यांच्याकडून नव्हत्या. परंतु, राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार हे विस्कटलेली घडी बसवतील, असे वाटत होते. जळगाव जिल्ह्यातील कृषी आणि सहकार क्षेत्राची पुरेपूर माहिती असताना त्यांच्याकडून ठोस काही आश्वासने मिळाली नाहीत. शेतकऱ्यांचे कारखाने भाडेतत्त्वावर दिली जाऊ नये, या त्यांच्या विधानाविषयी मतप्रवाह निर्माण होऊ शकतात. सहकार क्षेत्रात अशी स्थिती का निर्माण झाली, त्याला कोण जबाबदार आहेत. आजारी कारखाने कोणी विकत घेतले, ते कोणत्या पक्षाचे आहेत, आणि आता ते कारखाने नफ्यात कसे? हे प्रश्न निश्चित उपस्थित होतात.ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मेळावा आणि पवार यांनी राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी वेळ दिला. कोणत्याही निवडणुका नसताना संघटनेवर जोर दिला जात आहे. पण जळगाव जिल्ह्याच्या प्रलंबित कामांविषयी कोणतीही आढावा बैठक झाली नाही.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही अस्तित्वात असलेल्या कृषी संशोधन केंद्राच्या पुन्हा स्थापनेची मागणी करुन तमाम शेतकºयांना आश्चर्यचकीत केले. तिकडे नंदुरबारात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवस आले. डोनाल्ड ट्रम्प आणि कोश्यारी यांचे दौरे सारखेच. त्यांना केवळ छान छान आणि गोड गोड चित्र दाखवायचे; मूळ प्रश्न, अडचणी यापासून दूर ठेवायचे, असा मामला होता. भगदरी आणि मोलगी येथे मुख्यमंत्री येऊन गेले, राज्यपाल येऊन गेले. त्या दोन्ही गावांमधील शासकीय कार्यालये, योजनांचे फलित म्हणजे संपूर्ण नंदुरबार जिल्हा असा समज राज्यकर्त्यांचा करुन देण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे. त्यात राज्यपाल महोदयांनी स्वत:च्या गावाचे उदाहरण देऊन आजही मी दीड कि.मी. पायी चालत घरी जातो, असे म्हणणे स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत भूषणावह बाब आहे काय?धुळ्यात मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या विषयावरुन खासदार डॉ.सुभाष भामरे आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राष्टÑवादी अनिल गोटे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी केवळ एक हजार रुपयाची तरतूद असल्याचे गोटेंनी उघडकीस आणले. प्रत्युत्तर म्हणून भामरे यांनी सर्वेक्षण सुरु असलेल्या भागातील शेतकºयांना आणून पत्रकार परिषद घेतली. यातून धुळेकरांना एवढे मात्र कळले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी भूमिपूजन केलेल्या या रेल्वे मार्गाविषयी अद्याप जमिनीत खुणा गाडण्याशिवाय काहीही झालेले नाही. महाराष्टÑ व मध्यप्रदेश सरकार व रेल्वे मंत्रालयात करार झालेला नाही. शिपींग मंत्रालयानेदेखील कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही.ठाकरे आणि पवार शेतकºयांविषयी नेहमीबोलत असले तरी खान्देशातील केळी, कापूस आणि प्रक्रिया उद्योगाविषयी काहीही ठोस विधान केले गेले नाही. निवडणुका संपल्या; आता सरकारकडून काम हवे आहे. मात्र महाविकास आघाडीचा मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शनाला महत्त्व देण्यात आले. कोणतीही बैठक घेतली गेली नाही. रखडलेल्या प्रकल्पांविषयी चकार कोणी बोलले नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव