शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वल्गना मोठ्या; खान्देश उपाशीच राहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:49 IST

राज्यकर्त्यांच्या दौऱ्याचा गडगडाट फार; प्रत्यक्षात हाती भोपळा, शेतकरी, आदिवासी यांच्यासाठी राज्य चालविताना त्यांना काय दिले?, रखडलेल्या प्रकल्पांविषयी बोलणार कधी आणि कृती होणार कधी?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आठवडाभरात खान्देशचा दौरा केला. दौºयाची चर्चा खूप झाली; पण खान्देश उपाशीच राहिला.मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांचा हा पहिला जळगाव जिल्ह्याचा दौरा होता. मुळात सरकार स्थापन होऊन कमी कालावधी झाला असल्याने फार काही अपेक्षा त्यांच्याकडून नव्हत्या. परंतु, राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार हे विस्कटलेली घडी बसवतील, असे वाटत होते. जळगाव जिल्ह्यातील कृषी आणि सहकार क्षेत्राची पुरेपूर माहिती असताना त्यांच्याकडून ठोस काही आश्वासने मिळाली नाहीत. शेतकऱ्यांचे कारखाने भाडेतत्त्वावर दिली जाऊ नये, या त्यांच्या विधानाविषयी मतप्रवाह निर्माण होऊ शकतात. सहकार क्षेत्रात अशी स्थिती का निर्माण झाली, त्याला कोण जबाबदार आहेत. आजारी कारखाने कोणी विकत घेतले, ते कोणत्या पक्षाचे आहेत, आणि आता ते कारखाने नफ्यात कसे? हे प्रश्न निश्चित उपस्थित होतात.ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मेळावा आणि पवार यांनी राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी वेळ दिला. कोणत्याही निवडणुका नसताना संघटनेवर जोर दिला जात आहे. पण जळगाव जिल्ह्याच्या प्रलंबित कामांविषयी कोणतीही आढावा बैठक झाली नाही.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही अस्तित्वात असलेल्या कृषी संशोधन केंद्राच्या पुन्हा स्थापनेची मागणी करुन तमाम शेतकºयांना आश्चर्यचकीत केले. तिकडे नंदुरबारात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवस आले. डोनाल्ड ट्रम्प आणि कोश्यारी यांचे दौरे सारखेच. त्यांना केवळ छान छान आणि गोड गोड चित्र दाखवायचे; मूळ प्रश्न, अडचणी यापासून दूर ठेवायचे, असा मामला होता. भगदरी आणि मोलगी येथे मुख्यमंत्री येऊन गेले, राज्यपाल येऊन गेले. त्या दोन्ही गावांमधील शासकीय कार्यालये, योजनांचे फलित म्हणजे संपूर्ण नंदुरबार जिल्हा असा समज राज्यकर्त्यांचा करुन देण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे. त्यात राज्यपाल महोदयांनी स्वत:च्या गावाचे उदाहरण देऊन आजही मी दीड कि.मी. पायी चालत घरी जातो, असे म्हणणे स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत भूषणावह बाब आहे काय?धुळ्यात मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या विषयावरुन खासदार डॉ.सुभाष भामरे आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राष्टÑवादी अनिल गोटे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी केवळ एक हजार रुपयाची तरतूद असल्याचे गोटेंनी उघडकीस आणले. प्रत्युत्तर म्हणून भामरे यांनी सर्वेक्षण सुरु असलेल्या भागातील शेतकºयांना आणून पत्रकार परिषद घेतली. यातून धुळेकरांना एवढे मात्र कळले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी भूमिपूजन केलेल्या या रेल्वे मार्गाविषयी अद्याप जमिनीत खुणा गाडण्याशिवाय काहीही झालेले नाही. महाराष्टÑ व मध्यप्रदेश सरकार व रेल्वे मंत्रालयात करार झालेला नाही. शिपींग मंत्रालयानेदेखील कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही.ठाकरे आणि पवार शेतकºयांविषयी नेहमीबोलत असले तरी खान्देशातील केळी, कापूस आणि प्रक्रिया उद्योगाविषयी काहीही ठोस विधान केले गेले नाही. निवडणुका संपल्या; आता सरकारकडून काम हवे आहे. मात्र महाविकास आघाडीचा मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शनाला महत्त्व देण्यात आले. कोणतीही बैठक घेतली गेली नाही. रखडलेल्या प्रकल्पांविषयी चकार कोणी बोलले नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव