शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दोन ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी आठ जागांसाठीच मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव तालुक्यात निवडणूक होत असलेल्या ४३ ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायत या पूर्वीच बिनविरोध ठरल्या असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव तालुक्यात निवडणूक होत असलेल्या ४३ ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायत या पूर्वीच बिनविरोध ठरल्या असून ४१ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. यात दोन ग्रामपंचायतींसाठी तर प्रत्येकी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, माघारीच्या दिवशी सोमवारी ५०६ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर १०२४ उमेदवार रिंगणात कायम राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले. यात मोहाडी आणि डिकसाई या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे काही प्रभागदेखील अनेक उमेदवार बिनविरोध ठरले असून ही संख्या ५९वर पोहचली. त्यामुळे तेथे मतदान होणार नाही.

गावाच्या विकासासाठी माघार

नशिराबाद गावाच्या विकासासाठी संघटनात्मक पुढे येऊन येथील ८२ पैकी ८१ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणातून सामुदायिक माघार घेतली. ग्रामपंचायत निवडणूक रद्द करून नगरपंचायतची निवडणूक व्हावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी माघारी घेऊन ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची प्रतीक्षा कायमची संपुष्टात आली आहे.

जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार

तालुक्यातील मोहाडी आणि डिकसाई ग्रामपंचातीत जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार असल्याने सर्व सदस्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. या दोन गावांनी तालुक्याला बिनविरोधचा आदर्श घालून दिला आहे. मोहाडी येथील ११ जागांसाठी ११ उमेदवारांनी अर्ज केले होते. या सर्वांचे अर्ज वैध ठरल्याने ही ग्रामपंचायत आधीच बिनविरोध झाली होती तर डिकसाई येथे ७ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी सहाजणांनी माघार घेतली.