शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पातोंडा येथे विठ्ठल-रुखमाई पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

पातोंडा, ता. अमळनेर : आषाढी एकादशी निमित्ताने पातोंडा येथे दरवर्षी विठ्ठल-रुखमाई पालखी सोहळा साजरा करण्यात येत असतो. हा पालखी ...

पातोंडा, ता. अमळनेर : आषाढी एकादशी निमित्ताने पातोंडा येथे दरवर्षी विठ्ठल-रुखमाई पालखी सोहळा साजरा करण्यात येत असतो. हा पालखी सोहळा ‘गरीबनाथ महाराज’ या नावाने निघत असतो. यंदाही सर्व नियमांचे पालन करत ‘बोला गरीबनाथ महाराज की जय’ या जयघोषाने श्री विठ्ठल- रुखमाईचा पालखी सोहळा सांप्रदायिक परंपरेनुसार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालखी सोहळ्याची २५० वर्षांपूर्वीची प्राचीन परंपरा आजही मोठ्या उत्साहात टिकून आहे.

येथे प्राचीन विठ्ठल मंदिर असून यामध्ये सुंदर व सुरेख दगडाची कोरीव विठ्ठल व रुखमाई यांची मूर्ती आहे. विठ्ठल-रुखमाईंना चांदीचे मुकुट चढविण्यात आला आहे. मंदिर अडीचशे वर्षांपूर्वीचे समजते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या भक्तिमय वातावरणात, टाळ-मृदुंग व अभंगवाणीने पालखी सोहळा काढण्यात आला. पालखी मिरवणुकीला सायंकाळी ५ वाजता विठ्ठल मंदिरापासून सुरुवात होऊन, रात्री ८ वाजेपर्यंत हा सोहळा सुरू होता. पालखी सुसज्ज सजवण्यात आली होती. पालखीत विठ्ठल-रुखमाई यांची मूर्तीही ठेवण्यात आल्या होत्या. मिरवणुकीच्या वेळी सुहासिनी व भाविकांनी आरती व विठ्ठल दर्शन घेतले. दारोदारी व चौकाचौकातून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. पालखी खांद्यावर वाहून नेण्याचा मान परंपरेनुसार गावातील भोई समाज बांधवांना देण्यात आला.