शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

कारागृहातील ३९१ बंदींची नातेवाइकांसोबत आभासी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे जीव जाणाऱ्या लोकांची संख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून कारागृहातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे जीव जाणाऱ्या लोकांची संख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून कारागृहातील बंदींना कुटुंब व नातेवाइकांच्या भेटी नाकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला, त्यामुळे तब्बल ३७६ पुरुष व १५ महिला अशा एकूण ३९१ बंदींची नातेवाईक किंवा कुटुंबाची भेट होऊ शकलेली नाही. मानवता दृष्टिकोन ठेवून प्रशासनाने मोबाइलच्या माध्यमातून नातेवाइकांशी संवाद घडवून आणला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले नियम कारागृहात अजूनही लागूच असल्याचे माहिती कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर साधारण २५ मार्च २०२० पासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लागू केले. त्यात सरकारी कार्यालये व खासगी आस्थापनांमध्येही अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा जवळपास बंद होत्या. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अधिक पसरला व त्यातही कारागृहातदेखील कोरोनाचे शिरकाव केल्याने प्रशासन अधिकच अलर्ट झाले. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला कारागृहात प्रवेश दिला जात नाही. इतकेच काय बंदींना न्यायालयात देखील हजर केले जात नव्हते. आवश्यक व महत्त्वाचे काम असले तर व्हिडिओकॉलच्या माध्यमातून कारागृहातून बंदींना न्यायालयात हजर करण्यात येत होते. जिल्हा कारागृहात पुरुष १८६ तर महिला १४ अशा २०० जणांची क्षमता आहे, मात्र येथे क्षमतेपेक्षा दुप्पट बंदी आहेत. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण पडतो.

पोस्टकार्डच्या माध्यमातूनही संवाद

कोरोनामुळे नातेवाइकांच्या भेटी बंद असल्या तरी बंदींचा मोबाइलच्या माध्यमातून संवाद घडवून आणला जात होता. त्याशिवाय अगदीच गरीब असलेल्या कुटुंबाकडे मोबाइल नसेल तर पोस्ट कार्ड उपलब्ध करून दिले जात असून त्याच्या माध्यमातून एकमेकांना सुख-दु:खाच्या घटना कळविल्या जात आहेत. लोप पावलेल्या पोस्ट कार्डला यामुळे सुगीचे दिवस आले. ज्या बंद्याला लिहिता वाचता येत नाही, त्यांना ती सुविधाही उपलब्ध केली जात आहे.

नियमित तपासणी, उत्तम आहार

कारागृहात नियमितपणे बंदींची तपासणी केली जाते, आवश्यक असलेल्या बंदीला जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार केले जातात. रोज चहा, नाश्ता, केळी, दूध यासह दोन वेळचे जेवण दिले जात असून पौष्टीक व उत्तम आहार बंद्यांना पुरविला जात आहे.‌ ‌थंडी वाढलेली असल्यामुळे प्रशासनाकडून बंद्यांना उबदार कपडे, चादरी पुरविल्या जातात.

कोट...

कोरोनाचे नियम अजूनही लागू आहेत. त्यामुळे कुटुंब असो किंवा नातेवाईक यांना भेटता येत नाही. परंतु, प्रशासनाने स्वतंत्र मोबाइलची व्यवस्था केली असून त्यामाध्यमातून बंदींचे बोलणे करून दिले जाते. कारागृहात आहार, आरोग्य व इतर सर्वच बाबींची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. बंद्यांना आवश्यकतेनुसार सर्व सुविधा पुरविल्या जातात.

-अनिल वांढेकर, अधीक्षक, कारागृह

जिल्हा कारागृहातील आकडेवारी अशी

बंदी क्षमता : २००

प्रत्यक्षात : ३९१