शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दूषित पाण्याने ग्रामस्थ त्रस्त

By admin | Updated: April 6, 2017 00:46 IST

आरोग्य धोक्यात : कर्णफाटावासीयांचे हाल थांबेना, प्रशासनाचे दुर्लक्ष, जनता संतप्त

जामनेर : ‘पिण्याचे पाणी द्या’, अशी मागणी करीत जलसंपदामंत्र्यांच्या घरावर रिकाम्या घागरी घेऊन आलेल्या महिलांना वाकडी ग्रामपंचायतीने पुरविलेले पाणी अत्यंत दूषित असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्याची तक्रार पंचायत समिती कार्यालयापर्यंत पोहोचवूनदेखील कुणीही अधिकारी वा पदाधिकारी गावापर्यंत न पोहोचल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.गेल्या रविवारी कर्णफाटा येथील महिला पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी रिकामे हंडे घेऊन मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी धडकल्यानंतर त्यांनी तातडीने नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे यांना गावात पाठविले. यानंतर वाकडी ग्रामपंचायतीने वाकडी धरणावरून कर्णफाट्यासाठी पाणी सोडले. हे पाणी ज्या टाकीत सोडले गेले तीच मुळात गळकी आहे.वाकडी ग्रामपंचायतीने धरणाजवळील विहिरीचा उपसा करण्यासाठी ते पाणी पाईपलाईनने पाण्याच्या टाकीत व गावाजवळ असलेल्या जुन्या विहिरीत सोडले. उपसा होत असलेले दूषित पाणी पाण्याच्या टाकीत सोडले गेल्याने हेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागले. त्यामुळे गावातील महिला, लहान मुलांना वांत्या व जुलाबाचा त्रास व्हायला लागला. ही माहिती कर्णफाटा गावातील रवींद्र माने यांनी बुधवारी गटविकास अधिकाºयांना दिली.एकीकडे अशी बिकट परिस्थिती असताना वाकडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सांगतात की, सोडलेले पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांनी ते वापरू नये, अशी दवंडी दिली.मंत्र्यांच्या निवासस्थानी पिण्याचे पाणी मागण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याऐवजी ग्रामपंचायतीने विहिरीचा उपसा करून ते दूषित पाणी टाकीत सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळच चालविला. याउपरही ग्रामसेवक म्हणतात, आम्ही गुरुवारी गावास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करू. ग्रामसेवकांच्या या भूमिकेवरही ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)वाकडी व कर्णफाटा गावांना तोंडापूर धरणातून जलवाहिनीने पाणीपुरवठा करण्यासाठी आजपर्यंत तीन योजना राबविल्या गेल्या. कोट्यवधीचा खर्च झाला. मात्र कर्णफाटा येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. कर्णफाटा गाव वाकडी ग्रुप ग्रामपंचायतीशी जोडलेले असून सरपंचांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. दरम्यान, सरपंचांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. सुमारे ४०० लोकसंख्येच्या कर्णफाटा गावासाठी एकात्मिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत बांधण्यात आलेली ही पाण्याची टाकी. मात्र ती बांधकाम झाल्यापासून कोरडीच आहे. ग्रामस्थांच्या दृष्टीने ही टाकी केवळ ‘शोपीस’सारखी ठरत आहे.मंत्र्यांकडे पाणी मागण्यासाठी गेल्यानंतर जे पाणी प्यायला मिळाले ते अत्यंत दूषित असल्याने त्वचेचे आजार झाले. आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की, आम्हाला काही नको, फक्त प्यायला शुद्ध पाणी द्या.-सिंधूबाई पाटील, ग्रामस्थ, कर्णफाटा.वाकडी ग्रामपंचायतीने पिण्यासाठी सोडलेल्या दूषित पाण्यामुळे वांत्या व जुलाबाचा त्रास झाला. चार दिवस उलटले तरी गावकºयांना पिण्याचे पाणी मिळू शकले नाही. आम्हाला काही नाही मिळाले तरी चालेल; पण प्यायला पाणी द्या.-शांताबाई माने, ग्रामस्थ, कर्णफाटा.कर्णफाटा येथील राष्टÑीय पेयजल योजनेचे काम अपूर्ण आहे. वाकडीपर्यंत काम पूर्ण झाले असून येत्या १५ दिवसात कर्णफाट्यापर्यंतचे काम पूर्ण केले जाईल.-एम.जी.सराफ,उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, जि.प. जळगाव.