शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

मोबाईलवर बोलणे ठरले विद्या पाटील यांना घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 12:41 IST

संशयाचे भूताने घेतला बळी

ठळक मुद्दे: तपासात अनेक बाबींचा होतोय उलगडा

जळगाव/जामनेर : सतत मोबाईलवर बोलणे हेच अ‍ॅड.विद्या राजपूत उर्फ राखी पाटील यांना घातक ठरले आहे. डॉक्टर पतीला तेच संशयाचे कारण ठरले अन् त्यातूनच त्याने पत्नीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संशयाच्या पलीकडे डॉक्टर काहीच बोलायला तयार नाही.दरम्यान, सदैव हसतमुख व मनमोकळ्या स्वभाच्या विद्या राजपूत त्यांच्या मनातील भावना या जामनेर येथील न्यायालयातील महिला सहकारी वकीलांजवळ बोलुन दाखवीत होत्या. पतीचा संशयी स्वभाव व त्यातून उडणारे खटके याचा उल्लेखही त्यांच्या बोलण्यातून व्हायचा असे त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकारी महिला वकीलांनी सांगितले.आपल्या हसतमुख स्वभावामुळे विद्या राजपूत सर्वांच्या आठवणीत राहील्या. पतीसोबत त्यांचे वादविवाद होत असले तरी त्यांनी कधीही त्यांची तक्रार केली नाही.राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. तत्पुर्वी त्या प्रशिक्षणासाठी नागपुरला दिड महीना होत्या. याकाळात एकदा त्यांच्या मोठ्या मुलाने फोनवरुन पप्पा कुणातरी महिलेला घरी घेऊन आल्याचे सांगितले, याबाबत देखील त्यांनी विषय काढल्याचे त्यांच्या सहकारी महिला वकिलांनी सांगितले.प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धुळे येथे झाले. लग्नानंतर त्यांनी एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून २०१० साली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पदवी संपादन केली. नंतर त्यांनी जामनेर येथे वकिली व्यवसाय सुरू केला. त्या जामनेर वकील संघाच्या २०१० ते २०१६ पावेतो सदस्य होत्या. कौटुंबिक जबाबदारी व वकील व्यवसाय सांभाळून त्यांनी आपले पदवीनंतरचे एल.एल.एम. चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मराठवाडा विद्यापीठातून २०१३ साली त्यांनी पदवी प्राप्त केली. सन २०१६-२०१७ मध्ये सहायक सरकारी अभियोक्ता (वर्ग १) पदाची परीक्षा त्यांनी दिली. त्यात त्या प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या. ६ आॅक्टोंबर २०१७ पासून जळगाव न्यायालयात कार्यरत होत्या.राजपूत यांना येथील जळगाव व जामनेर न्यायालयात बुधवारी श्रध्दांजली वाहण्यात आली. दुपारपर्यंत कामकाज बंद ठेवण्यात आले. यावेळी न्या. एम.एम.चितळे, न्या.सचीन हवेलीकर, न्या. ए. ए. कुलकर्णी, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुनील पाटील, वकील संघाचे पदाधीकारी, सदस्य उपस्थीत होते.दरम्यान, संशयितांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.महाजन, अ‍ॅड.संजय राणे, रत्ना चौधरी, अनुराधा वाणी, अंबुजा वेदालंकार, लिलावती चौधरी व इतरांनी बुधवारी अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.पती डॉ.भरत पाटील याचा पतसंस्थेत वाददरम्यान, पोलिसांनी फॉरेंसीक व ठसे पथकातील अधिका-यासोबत घरात जाऊन पाहणी केली. घटनेनंतर डॉ.पाटील यांनी ज्या गाडीतुन पत्नीला बेलवाडी येथे नेले ती गाडी कोण चालवीत होता याचीही चौकशी पोलीस करीत आहेत. दरम्यान, घटनेच्या दोन दिवस आधी डॉ.पाटील शहरातील एका खाजगी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेच्या कार्यालयात नवीन चारचाकी वाहनाच्या खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी गेले होते. याठिकाणी त्यांचा संबंधीत कर्मचाºयाशी वाद झाल्याचे समजले. ही चारचाकी ते कुणासाठी घेत असावे याची चर्चा होत आहे.जळगाव न्यायालयात कामकाज बंदविद्या राजपूत यांच्या मृत्यूमुळे बुधवारी जळगाव न्यायालयातील सकाळसत्राचे कामकाज बंद ठेवण्यात आले. दुपारी दोन वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांच्या न्यायालयात शोकसभा घेण्यात आली. विद्या पाटील यांच्या मृत्यूमुळे न्यायालय कर्तव्यदक्ष वकीलाला मुकल्याची भावना न्या.सानप यांनी व्यक्त केली. वकील संघाची कधीही न भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. आर.आर.महाजन यांनी व्यक्त केली. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनीही श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Murderखून