शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

अनास्थेचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:52 IST

प्रशासनाचे कोणतेही पूर्वनियोजन नव्हते

मिलिंद कुलकर्णीनंदुरबार जिल्ह्यातील भूषा येथे नर्मदा नदीत बोट उलटून ५ बालकांसह सहा जणांचा झालेला मृत्यू हा प्रशासकीय अनास्थेमुळे झालेला आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असून दुर्देवाने त्याकडे प्रशासकीय यंत्रणेचे कायम दुर्लक्ष होत आलेले आहे.मकरसंक्रांतीच्या पावनपर्वावर पवित्र स्रान आणि नदीपूजनाला आदिवासी बांधवांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुरातन अशी ही परंपरा आहे. असंख्य भाविक या पर्वासाठी येतात, हे जगजाहीर आहे. असे असताना प्रशासकीय यंत्रणेने तेथे काय खबरदारी घेतली, यासंबंधी खरेतर गांभीर्याने माहिती घेतली गेली पाहिजे. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त असलेली बोट ही नर्मदा विकास विभागाने भाडेतत्त्वावर घेतलेली होती. क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी बसल्याने ही बोट नदीपात्रात उलटली आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली, असा प्राथमिक निष्कर्ष काढला जातो. दुर्गम भागातील या दुर्घटनेचे जे व्हीडिओ प्रसारीत झाले आणि प्रत्यक्षदर्र्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या पावन पर्वासाठी किमान ८-१० बोटी कार्यरत होत्या. या बोटीच्या टपावर लोक बसले होते. क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने बोट कलंडली आणि उलटी झाली. बंदिस्त बोट असल्याने मोठी माणसे पोहून बाहेर निघू शकली, परंतु लहान मुले आणि वृध्दांना निघता आले नाही.या दुर्घटनेविषयी समोर आलेल्या माहितीवरुन, या पावन पर्वासाठी प्रशासनाचे कोणतेही पूर्वनियोजन नव्हते. नियोजन नसल्याने खबरदारीच्या उपाययोजनांचा प्रश्नच उद्भवत नाही. शहरी भागात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात मूर्ती विसर्जनावेळी पट्टीचे पोहणारी माणसे, पोलीस दल, गृहरक्षक दल, आपत्ती व्यवस्थापन दल अशी यंत्रणा तैनात असते. पण दुर्गम भाग, आदिवासी वस्तींपर्यंत आमचे प्रशासन पोहोचलेच नाही, याचा हा ठसठशीत पुरावा आहे. आदिवासींच्या उत्थानाच्या मोठ्या गप्पा करायच्या, पंतप्रधानांच्या आकांक्षित जिल्ह्यांत समावेश करायचा, मोठा निधी द्यायचा, पण आदिवासींच्या प्रथा, परंपरा, वारसा याविषयी अनभिज्ञ राहायचे, असेच प्रशासकीय यंत्रणेचे धोरण राहिले आहे. आदिवासी भागात दोन वर्षांचा कालावधी व्यतीत करण्याची सक्ती भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकाऱ्यांना केल्याने ही मंडळी याठिकाणी येतात तरी, पण मनापासून किती अधिकारी काम करतात, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. आदिवासी बांधवांची अस्तंबा यात्रा, भोंगºया, होलिकोत्सव, दिवाळी अशी पारंपरिक सणांची खास वैशिष्टये आहेत. त्याची किमान माहिती करुन घेणे, हे सण आनंद आणि उत्साहाने साजरे होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी प्रशासनावर येते. प्रशासनाविषयी आत्मियता, ममत्व वाटावे, यासाठी हे स्वागतार्ह पाऊल आहे. लोकसहभागाशिवाय हगणदरीमुक्ती, साक्षरता, लसीकरण असे राष्टÑीय कार्यक्रम यशस्वी होत नाहीत, हा अनुभव लक्षात घेता आदिवासी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या विषयांमध्ये प्रशासनाने पुढाकार घेऊन सहकार्य केले तर प्रशासन आणि जनतेमध्ये अंतर कमी होऊ शकेल. भूषा येथील दुर्घटनेचा एवढा बोध जरी प्रशासकीय यंत्रणेने घेतला तरी पुन्हा अशा दुर्घटना टाळता येऊ शकतील.