शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

धुळीमुळे त्रस्त शिवाजीनगरवासीयांनी अडविली वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या तीन दिवसात शहरातील विविध भागात रस्ते व धुळीच्या प्रश्नावर जळगावकर रस्त्यावर उतरले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या तीन दिवसात शहरातील विविध भागात रस्ते व धुळीच्या प्रश्नावर जळगावकर रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी शिवाजीनगरातील नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला व नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन पुकारले. तब्बल दोन तास आंदोलन करत दोन्ही बाजूकडील वाहने नागरिकांनी अडवून ठेवली.

दररोज धुळीच्या त्रास सहन करणाऱ्या शिवाजीनगरवासीयांनी सोमवारी सकाळी १० वाजता रस्त्यावर उतरून सर्व वाहने अडविण्याचा निर्णय घेतला. स्वयंस्फूर्तीने या भागातील महिला, मुले व तरुण रस्त्यावर उतरले तसेच एकही वाहन या भागातून न जाऊ देण्याच्या निर्णय घेत रस्त्यालगत लाकूड, मोटारसायकल तसेच मिळेल ते साहित्य ठेवून वाहने रोखून धरली. तसेच महापालिका प्रशासनाकडून व सत्ताधारी भाजपकडून हा रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. दोन तासात कोणताही लोकप्रतिनिधी व मनपाच्या अधिकारी या ठिकाणी हजर न झाल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी या भागातील रहिवाशांनी मनपा प्रशासनाविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत रस्त्याची दुरुस्ती केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला.

चोपडा, यावल व जळगाव तालुक्यातील वाहतूक खोळंबली

सोमवारी शहरात येणाऱ्या नोकरदार वर्गाचीदेखील वाहने या भागातील नागरिकांनी अडवून ठेवली. तसेच चोपडा, यावल व जळगाव तालुक्यातून येणाऱ्या बसेसदेखील अडविण्यात आल्या. यामुळे अर्ध्या तासातच वाहनांच्या रांगा लागल्या तसेच संपूर्ण वाहतूक खोळंबली. जोपर्यंत मनपा अधिकारी किंवा पदाधिकारी या ठिकाणी येऊन धुळीच्या समस्येपासून व खराब रस्त्याच्या दुरुस्तीचे आश्वासन देत नाही तोपर्यंत एकही वाहन या भागातून न जाऊ देण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला.

जेवणाच्या ताटातही धूळ

अनेक वर्षांपासून या भागातील रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. त्याचा शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यामुळे, संपूर्ण वाहतूक या भागातूनच होत आहे. रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने कोणतेही वाहन या भागातून गेल्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य तयार होत आहे. यामुळे गृहिणींना दिवसभरातून १० वेळा घर साफ करावे लागत आहे. तसेच जेवणाच्या ताटा पासून तर झोपण्याच्या गादीवरदेखील धूळ असल्याने या भागात राहणे आता कठीण झाले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया या भागातील महिलांनी दिल्या. तसेच शहरातील कोणत्याही भागात गेल्या तरी हीच समस्या कायम राहणार असल्याने मनपा पदाधिकाऱ्यांनी आताच जळगावकरांचा संयमाचा अंत पाहू नये असाही इशारा या भागातील रहिवाशांनी दिला.

महापालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी

महापालिकेमध्ये परिसरातील काही गावांचा समावेश करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. मात्र या गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्यापेक्षा मनपातील काही भागांचा समावेश ग्रामपंचायत हद्दीत करून घ्यायला पाहिजे असाही टोला या भागातील रहिवाशांनी लगावला. महापालिकेपेक्षा एखाद्या गावाची ग्रामपंचायत तरी नागरिकांना सुविधा देईल, अशा संतप्त भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.

उपमहापौरांनाही सुनावले खडे बोल

तब्बल दोन तासानंतर उपमहापौर सुनील खडके यांनी आंदोलकांची भेट घेतली. तसेच आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आश्वासन दिले जाणार नाही तसेच या रस्त्यावर दररोज पाणी मारले जाणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय या भागातील नागरिकांनी घेतला. अनेक नागरिकांनी यावेळी उपमहापौरांनादेखील खडे बोल सुनावत रस्त्यांची समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. येत्या काही दिवसात या भागातील रस्त्यांबाबत नव्याने निविदा काढून नवीन रस्त्याचे काम केले जाईल, असे आश्वासन उपमहापौरांनी दिले. तसेच दररोज दोन वेळा टँकरने रस्त्यावर पाणी मारले जाईल, असेही आश्वासन उपमहापौर यांनी दिल्यानंतर शिवाजी नगरवासी यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात जगदीश नागला, विजय बांदल, भगवान सोनवणे, अंकुश कोळी, पंकज पवार, विजय पवार यांच्यासह अनेक महिला व नागरिक सहभागी झाले होते.

स्थायी समितीच्या सभेतही आंदोलनाचे पडसाद

या आंदोलनाचे पडसाद सोमवारी झालेल्या मनपा स्थायी समितीच्या सभेतदेखील उमटले. नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरत रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करा, अशी मागणी केली. तसेच शिवाजीनगर उड्डाणपुलाचे सुरू असलेले संथ काम वेगात करण्याबाबत मक्तेदाराला सूचना देण्याची ही मागणी दारकुंडे यांनी केली. या भागातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूकदेखील सुरू असल्याने या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे दारकुंडे यांनी सांगितले.