शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

किनगावजवळील अपघातातील वाहनाची योग्यता मुदत संपलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:21 IST

जळगाव : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करताना नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून ...

जळगाव : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करताना नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. असे असले तरी योग्यता मुदत संपलेली वाहने अजूनही रस्त्यावर सुसाट असल्याचे चित्र आहे. अशाच प्रकारे किनगावजवळील अपघातातील वाहनाचीदेखील योग्यता मुदत ३ फेब्रुवारी २०२१ रोजीच संपली असल्याचे समोर आले आहे.

कोणतेही वाहन खरेदी व नोंदणी झाल्यानंतर त्याची योग्यता मुदत ठरविलेली असते. त्यानंतर त्याची पुन्हा तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करावे लागते. यासाठी वेगवेगळ्या वाहनांची मुदत निश्चित केली जाते. ही मुदत संपल्यानंतर त्या-त्या वाहनांच्या प्रकारानुसार योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करण्यासाठी वेळही ठरविण्यात आला आहे. यात १० मिनिटांपासून ते २४ मिनिटांपर्यंत तपासणीची वेळ असते. तसे आदेशच २५ एप्रिल २०१६ रोजी तत्कालीन परिवहन आयुक्तांनी काढले आहेत. असे असतानाही याचे पालन जळगावातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होत नसल्याची तक्रार जळगावातील गणेश कौतिकराव ढेंगे यांनी केली आहे.

वर्षभराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

जळगावातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नेमणुकीस असलेल्या मोटार वाहन निरीक्षकांकडून योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करताना नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार गणेश ढेंगे यांनी १४ जानेवारी २०२० रोजी परिवहन आयुक्तांकडे केली होती. यात या प्रकाराविषयी सविस्तर माहिती देत ‘ब्रेक टेस्ट ट्रायल ट्रॅक’वर वाहन निरीक्षक नियमांचे पालन करीत नाही. तसेच वाहन निरीक्षकांच्या खासगी व्यक्तींकडून मनमानी करीत पैसे घेतात व वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करून दिली जात असल्याची तक्रार ढेंगे यांनी केली आहे. या प्रकाराला आळा बसण्यासाठी हालचाली होत नसल्याने ढेंगे यांनी पुन्हा १५ सप्टेंबर २०२० रोजी परिवहन आयुक्तांना निवेदन देऊन या विषयी तक्रार केली आहे.

दुर्लक्षामुळे अपघात

योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करताना नियमांचे पालन होत नसल्याने अनफिट वाहने रस्त्यावर फिरत असल्याची तक्रारदेखील ढेंगे यांनी केली असून यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. किनगावजवळ १५ जणांचा बळी गेलेल्या अपघातामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. किनगावजवळ अपघात झालेल्या ट्रकची (एमएच १९, झेड ३६६८) योग्यता मुदतही संपलेली असल्याचे ढेंगे यांचे म्हणणे आहे. या वाहनाची १४ मार्च २०११ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद (रजिस्ट्रेशन) करण्यात आली होती व त्याची मुदत ३ फेब्रुवारी २०२१ संपली होती. मुदत संपलेली असतानाही हे वाहन रस्त्यावर कसे धावत होते व याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, का असा सवाल उपस्थित केला जात आहे.