शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

वेदातले समंत्रक शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 15:26 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘नित्य नवे वेद’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्राचार्य डॉ.विश्वास पाटील

वेदिक काळात पाणी वहाण्यासाठी पखाली होत्या. ऋषी म्हणतो की, हे देवा, पखालीचे मुख खुले करा. पाऊस असा बदाबदा पडतो. पावसाच्या या धारांंनी धरणीला कंठ फुटतो. इथली बेडकंही मग गाणी गाऊ लागतात. गावातील, रानातील तळी समृद्ध होतात. ती गाऊ लागतात. यासोबत गाय-वासरांचे ध्वनी निनादतात. शेळ्या-कोकरांचा स्वर नाद वातावरणाला भारून टाकतो. पाऊस असा पावसाळाभर येतच राहतो. पाणी देवाजीच्या करूणेसारखं वाहू लागतं. नद्या-नाल्यांना पूर येतात. ओढे खळाळू लागतात. जनावरं पुष्ट होतात. भरपूर पाऊस होतो. धनधान्याची सुबत्ता नांदते. प्रार्थनेचा स्वर जागतो. हे पर्जन्य देवा, भरल्या मनानं ये. तू आता कोरड्या दिशांचा माग घे. कोरड्या दिशांना जा. केवळ आपल्यापुरतीच ही प्रार्थना नाही. या प्रार्थनेला सार्वत्रिक तेचा असा सहज स्पर्श आहे. खरी प्रार्थना पर्जन्यदेवही अर्थातच् ऐकून घेतो. आपल्याच लाभाचा लोभ न धरणारा माणूस त्याला आवडतो. तो पुढं निघून जातो. मागे वहात्या नद्या सोडून जातो. मग नद्याच माता बनतात. आई बनतात. करूणानिधान बनतात.वेद ज्ञानाचं साधन. वेद संवेदनेचा विषय. अनेकदा आपण वाचतो. ते सारं समजलेलं असतंच असं नाही. वेदाचा हा महिमा आहे. जे कळलं ते प्रकट करून सांगता यायला हवंय. जे जाणून घेतलं ते समजावता यायला हवं. ते जगून दाखवता यायला हवं. आत्मप्रकटीकरणाची विद्या म्हणजे वेदविद्या. वेदातले शब्द अर्थघन. या शब्दात खूप अर्थ भरला आहे. जणू काही बरसणारा ढगच.हे शब्द अर्थभारित घनासारखे तृप्त. एका प्रक्रियेनं या शब्दाचा एक अर्थ निघतो तर दुसऱ्या प्रक्रियेने वेगळा. दोघांमध्ये विरोधाचं काहीही कारण नाही. प्राण, वाणी आणि मन जुळलं की शब्द आकाराला येतो. यामुळे वेद हे प्राणमय आहेत. इंद्रीयमय आहेत. मनोमय आहेत. वेद म्हणजे शब्द ब्रह्म.वेदाची भाषा कमालीची विनम्र आहे. वेद प्रत्यक्षात बोलत नाही. परोक्षात बोलतो. ‘हे करा.’ असं नाही सांगत. ‘असं करणं चांगलं.’ असं सांगतो. ‘असं करा. ‘हे नाही सांगत. ‘चला, असं करू या.’ हे सांगतो. ही शब्दकळा समजून घेऊ या. निनाद करणारी नदी. सर सर करणारी सरिता, गं गं करणारी गंगा. धारण करणारी धरणी. पसरलेली पृथ्वी. वैदिक शब्द अशाप्रकारे सूक्ष्म अर्थाचं वहन करतात. वेदातील साहित्याचा पोत जीवनधर्मी. ऋषी आणि कृषी संस्कृतीचा उद्गाता. इथं शेती आहे. गायी-गुरं आहेत. सूर्यदेव आहे. चंद्र सखा आहे. दाहक अग्नी येथे प्रेमळ बाप बनतो. तो झळाळत राहतो. तो न्यायाची ज्योत प्रदीप्त राखतो. छान-छान भेटी देतो.सुखदायी ठरतो. सखा-सोबती होतो. अंधारगर्भ अशी रात्र सरते. उजळणारी उषा येते. आकाशाची बाळी धरणीपुत्राला भेटायला येते. ही स्वर्गाची कन्यका वाटते. ही भरल्या घरची लेक-सून वाटते. ही नटून-थटून असते. ही झगमगत्या रथातून येते. सूर्याचं एक नाव आहे आदित्य. दा म्हणजे देणारा, दाता. घेऊन जाणारा तो सूर्य. सूर्य काय बरं घेऊन जातो? तो आपल्या आयुष्याचा एक भाग घेऊन जातो. हे आपण लक्षात ठेवायला हवं. अस्ताला जाणारा सूर्य आपल्या आयुष्याचा एक खंड घेऊन जात असतो. धरणीचा आधार सत्य. आकाशाचा आधार सूर्य. (क्रमश:)-डॉ.विश्वास पाटील, शहादा, जि.नंदुरबार

टॅग्स :literatureसाहित्यnandurbar-pcनंदुरबार