शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

वरखेडे-लोंढे प्रकल्प जूनमध्ये पूर्ण होणार- गिरीश महाजन यांनी चाळीसगाव पालिकेच्या शताब्दी महोत्सवात दिली ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:39 IST

वरखेडे-लोढें हे महत्वाकांक्षी धरण येत्या जूनमध्ये पूर्ण होणार असून, यासाठी गेल्या तीन वर्षात आमच्या सरकारने ११७ कोटी रुपयांचा निधी दिला. गेल्या १५ वर्षात या प्रकल्पासाठी फक्त २५ कोटी रुपये मिळाले होते. याच प्रकल्पाचा केंद्रीय बळीराजा सन्मान योजनेत समावेश केल्याने ४५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहेच. उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणाऱ्या नार-पार योजनेसाठी येत्या दोन महिन्यात केंद्र सरकार २० हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची ग्वाही जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.

ठळक मुद्देनार-पार योजनेसाठी २० हजार कोटींची तरतूदडास मुक्त चाळीसगाव शहराचा संकल्प७२ कोटींच्या सुधारीत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू

चाळीसगाव, जि.जळगाव : वरखेडे-लोढें हे महत्वाकांक्षी धरण येत्या जूनमध्ये पूर्ण होणार असून, यासाठी गेल्या तीन वर्षात आमच्या सरकारने ११७ कोटी रुपयांचा निधी दिला. गेल्या १५ वर्षात या प्रकल्पासाठी फक्त २५ कोटी रुपये मिळाले होते. याच प्रकल्पाचा केंद्रीय बळीराजा सन्मान योजनेत समावेश केल्याने ४५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहेच. उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणाऱ्या नार-पार योजनेसाठी येत्या दोन महिन्यात केंद्र सरकार २० हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची ग्वाही जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.शनिवारी सायंकाळी सात वाजता गिरीश महाजन यांच्या हस्ते चाळीसगाव पालिकेच्या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार उन्मेष पाटील होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जि.प.चे शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, चाळीसगावच्या उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, पं.स.सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, गटनेते राजेंद्र चौधरी, के.बी.साळुंखे, मंगेश चव्हाण, घृष्णेश्वर पाटील, रमेश चव्हाण, श्यामलाल कुमावत यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.गिरणा नदीतील पाणी मन्याड धरणात टाकण्याची मागणी असो की, नदीजोड प्रकल्प, दुष्काळामुळे पाण्याची तीव्रता अधोरेखित झाली आहे. गिरणेवरील बलून बंधाºयांचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे. पाणी जपून वापरा, असे संदेश देतानाच गिरीश महाजन यांनी स्वच्छतेसाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचेही नमूद केले.उन्मेष पाटील यांचे मनोगतचाळीसगाव शहराचा डीपीआर मंजूर करून ७२ कोटींच्या सुधारीत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होत आहे. पुढच्या काळात डासमुक्त चाळीसगाव शहरासाठी भूयारी गटार कार्र्यान्वित करण्याचा प्रस्ताव केला जात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख दहा शहरांमध्ये चाळीसगावची गणना व्हावी, असे नियोजन पालिकेमार्फत केले जात असल्याचे सांगून आमदार उन्मेष पाटील गत पंधरा महिन्यात पालिकेने राबविलेल्या उपक्रमांचा आढावाही मांडला. मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी १०० कोटी रुपये निधी देण्याचे अश्वासन पूर्ण केले असून नविन ३४६ कोटी रुपयांच्या कामांचेही आज भूमिपूजन झाल्याचे त्यांनी सांगितले.आशालता चव्हाण, राजेंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वच्छाग्रह प्रकल्प व घंटागाड्या, जेसीपी यांचे लोकार्पण, शताब्दीच्या बोधचिन्हाचे अनावरणही झाले. आजी-माजी नगरसेवक, कर्मचारी यांना गौरविण्यात आले. पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्र्थींना आदेशाचे वितरणही केले गेले. प्रास्ताविक मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी, तर सूत्रसंचालन मनोहर आंधळे व अर्जुन परदेशी यांनी केले. आभार दिगंबर वाघ यांनी मानले. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षChalisgaonचाळीसगाव