शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

वद वाढू कुणाला वरण गं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 16:16 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात साहित्यिक प्रा.अनिल सोनार यांचा विशेष लेख ‘वद वाढू कुणाला वरण गं...’

बंडोपंत म्हणजे कट्टर सनातन जीव. एखाद्या निर्जीव गोष्टीत जरी बदल झाला तरी त्यांचा जीव खालीवर व्हायचा. ताटातल्या मिठाची जागा को¨शंबिरीने घेतली तरी त्यांच्या अंगाचा तिळपापड व्हायचा. मी स्वयंपाकघरात चहाच्या पातेल्यात चमचा ढवळत मजेत गात होतो, ‘गर्म भांडय़ातली शेव ही ùù’ तसे, पाठीमागे येऊन उभे राहिलेले बंडोपंत सात्विक संतापाने किंचाळले, ‘अहो, काय चाललंय काय हे?’ ‘बंडोपंत मी चहा करतोय. घेणार का, हे कशायपेय घोटभर?’ ‘ ते तुमच्यात घशात ओता. पण तुमच्या नरडय़ातून हे जे बाहेर पडतंय ते काय आहे?’ ‘ बंडोपंत, अहो नाटय़गीत गातोय, ‘ गर्म भांडय़ातली शेव हीùù.’ ‘जीभ कशी झडत नाही तुमची,मर्म बंधातली ठेव,तुम्ही गर्म भांडय़ात ओतलीत?’ ‘बंडोपंत, विडंबन आहे ते. आता हे बघा, ‘वद वाढू कुणाला वरण, करील जो पचन, कच्च्या डाळीचे, सखे गंùù मी धरील चरण त्याचे’. पाण्याचा ग्लास जवळ नसताना लाल-तांबडय़ा रश्शाचा कोल्हापुरी झटका बसावा तसा थयथयाट करत बंडोपंत किंचाळले, ‘तळपट होई तुमच्या प्रतिभेचे. अन्नाची चेष्टा? अन्नाची? कधी पेशवाई थाटाच्या भोजनावळीचं ‘पान’ पाहिलंय आयुष्यात?’ मी म्हटलं,‘ बंडोपंत छान आठवण करून दिलीत. अहो, त्यावर ‘रॅप’ गीतच आहे. ‘रॅप’ आणि मी गाऊ लागलो- काय वाढले पानावरती. ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे आले. आले लोणचे बहू मुरलेले आणि लिंबू रसरसलेले. किसून आवळे मधूर केले, कृष्णाकाठचे वांगे आणले. खमंग त्याचे भरीत केले, निरनिराळे चटके नटले. चटण्यांचेही बहू मासले, संमेलनची त्यांचे भरले. मिर्ची, खोबरे ती सव ओले, तीळ भाजुनी त्यात वाटले. कवठ गुणाचे मिलन झाले. पंचामृत त्या जवळी आले. वास तयांचे हवेत भरले. अंतरी अण्णा अधीर झाले. भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या, काही मोकळ्या. कोशींबिरीच्या ओळी जमल्या, शुभ्र काकडय़ा होत्या किसल्या मुळा कोवळा, मिरच्या ओल्या, केळी कापून चकत्या केल्या. चिरून पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या. रान कारली, वांगी काळी, सुरण तोंडली आणि पडवळी. चुका चाकवत मेथी कवळी. चंदन बटवा भेंडी कवळी. फणस कोवळा, हिरवी केळी. काजूगरांची गोडी न्यारी. दुधीभोपळा आणि रताळी, किती प्रकारे वेगवेगळी. फेण्या पापडय़ा आणि सांडगे, कुणी आणुनी वाढी वेगे. गवल्या नकुल्या धवल मालत्या, खिरी तयांच्या शोभत होत्या. शेवायांच्या खिरी वाटल्या, आमटय़ांच्या मग वाटय़ा भरल्या. सार गोडसे रातांब्याचे, भरले प्याले मधुर कढीचे. कणीदार बहू तूप सुगंधी, भात वाढण्या थोडा अवधी. माङो रॅपगान चालू असतानाच बंडोपंतांचा चेहरा खुलत गेला. एकदोन वेळा ओठातून लाळही टपकली. न राहून ते म्हणाले, ‘अगदी पंक्तीत भोजनास बसल्यासारखं वाटलं बघा. पण हे असं अब्राrाणी रॅप वगैरे असायला नको होतं हो. भुजंगप्रयात किंवा मंदारमाला वृत्तात रचता आलं नसतं का? मनाचे लोक किंवा मंगलाष्टकं ऐकल्यासारखं पवित्र वाटलं असतं बघा.’ मी म्हटलं, ‘बंडोपंत ही रचना माझी नाही. मराठी भाषेचे महाकवी, गीत रामायणकार माडगुळकर अण्णांची आहे.’ हे ऐकून बंडोपंतांना लागलेला ठसका काही केल्या थांबतच नाहीये.