शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

ग्रामीण भागात लोकसंख्येनुसार लसींचा पुरवठाव व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग्रामीण भागात लोकसंख्या अधिक असताना ग्रामीणपेक्षा शहरी भागात लसीचे अधिक डोस दिले जात आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग्रामीण भागात लोकसंख्या अधिक असताना ग्रामीणपेक्षा शहरी भागात लसीचे अधिक डोस दिले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता लसीकरणापासून वंचित राहत आहे. त्यामुळे त्यांना लोकसंख्येनुसार लसींचे वाटप करावे, अशी मागणी जि.प.सदस्यांनी केली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेतही लसीकरणाच्या विषयावर चर्चा झाली.

सध्या सर्वत्र लसीकरणाचे नियोजन आणि त्यावरून उडणाऱ्या गोंधळाबाबत चर्चा, बैठका सुरू आहेत. केंद्रांवर लसी मिळत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून गोंधळाचे वातावरण वाढले आहे. त्याचेच पडसाद बैठकीतही उमटले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची ऑनलाईन बैठक अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष लालचंद पाटील, सीईओ डॉ.बी.एन. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार आदींसह अधिकारी उपस्थित होते. लसीकरणाचा विषय सदस्य नानाभाऊ महाजन यांनी मांडला. ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी समाजाला ऑनलाईनचे नियोजन जमत नसल्याने शिवाय लसींचा पुरेसा पुरवठा नसल्याने ग्रामीण भाग वंचित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल उशिरा येत असल्याचा मुद्दा शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील यांनी मांडला.

१८० कामे गेली पुढील वर्षी

बांधकाम विभागाने नियोजन न केल्याने २० कोटी रुपयांची १८० कामे ही पुढच्या वर्षावर लोटली गेली असून यात बंधाऱ्याची कामे झाली असती तर शेतकऱ्यांना आताच त्याचा फायदा झाला असता, असा मुद्दा सदस्य नानाभाऊ महाजन यांनी मांडला. पाणीपुरवठा विभागाच्या रोजंदारीवर असलेल्या २२ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश कामगार न्यायालयाने वर्षभरापूर्वीच दिले असताना त्यांना अद्याप नियुक्ती नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.

पदोन्नतींचा विषय गाजला

आरोग्य विभागातील पदोन्नतींचा विषय स्थायी समितीच्या सभेत गाजला. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ आरोग्य विभागाच्या पदोन्नती का रखडल्या अशी विचारणा सदस्य मधू काटे यांनी करीत त्या तातडीने करण्याची मागणी केली. यावर येत्या १५ दिवसात हा विषय मार्गी लागवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

त्या दोन कर्मचाऱ्यांमुळे अडचणी

आरोग्य विभागातील दोन कर्मचारी काम अगदी संथ गतीने तर करतच आहेत मात्र, होणाऱ्या कामात खोडा घालत असल्याने कामे रखडत असल्याचा मुद्दाही समोर आला आहे. या कर्मचाऱ्यांची बदली दुसऱ्या विभागात करावी, अशी मागणी खुद्द अधिकाऱ्यांनीच स्थायी समितीच्या सभेत केल्याचे समजते. याला काही सदस्यांनीही दुजोरा दिला आहे.