शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात लोकसंख्येनुसार लसींचा पुरवठाव व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग्रामीण भागात लोकसंख्या अधिक असताना ग्रामीणपेक्षा शहरी भागात लसीचे अधिक डोस दिले जात आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग्रामीण भागात लोकसंख्या अधिक असताना ग्रामीणपेक्षा शहरी भागात लसीचे अधिक डोस दिले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता लसीकरणापासून वंचित राहत आहे. त्यामुळे त्यांना लोकसंख्येनुसार लसींचे वाटप करावे, अशी मागणी जि.प.सदस्यांनी केली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेतही लसीकरणाच्या विषयावर चर्चा झाली.

सध्या सर्वत्र लसीकरणाचे नियोजन आणि त्यावरून उडणाऱ्या गोंधळाबाबत चर्चा, बैठका सुरू आहेत. केंद्रांवर लसी मिळत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून गोंधळाचे वातावरण वाढले आहे. त्याचेच पडसाद बैठकीतही उमटले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची ऑनलाईन बैठक अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष लालचंद पाटील, सीईओ डॉ.बी.एन. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार आदींसह अधिकारी उपस्थित होते. लसीकरणाचा विषय सदस्य नानाभाऊ महाजन यांनी मांडला. ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी समाजाला ऑनलाईनचे नियोजन जमत नसल्याने शिवाय लसींचा पुरेसा पुरवठा नसल्याने ग्रामीण भाग वंचित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल उशिरा येत असल्याचा मुद्दा शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील यांनी मांडला.

१८० कामे गेली पुढील वर्षी

बांधकाम विभागाने नियोजन न केल्याने २० कोटी रुपयांची १८० कामे ही पुढच्या वर्षावर लोटली गेली असून यात बंधाऱ्याची कामे झाली असती तर शेतकऱ्यांना आताच त्याचा फायदा झाला असता, असा मुद्दा सदस्य नानाभाऊ महाजन यांनी मांडला. पाणीपुरवठा विभागाच्या रोजंदारीवर असलेल्या २२ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश कामगार न्यायालयाने वर्षभरापूर्वीच दिले असताना त्यांना अद्याप नियुक्ती नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.

पदोन्नतींचा विषय गाजला

आरोग्य विभागातील पदोन्नतींचा विषय स्थायी समितीच्या सभेत गाजला. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ आरोग्य विभागाच्या पदोन्नती का रखडल्या अशी विचारणा सदस्य मधू काटे यांनी करीत त्या तातडीने करण्याची मागणी केली. यावर येत्या १५ दिवसात हा विषय मार्गी लागवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

त्या दोन कर्मचाऱ्यांमुळे अडचणी

आरोग्य विभागातील दोन कर्मचारी काम अगदी संथ गतीने तर करतच आहेत मात्र, होणाऱ्या कामात खोडा घालत असल्याने कामे रखडत असल्याचा मुद्दाही समोर आला आहे. या कर्मचाऱ्यांची बदली दुसऱ्या विभागात करावी, अशी मागणी खुद्द अधिकाऱ्यांनीच स्थायी समितीच्या सभेत केल्याचे समजते. याला काही सदस्यांनीही दुजोरा दिला आहे.