लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोविड प्रतिबंधक लसींचा साठा संपला असून लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. लस न आल्याने बुधवारी शहरातील सर्वच केंद्र बंद राहणार आहे. गुरूवारी सायंकाळी जिल्ह्याला लस प्राप्त होण्याची शक्यता असून शुक्रवारी केंद्र उडघतील.
शहरातील महापालिकेची सर्व केंद्र बुधवारी बंद राहणार असल्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी कळविले आहे. जिल्ह्यात ३५० वर केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यातुलनेत लसींचा साठा अगदीच मुबलक उपलब्ध होत आहेत. त्यातच जो साठा येत आहे. तो दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात आल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे पहिला डोस सुरू झाल्यानंतर केंद्रांवर पुन्हा गर्दी वाढणार आहे. दरम्यान, सोमवारी महापालिकेचे केंद्र सुरू होते, मात्र, लस नसल्याने ते मंगळवारी बंद ठेवण्यात आले होते. बुधवारी पुन्हा लस नसल्याने शिवाय गुरूवारीही मिळण्याची शक्यता कमीच असल्याने लसीकरणासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.