शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
4
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
6
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
7
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
8
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
9
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
10
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
11
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
12
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
13
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
14
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
15
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
16
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
17
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
18
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
19
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
20
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 

डिसेंबरपर्यंत लसीकरण अवघडच, २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:13 IST

शासनाने लक्ष्य दिले, मात्र लसींचा पुरवठाच कमी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्रीय मंत्र्यांनी डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाईल, ...

शासनाने लक्ष्य दिले, मात्र लसींचा पुरवठाच कमी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्रीय मंत्र्यांनी डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र सध्या तरी जिल्ह्यात अशी कोणतीही परिस्थिती दिसून येत नाही. दर आठवड्यातून तीन दिवस तरी लसीकरण केंद्रे बंद राहत आहेत. तसेच जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची क्षमता दिवसाला ५० हजार नागरिकांना लस देण्याची आहे. असे असले तरी एवढा लसींचा पुरवठा नसल्याने डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाऊ शकत नसल्याची परिस्थिती आहे.

१६ जानेवारी रोजी जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा लस घेतली. त्यात जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचा समावेश होता. त्यानंतर आधी आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रंटलाईन वर्कर, त्यानंतर सामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. आधी फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच लस दिली जात होती. त्यानंतर ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लस देण्याचे शासनाने धोरण जाहीर केले.

त्यानंतर १८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्यास सुरुवात केली. मात्र तिथेच गोंधळ उडाला. लसींचा अपुरा साठा, सतत होत असलेला तुटवडा यामुळे राज्य शासनाकडून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठीचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. आता फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस दिली जात आहे.

जिल्ह्यात लसीकरण केंद्रे किती ?

जिल्ह्यात सुरुवातीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फक्त आरोग्य कर्मचारी, इतरांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र नंतरच्या काळात रेड क्रॉस, रोटरी भवन येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. आता जिल्हाभरात सध्या ३३ लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत, तर शहरात ९ केंद्रांवर लस दिली जाते.

१६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात

जानेवारी

प्रत्येक दिवशी ४०६ प्रत्येक आठवड्यात - २८४२ प्रत्येक महिन्याला - ६८९४

फेब्रुवारी

प्रत्येक दिवशी ८७३ प्रत्येक आठवड्यात ६१०८ प्रत्येक महिन्याला - २४४३२

मार्च

प्रत्येक दिवशी ४४२० प्रत्येक आठवड्यात ३०९४० प्रत्येक महिन्याला १३७०२२

एप्रिल

प्रत्येक दिवशी ५४४४ प्रत्येक आठवड्यात ३८१०८ प्रत्येक महिन्याला १६३३२०

मे

प्रत्येक दिवशी ६६१७ प्रत्येक आठवड्यात ४८४२२ प्रत्येक महिन्याला १९३६९१

१८ वर्षाआतील नागरिकांचे काय?

जिल्ह्यात १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची संख्या ही १३ लाखाच्या जवळ आहे. सध्या १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला शासनाने परवानगी दिली असली तरी, लसींच्या तुटवड्यामुळे हे लसीकरण देखील बंद करण्यात आले आहे. सध्या फक्त ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.

जिल्ह्यात दररोज येणाऱ्या लसींच्या साठ्यानुसार नागरिकांना लस दिली जाते. १८ वर्षाआतील नागरिकांच्या लसीकरणाबाबत अजून कोणताही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. असा निर्णय देखील महिनाभराच्या आत होऊ शकतो.

लसींच्या डोसचा पुरवठा अखंडित आणि योग्य प्रमाणात मिळाला, तर डिसेंबरपर्यंत जिल्हाभराचे लसीकरण करता येऊ शकते.

कोट

सध्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची क्षमता ही दिवसाला ५० हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याची आहे. लसींचा पुरवठा झाल्यास केंद्रे पूर्ण क्षमतेने चालतील आणि डिसेंबरच्या आधी जिल्ह्याचे लसीकरण होऊ शकेल.

- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक