शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

वाळू चोरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:27 IST

नूतन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची मुलाखत

ठळक मुद्दे प्रश्न समजून घेण्यावर भर

जळगाव : जिल्ह्यातील वाळू चोरी रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी शक्य असल्याचे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.ढाकणे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. यानंतर मंगळवार ‘लोकमत’शी बोलतांना त्यांनी वरील ही माहिती दिली. ढाकणे यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: नदीपात्रात जाऊन वाळूचे वाहन पकडणे अपेक्षित नाही. त्यांनी तेच काम त्यांच्या यंत्रणेमार्फत अचूकपणे करवून घेणे अपेक्षित आहे. ते करण्यासाठी काय काय करता येईल? याची माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल.जप्त वाळू वाहनांची विल्हेवाट लावणारअवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आलेली आहेत. ती अस्ताव्यस्त पडलेली आहे. मात्र जर संबंधीत वाहनमालक दंड भरत नसेल तर या वाहनांची विल्हेवाट लावायला हवी. अन्यथा हीच पडून असलेली वाहने डेंग्यूला कारणीभूत ठरतील. त्यामुळे याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली.शून्य खर्चाचे काम सफाईजिल्हाधिकारी ढाकणे म्हणाले की, सफाई हे असे काम आहे की त्यासाठी खर्च लागत नाही. सोलापूर मनपात असताना तर तेथील घंटागाड्या वेळेवर जाण्यासाठी तसेच किती कचरा उचलला यासाठी त्याचप्रमाणे पाण्याच्या टँकरवर नियंत्रण ठेवण्यासाठी अ‍ॅप बनवून घेतले. त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात कपात झाली. मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचीही पाहणी केली. मात्र अनेक विभागांमध्ये साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे व सफाईकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. वास्तविक सफाईला खर्च लागत नाही. हे काम केले तर आपण आपले आरोग्य चांगले ठेवून दवाखान्याचा लाखो रूपयांचा खर्च वाचवू शकतो.प्रश्न समजून घेऊन कामाचे नियोजनजिल्हाधिकारी पदावर रूजू झाल्यानंतर जिल्ह्यात कोणत्या कामांना प्राधान्य देणार? याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मनपा आयुक्त म्हणून काम केले. तेथील प्राधान्याचे विषय हे ठरलेले असतात. रस्ते, गटारी, पाणी, पथदिवे हेच प्राधान्याचे विषय असतात. त्यानंतर इतर प्रश्नांवर निर्णय घेण्याची वेळ येते. मात्र महसूल विभागात तब्बल २० वर्षांनी पुन्हा आलो असल्याने जिल्ह्याच्या प्रश्नांची माहिती घेऊन कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे? याबाबत नियोजन करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :interviewमुलाखत