शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

रब्बीचा हंगाम काढणीवर असताना पुन्हा अवकाळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने थंडीची लाट पसरली होती. मात्र, दोन दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने थंडीची लाट पसरली होती. मात्र, दोन दिवसांपासून किमान व कमाल तापमानात वाढ होत असून, किमान तापमानात दोन दिवसात ६ अंशाची वाढ झाली आहे. तर कमाल तापमानात देखील वाढ होत आहे. त्यातच एकीकडे रब्बी हंगाम ऐन काढणीवर असतानाच जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे. १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

गेल्या वर्षी देखील मार्च महिन्यात रब्बीचा हंगाम ऐन काढणीवर असतानाच जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे रब्बी हंगामाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच यंदा देखील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम देखील पूर्णपणे वाया गेला होता. त्यातच आता पुन्हा अवकाळीचे संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्यांचा चिंता वाढल्या आहेत.

अवकाळीचे कारण काय ?

बंगालच्या उपसागरात एक चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, बाष्पयुक्त हवा घेऊन हे क्षेत्र मध्य भारतकडे प्रवेश करताना दिसून येत आहे. त्यातच एक कमी दाबाचा पट्टा केरळ ते मराठवाडापर्यंत तयार झाला आहे. काही दिवसात दोन्ही हवा एकमेकांना आदळून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. बाष्पयुक्त हवांमुळे १६ ते १९ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाचा अंदाज ६४ टक्के इतका आहे. दरम्यान, पुढील काही दिवसात किमान व कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, ढगाळ वातावरण देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.

हिवाळ्यातील तिन्ही महिन्यात झाला पाऊस

हवामान बदलामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. यंदा अरबी समुद्रात अल निनोचा प्रभाव कमी झाला असला तरी ला लिनाचा प्रभाव वाढला आहे. दक्षिण अमेरिकेडून दक्षिण अफ्रिकेला वळसा घालून बाष्पयुक्त वारे अरबी व हिंदी महासागरात दाखल होत आहेत. या वाऱ्यांना लॅटिन भाषेत ला लिना असे संबोधले जाते. आधीच समुद्राच्या पाण्याचे तापमानात वाढ होत असल्याने चक्रीवादळांची स्थिती निर्माण होत असल्याने, दुसरीकडे बाष्पयुक्त वाऱ्यांचा मिलाप होत असल्याने यंदा हिवाळ्यातही पावसाचे आगमन झाले आहे. यंदाच्या हिवाळ्यात नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. वातावरण बदलाचा हा परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञ नीलेश गोरे यांनी सांगितले.

तर रब्बीचे होऊ शकते नुकसान

वातावरणात मोठ्या प्रमाणात बदलामुळे आधीच रब्बी हंगाम आता लांबला आहे. नोव्हेंबर महिन्यात होणारी रब्बीची लागवड आता डिसेंबरअखेरपर्यंत होत असते. यामुळे रब्बीचा हंगाम मार्चमध्ये न संपता एप्रिलमध्ये संपत आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात अवकाळीचे संकट असून, त्यातच मार्च महिन्यात देखील अवकाळीसह वादळी पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत रब्बीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यंदा हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.