शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचा हंगाम काढणीवर असताना पुन्हा अवकाळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने थंडीची लाट पसरली होती. मात्र, दोन दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने थंडीची लाट पसरली होती. मात्र, दोन दिवसांपासून किमान व कमाल तापमानात वाढ होत असून, किमान तापमानात दोन दिवसात ६ अंशाची वाढ झाली आहे. तर कमाल तापमानात देखील वाढ होत आहे. त्यातच एकीकडे रब्बी हंगाम ऐन काढणीवर असतानाच जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे. १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

गेल्या वर्षी देखील मार्च महिन्यात रब्बीचा हंगाम ऐन काढणीवर असतानाच जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे रब्बी हंगामाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच यंदा देखील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम देखील पूर्णपणे वाया गेला होता. त्यातच आता पुन्हा अवकाळीचे संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्यांचा चिंता वाढल्या आहेत.

अवकाळीचे कारण काय ?

बंगालच्या उपसागरात एक चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, बाष्पयुक्त हवा घेऊन हे क्षेत्र मध्य भारतकडे प्रवेश करताना दिसून येत आहे. त्यातच एक कमी दाबाचा पट्टा केरळ ते मराठवाडापर्यंत तयार झाला आहे. काही दिवसात दोन्ही हवा एकमेकांना आदळून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. बाष्पयुक्त हवांमुळे १६ ते १९ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाचा अंदाज ६४ टक्के इतका आहे. दरम्यान, पुढील काही दिवसात किमान व कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, ढगाळ वातावरण देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.

हिवाळ्यातील तिन्ही महिन्यात झाला पाऊस

हवामान बदलामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. यंदा अरबी समुद्रात अल निनोचा प्रभाव कमी झाला असला तरी ला लिनाचा प्रभाव वाढला आहे. दक्षिण अमेरिकेडून दक्षिण अफ्रिकेला वळसा घालून बाष्पयुक्त वारे अरबी व हिंदी महासागरात दाखल होत आहेत. या वाऱ्यांना लॅटिन भाषेत ला लिना असे संबोधले जाते. आधीच समुद्राच्या पाण्याचे तापमानात वाढ होत असल्याने चक्रीवादळांची स्थिती निर्माण होत असल्याने, दुसरीकडे बाष्पयुक्त वाऱ्यांचा मिलाप होत असल्याने यंदा हिवाळ्यातही पावसाचे आगमन झाले आहे. यंदाच्या हिवाळ्यात नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. वातावरण बदलाचा हा परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञ नीलेश गोरे यांनी सांगितले.

तर रब्बीचे होऊ शकते नुकसान

वातावरणात मोठ्या प्रमाणात बदलामुळे आधीच रब्बी हंगाम आता लांबला आहे. नोव्हेंबर महिन्यात होणारी रब्बीची लागवड आता डिसेंबरअखेरपर्यंत होत असते. यामुळे रब्बीचा हंगाम मार्चमध्ये न संपता एप्रिलमध्ये संपत आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात अवकाळीचे संकट असून, त्यातच मार्च महिन्यात देखील अवकाळीसह वादळी पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत रब्बीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यंदा हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.