शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
4
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
5
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
6
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
7
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
8
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
9
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
10
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
11
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
12
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
13
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
14
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
15
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
16
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
17
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
18
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
19
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
20
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर

रब्बीचा हंगाम काढणीवर असताना पुन्हा अवकाळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने थंडीची लाट पसरली होती. मात्र, दोन दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने थंडीची लाट पसरली होती. मात्र, दोन दिवसांपासून किमान व कमाल तापमानात वाढ होत असून, किमान तापमानात दोन दिवसात ६ अंशाची वाढ झाली आहे. तर कमाल तापमानात देखील वाढ होत आहे. त्यातच एकीकडे रब्बी हंगाम ऐन काढणीवर असतानाच जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे. १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

गेल्या वर्षी देखील मार्च महिन्यात रब्बीचा हंगाम ऐन काढणीवर असतानाच जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे रब्बी हंगामाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच यंदा देखील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम देखील पूर्णपणे वाया गेला होता. त्यातच आता पुन्हा अवकाळीचे संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्यांचा चिंता वाढल्या आहेत.

अवकाळीचे कारण काय ?

बंगालच्या उपसागरात एक चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, बाष्पयुक्त हवा घेऊन हे क्षेत्र मध्य भारतकडे प्रवेश करताना दिसून येत आहे. त्यातच एक कमी दाबाचा पट्टा केरळ ते मराठवाडापर्यंत तयार झाला आहे. काही दिवसात दोन्ही हवा एकमेकांना आदळून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. बाष्पयुक्त हवांमुळे १६ ते १९ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाचा अंदाज ६४ टक्के इतका आहे. दरम्यान, पुढील काही दिवसात किमान व कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, ढगाळ वातावरण देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.

हिवाळ्यातील तिन्ही महिन्यात झाला पाऊस

हवामान बदलामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. यंदा अरबी समुद्रात अल निनोचा प्रभाव कमी झाला असला तरी ला लिनाचा प्रभाव वाढला आहे. दक्षिण अमेरिकेडून दक्षिण अफ्रिकेला वळसा घालून बाष्पयुक्त वारे अरबी व हिंदी महासागरात दाखल होत आहेत. या वाऱ्यांना लॅटिन भाषेत ला लिना असे संबोधले जाते. आधीच समुद्राच्या पाण्याचे तापमानात वाढ होत असल्याने चक्रीवादळांची स्थिती निर्माण होत असल्याने, दुसरीकडे बाष्पयुक्त वाऱ्यांचा मिलाप होत असल्याने यंदा हिवाळ्यातही पावसाचे आगमन झाले आहे. यंदाच्या हिवाळ्यात नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. वातावरण बदलाचा हा परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञ नीलेश गोरे यांनी सांगितले.

तर रब्बीचे होऊ शकते नुकसान

वातावरणात मोठ्या प्रमाणात बदलामुळे आधीच रब्बी हंगाम आता लांबला आहे. नोव्हेंबर महिन्यात होणारी रब्बीची लागवड आता डिसेंबरअखेरपर्यंत होत असते. यामुळे रब्बीचा हंगाम मार्चमध्ये न संपता एप्रिलमध्ये संपत आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात अवकाळीचे संकट असून, त्यातच मार्च महिन्यात देखील अवकाळीसह वादळी पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत रब्बीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यंदा हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.