शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचा हंगाम काढणीवर असताना पुन्हा अवकाळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने थंडीची लाट पसरली होती. मात्र, दोन दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने थंडीची लाट पसरली होती. मात्र, दोन दिवसांपासून किमान व कमाल तापमानात वाढ होत असून, किमान तापमानात दोन दिवसात ६ अंशाची वाढ झाली आहे. तर कमाल तापमानात देखील वाढ होत आहे. त्यातच एकीकडे रब्बी हंगाम ऐन काढणीवर असतानाच जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे. १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

गेल्या वर्षी देखील मार्च महिन्यात रब्बीचा हंगाम ऐन काढणीवर असतानाच जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे रब्बी हंगामाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच यंदा देखील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम देखील पूर्णपणे वाया गेला होता. त्यातच आता पुन्हा अवकाळीचे संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्यांचा चिंता वाढल्या आहेत.

अवकाळीचे कारण काय ?

बंगालच्या उपसागरात एक चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, बाष्पयुक्त हवा घेऊन हे क्षेत्र मध्य भारतकडे प्रवेश करताना दिसून येत आहे. त्यातच एक कमी दाबाचा पट्टा केरळ ते मराठवाडापर्यंत तयार झाला आहे. काही दिवसात दोन्ही हवा एकमेकांना आदळून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. बाष्पयुक्त हवांमुळे १६ ते १९ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाचा अंदाज ६४ टक्के इतका आहे. दरम्यान, पुढील काही दिवसात किमान व कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, ढगाळ वातावरण देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.

हिवाळ्यातील तिन्ही महिन्यात झाला पाऊस

हवामान बदलामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. यंदा अरबी समुद्रात अल निनोचा प्रभाव कमी झाला असला तरी ला लिनाचा प्रभाव वाढला आहे. दक्षिण अमेरिकेडून दक्षिण अफ्रिकेला वळसा घालून बाष्पयुक्त वारे अरबी व हिंदी महासागरात दाखल होत आहेत. या वाऱ्यांना लॅटिन भाषेत ला लिना असे संबोधले जाते. आधीच समुद्राच्या पाण्याचे तापमानात वाढ होत असल्याने चक्रीवादळांची स्थिती निर्माण होत असल्याने, दुसरीकडे बाष्पयुक्त वाऱ्यांचा मिलाप होत असल्याने यंदा हिवाळ्यातही पावसाचे आगमन झाले आहे. यंदाच्या हिवाळ्यात नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. वातावरण बदलाचा हा परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञ नीलेश गोरे यांनी सांगितले.

तर रब्बीचे होऊ शकते नुकसान

वातावरणात मोठ्या प्रमाणात बदलामुळे आधीच रब्बी हंगाम आता लांबला आहे. नोव्हेंबर महिन्यात होणारी रब्बीची लागवड आता डिसेंबरअखेरपर्यंत होत असते. यामुळे रब्बीचा हंगाम मार्चमध्ये न संपता एप्रिलमध्ये संपत आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात अवकाळीचे संकट असून, त्यातच मार्च महिन्यात देखील अवकाळीसह वादळी पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत रब्बीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यंदा हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.