शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

३१ डिसेंबरपर्यत मुंबईची सेवा आठवड्यातून एकच दिवस राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST

गैरसोय : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्बंध कायम जळगाव : कोरोना काळात सुरु झालेली जळगावची विमान सेवा आठवड्यातून ...

गैरसोय : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्बंध कायम

जळगाव : कोरोना काळात सुरु झालेली जळगावची विमान सेवा आठवड्यातून दर रविवारीच मुंबईकडे जात असून, १ डिसेंबर नंतर ही सेवा दररोज पूर्ववत सुरु होणार होती.मात्र, राज्य शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबर पर्यंत वाढवून, विमानसेवेवरील मर्यादित निर्बंध कायम ठेवल्यामुळे ३१ डिसेंबर पर्यंत मुंबईची सेवा आठवड्यातून एकच दिवस राहणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.

कोरोनामुळे सुरुवातीला तीन महिने आणि नंतर पुन्हा काही दिवस स्थगित झालेली विमान सेवा ६ सप्टेंबर पासून पुन्हा नियमित सुरु झाली आहे. मात्र, कोरोनामुळे शासनाच्या निर्देशानुसार ही सेवा आठवड्यातून तीनच दिवस धावत आहे. यामध्ये दर बुधवारी व शनिवारी अहमदाबाद ते जळगावची सेवा असून, दर रविवारी मुंबईची सेवा आहे. राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक विमान कंपन्याच्या उड्डाणांना बंदी घातली असून, आठवड्यातून मर्यादित दिवशीच उड्डाणांना परवानगी दिली आहे. या मध्ये जळगावला विमानसेवा देणाऱ्या विमान कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे या कंपनीतर्फे आठवड्यातून एक दिवस दर रविवारी मुंबईची सेवा देण्यात येत असून, या विमान कंपनीची नांदेड विमान तळावरही सेवा असल्याने नांदेड येथूनही एक दिवस सेवा देण्यात येत असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय :

सध्या रेल्वे गाड्या सुरु झाल्या असल्या तरी, या गाड्यांना आरक्षण मिळत नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी प्रवाशी वाहनांनी जादा पैसे मोजून मुंबईकडे जावे लागत आहे.तसेच या प्रवासात ८ ते १० तास लागत असल्याने प्रवाशांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात अशा परिस्थितीत आठवड्यातून एकच दिवस विमानसेवा सुरु असल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

आरटीपीसीआर चाचणीचा प्रशासनाकडे अहवाल नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिल्ली, गोवा, राजस्थान व गुजरात राज्यातून विमानाने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक केले आहे, तर ज्या प्रवाशांकडे अहवाल नसेल,त्यांची विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार जळगाव विमानतळावर जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन, ही प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.दरम्यान, आठवडाभरात किती प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या? किती प्रवाशी कोरोना बाधित आढळले?, याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांच्याकडे माहिती मागितली असता,त्यांनी आपल्याकडे जिल्ह्याची माहिती असून, विमानतळाची माहिती नसल्याचे सांगितले. तर विमानतळावरील संचालक सुनील मगरीवार यांनीही त्यांच्याकडे या संबंधाची कुठलिही माहिती नसल्याचे सांगितले.