शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉक तर झालाय; पण आगामी दोन आठवडे महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दोन महिन्यांनंतर जळगावची परिस्थिती बघता सर्व अनलॉक करण्यात आले आहे. सर्व पूवर्वत सुरू झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दोन महिन्यांनंतर जळगावची परिस्थिती बघता सर्व अनलॉक करण्यात आले आहे. सर्व पूवर्वत सुरू झाले असले तरी कोरोना हा संपलेला नाही. त्यामुळे हा धोका ओळखूनच प्रत्येकाने आपले वर्तन ठेवावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेचे पॅटर्न बघता तिसरी लाट नाकारता येत नाही, त्यामुळे आपण सावधच असायला हवे, असेही डॉक्टर सांगतात.

जिल्ह्याच्या पहिल्या लाटेचा पॅटर्न बघता मार्च महिन्यांत पहिला रुग्ण आढळून आला होता. मात्र, जेव्हा जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढली तेव्हा हळूहळू रुग्ण समोर येऊ लागले आणि जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये कोरोनाचा कहर समोर आला.

सप्टेंबरनंतर काहीसा दिलासा होता. टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू झाले. तेव्हाही अचानक रुग्णवाढ समोर आली नव्हती. ऑक्टोबरपासून कमी झालेली रुग्णसंख्या १५ फेब्रुवारीपासून वाढायला लागली. त्यामुळे हा पॅटर्न बघता सुरुवातीला जो विषाणू होता तोच कायम राहिला असता तर कदाचित भयावह परिस्थिती झाली नसती. मात्र, या विषाणूत म्यूटेशन झाल्यामुळे तो अधिक घातक झाला व अत्यंत वेगाने त्याचा संसर्ग झाला. नवा स्ट्रेन आला, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवितात. त्यादृष्टीने तपासणीसाठी काही नमुनेही पुणे, दिल्ली येथे पाठविण्यात आले. मात्र, त्यांचा अहवाल समोर आला नाही. मार्च- एप्रिलमध्ये ही दुसरी लाट अत्यंत भयावह ठरली. हे म्यूटेशन अधिक घातक असते, असे औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी स्पष्ट केले होते. विषाणूमधील जनुकीय बदल असे त्यावेळी संबोधण्यात आले होते.

...तर मग ती तिसरी लाट

येत्या काही दिवसांत पॉझिटिव्हिटी वाढल्यास सध्या जे दोन टक्के रुग्ण आहेत. त्यांच्यामुळे हा स्प्रेड झाल्याचे म्हणता येईल. मात्र, हीच वाढ जर दोन किंवा तीन महिन्यांनी समोर आली तर ती तिसरी लाट असेल किंवा नवीन पॅटर्न, नवीन स्ट्रेन असेल, अशी शक्यता आहे. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनलॉक झाल्यानंतरचे पुढील दोन आठवडे यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. नागरिकांनी नियम न पाळल्यास कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असेही डॉक्टर सांगतात.

प्रशासनाचा इशारा

सद्य:स्थितीत जिल्ह्याची पाॅझिटिव्हिटी अर्थात रोज समोर येणाऱ्या अहवालांमध्ये आढळून येणारे बाधित हे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. मात्र, आगामी काळात हे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास अनलॉकच्या नियमांमध्ये बदल करण्यात येतील, असा इशारा आधीच प्रशासनाने दिलेला आहे. त्यामुळे याबाबतीत सतर्क राहणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. सद्य:स्थितीत शहराची पॉझिटिव्हिटी ही दोन टक्क्यांपर्यंत आहेच. अनलॉक झाले असले तरी नागरिकांनी सावध राहिले पाहिजे.

कोरोना संपलेला नाही. अद्यापही दोन टक्के बाधितांचे प्रमाण आहेच. शिवाय गर्दीचे ठिकाण, कोण कुठून आला आहे, त्याला कोविड आहे की नाही, हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे या बाबींचा विचार करूनच वैयक्तिक पातळीवर सुरक्षा पाळल्यासच कोरोनाला अटकाव घालता येऊ शकतो.

- डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा