शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात निवडणुकांच्या हालचालींना वेग

By admin | Updated: May 24, 2017 00:33 IST

निवडणूक लढवू इच्छिणाºया प्रतिनीधींची २९ ला बैठक : ३० रोजी निवडणूक कार्यक्रम होणार जाहीर?

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाच्या प्राधिकरणाच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आला आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ प्रशसनाने तयारी सुरू केली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरांसाठी दहा जागांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पदवीधरांचे माजी प्रतिनिधी तसेच पदवीधर गटातून निवडणूक लढवू इच्छिणाºया विद्यार्थी प्रतिनीधींच्या बैठकीचे आयोजन २९ मे रोजी दुपारी ३ वाजता विद्यापीठात करण्यात आले आहे. १ मार्च रोजी अकृषी विद्यापीठांसाठी नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार विविध प्राधिकरणाच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. प्राधिकरणाचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठीच्या पात्रता व अटी शासनाकडून २९ एप्रिल रोजी काढलेल्या परिपत्रकात आधीच जाहीर करण्यात आल्या आहेत. या विषयांवर होणार चर्चासुधारित विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांसाठी दहा जागांची तरतूद करण्यात आली आहे. या निवडणुकांच्या चर्चेसाठीच २९ मे रोजी विद्यापीठात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत पदवीधरांच्या नोंदणी संदर्भात चर्चा करणे, सन २०१७ चे एकरुप परिनियम क्रमांक २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे विहित नमून्यात अर्ज भरणे, विहित शुल्क व दस्तऐवजांसह अर्ज जमा करणे याबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीसाठी पदवीधरांचे माजी प्रतिनीधी व निवडणूक लढवू इच्छिणाºया विद्यार्थी प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी व प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी केले आहे. नवीन नावनोंदणी करण्यात येईलदरम्यान यापूर्वीच्या विद्यापीठ कायद्यानुसार २०१५ मध्ये विद्यापीठाची विविध प्राधिकरणे गठित करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यावेळी नोंदणीकृत पदवीधरांचे नोंदणी अर्ज व ज्यांनी पूर्वी नोंदणी केली होती त्यांची मतदार यादीत नावे समाविष्ठ करण्यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याची कार्यपध्दती अवलंबिण्यात आली होती. मात्र आता नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यामुळे पदवीधरांची नव्याने नाव नोंदणी करण्यात येणार        आहे. ३० मे पर्यंत निवडणूक कार्यक्रम होणार जाहीरप्राधिकरण निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याबाबतचे नियम व अटींची माहिती देण्यास शासनाकडून उशीर झाला असला तरी, उमवि प्रशासनाने निवडणुकांसाठी मार्च महिन्यातच तयारी सुरू केली         होती. त्यानुसार विद्यापीठाने निवडणूक कार्यालयदेखील सुरू केले होते. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे अधिकार हे कुलगुरूंकडे आहेत. ३० मे रोजी कुलगुरू निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. प्राधिकरण निवडणुका शांततेत व बिनविरोध पार पाडण्यासाठी उमवि प्रशासनाकडून सध्या प्रयत्न सुरू असले तरी, बिनविरोध निवडणुका न झाल्यास त्या दृष्टीनेदेखील विद्यापीठाची तयारी आहे. निवडणूक खर्चासाठी उमविने १ कोटींची रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात याआधीच केली आहे.